गुन्हे विषयक
‘त्या’अपघातातील दुसरा तरुणही ठार,कोपरगाव तालुक्यावर शोककळा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश शिवारातील नगर-मनमाड मार्गावर असलेल्या मराठवाडा जलद कालव्या जवळ दि.१३ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत चांदेकसारे येथील दुचाकीस्वार अनिल उर्फ सुनील वामन सोनवणे (वय-२०) हा तरुण जागीच ठार झाला होता तर अन्य एक तरुण सिद्धार्थ काशिनाथ खरात हा जखमी झाला होता.त्याचे उपचारा दरम्यान निधन झाल्याचे वृत्त हाती आले असून याबाबत तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मयत दुसरा तरुण सिद्धार्थ खरात याचे छायाचित्र.
या अपघातातील पहिला मयत सुनिल सोनवणे हा तरुण शिर्डी येथील हॉटेल मध्ये काम करत होता.व तो आईला भेटण्यासाठी धुळे येथे आपल्या मित्रास घेऊन गेला होता.त्याचा दुसरा जखमी मित्र सिद्धार्थ खरात हा श्री सद्गुरू गंगागिरी महाराज विद्यालयाचा विद्यार्थी होता त्याच्यावर कोपरगाव नजीक असललेल्या रुग्णालयात उपचार सुरु होते त्या दरम्यान त्याचे आज पहाटे ०४ वाजता निधन झाले आहे.
नगर-मनमाड या मार्गाचे काम नुकतेच शिर्डीच्या बाजूने सावळीविहिर पासून सुरु झाले आहे.सदर रस्त्यावर या पूर्वीच वाहनांची मोठी वर्दळ आहे.त्यामुळे अपघातांची मोठी मालिका सुरु आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण ०८ कि.मी.अंतरावर असलेल्या खिर्डी गणेश शिवारात दि.१३ जानेवारी रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास घडली असून त्यात दुचाकी स्वार अनिल वामन सोंनवणे हा जागीच ठार झाला होता.तर त्याचा अन्य साथीदार सिद्धार्थ काशिनाथ खरात हा जखमी झाला होता.या घटनेने दुचाकीस्वार हा सुमारे दहा फूट फरफटत नेले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली होती.
दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार पहिला मयत सुनिल सोनवणे हा तरुण शिर्डी येथील हॉटेल मध्ये काम करत होता.व तो आईला भेटण्यासाठी धुळे येथे आपल्या मित्रास घेऊन गेला होता.त्याचे वडील सेंट्रिंगचे काम करत असल्याची माहिती आहे.त्याचा दुसरा जखमी मित्र सिद्धार्थ खरात हा श्री सद्गुरू गंगागिरी महाराज विद्यालयाचा विद्यार्थी होता व त्याचे वडील दूध वाहतूक करणारी रिक्षा चालवत होते त्यास कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी रुग्णालयात भरती केले होते.उपचारा दरम्यान त्याचे आज पहाटे ०४ वाजता निधन झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्याच्यावर चांदेकसारे येथे आज सकाळी ११ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्याच्या पश्चात आई.वडील,एक भाऊ असा परिवार आहे.त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.