जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार”-…या मंत्र्यांचे पुन्हा सूतोवाच !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
  
   राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला सहकार्य केलं गरजेचे असून त्यांनी मतदान करण्यासाठी जाहीरनाम्याप्रमाणे निर्णय घेण्यास राज्य सरकार सकारात्मक असून त्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये शासनाला सादर झाल्यानंतर सहकारी बँकांचे आर्थिक वर्ष संपायच्या आत म्हणजेच जून २०२६ च्या आत कर्जमाफीचा घेतला जाईल असे आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

पुढील वर्षी जिल्हा कृषी प्रदर्शन कोपरगावला 
   “आ.आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या वेदना,व्यथा जाणून घेवून शेतकऱ्यांना शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा लाभ होवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी कर्मवीर कृषी महोत्सव-२०२५ चे नियोजन केले आहे.त्यानी आपल्याला जरी सांगितले नसले तरी,शेतकऱ्यांना अधिकचा फायदा व्हावा यासाठी यापेक्षा मोठे नियोजन करण्याची जबाबदारी आपल्याला आ.काळेंवर वर द्यायची आहे”-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे,महाराष्ट्र राज्य.

   माजी खा.कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १३ व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ चे उदघाटन’ राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.अशोक काळे होते.

“कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त दर देण्याचा प्रयत्न केला आहे.बहुतांश शेतकरी जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळले आहे.आगामी काळात आपण दुध उत्पादकांना न्याय द्यायचा निर्णय घेतला असून तालुक्यातील दुध व्यावसायीकांसाठी हक्काचे व्यासपीठ (दूध संघ )उपलब्ध करणार असल्याचे सूतोवाच आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 

   सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानडे,द्राक्ष बागायतदार राज्यसंघाचे अध्यक्ष कैलास भोसले,कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन,उपाध्यक्ष नारायण मांजरे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,संचालक मंडळ,संलग्न संस्थांचे पदाधिकारी,संचालक, अधिकारी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,जिल्हा परिषद-पंचायत समितीचे माजी सदस्य,माजी नगरसेवक,सभासद,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   “तू,आपला कामाचा माणूस …!
“आशुतोष काळे हा कामाचा माणूस आहे,तू तुझे काम सुरुच ठेव.बाभळीच्या झडाला कोणीच दगड मारतं नाही.तू फळ देणारे आंब्याचे झाड आहे.त्यामुळे त्याचा विचार करू नको हा निसर्ग नियमच आहे ज्या झाडाला फळ असतात त्याच झाडाला लोक दगड मारतात’-दत्तात्रय भरणे,कृषी मंत्री.

  त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”आपण सर्वजण शेतकरी असून आपल्याला शेती प्रश्नांची व्यथा माहिती आहे.ती करताना शेतकरी आजही जुन्या पद्धतीने शेती करतो परंतु त्यामध्ये आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन कसं घेता येईल त्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे.शेतकऱ्यांसाठी राज्याचा कृषिमंत्री म्हणून राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राज्याचे कृषिमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली.आपल्याला हे पद दिलं ते मिरवण्यासाठी नाही.कृषी विभागाच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याला अधिकचा न्याय कसा देता येईल हा माझा प्रयत्न आजही आहे आणि भविष्यामध्ये राहणार आहे.शेतकरी उभ्या केलेल्या पिकांबाबत स्वप्न रंगवतो परंतु कधी अतिवृष्टी होवून शेतकऱ्याच्या स्वप्नाचा चक्काचूर होतोय हे आपण पाहिले आहे.त्यामुळे  शेतकऱ्याचं दुःख आणि अडचणी याची आपल्याला कल्पना आहे.त्यासाठी शेतकरी बांधवांसाठी कुठले निर्णय घेणे गरजेचे आहे,कुठले निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त लाभ कसा होईल यासाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून शेतकऱ्यांच्या फायद्याचे निर्णय घेतले जाणार आहेत.

   “कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ड्रीपसाठी प्र.मे.टन शंभर रुपये जादा भाव देत असल्याबद्दल आ. काळे यांचे कौतुक करतांना माजी आ.अशोक काळे यांना उद्देशून तुमचा अध्यक्ष हुशार असल्याचा शेरा मारला आहे.शासनाच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत करतात ही बाब कौतुकास्पद आहे.कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा आदर्श इतर कारखान्यांनी घ्यावा असे आवाहन मंत्री भरणे यांनी करून केंद्र व राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन शेवटी केले आहे.

   सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे म्हणाले की,”ज्याप्रमाणे बारामती,मोशी,नासिक अशा दूरवरच्या ठिकाणी कृषी प्रदर्शन होत असतात परंतु त्या ठिकाणी आपल्या भागातील शेतकरी जावू शकत नाही त्यामुळे कृषी प्रदर्शन भरवावे अशी असंख्य शेतकऱ्यांची मागणी होती.त्या मागणीची दखल घेवून कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.ए.आय.या नवीन तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये सुरु झाला असून त्याला कृषी क्षेत्रही अपवाद नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख होवून ऊस उत्पादन वाढीसाठी,दुग्ध व्यवसायासाठी अशा तंत्रज्ञानाचा उपयोग होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी हा या कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ चा मुख्य उद्देश आहे.कृषी मंत्री भरणे यांच्या रूपाने एक प्रगतशील शेतकरी असलेले व शेतकऱ्यांच्या अडचणी व प्रश्नांची जाणीव असलेले मंत्री राज्याला लाभले आहे.कृषी खात्याच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर व ए.आय.या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती व्यवसायाचा खर्च कमी कसा करता येईल यावर जास्तीत जास्त भर देण्याचे काम कृषी खात्याच्या माध्यमातून सुरु आहे.शेती व्यवसाय हा परवडणारा व्यवसाय कसा होईल आणि शेती हा व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्र कसा वाढेल व कसा घडेल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहे.आपल्याला मतदार संघातील जनतेने २०१९ ला निवडून दिले मतदार संघाच्या विकासासाठी मला तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी मिळविता आला यामागे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रेरणा आहे.सरकार कोणतेही असो निधी मिळविण्यात ते आघाडीवर असतात संपूर्ण राज्यात सर्वात जास्त सव्वा सहा हजार कोटी निधी मिळविण्याची किमया त्यांनी करून दाखविली आहे.आपण त्यांचा आदर्श घेवून निधी मिळविण्यासाठी ते कशा प्रकारे पाठपुरावा करतात त्याप्रमाणे पाठपुरावा केल्यामुळे मलाही तीन हजार कोटीचा निधी मिळविता आला असल्याचे कौतुक त्यांनी शेवटी केले आहे.

  सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी केले तर सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष नारायण मांजरे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close