जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव पोलीसांची बेशिस्त नागरिकांवर कारवाई,मोठा दंड वसूल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात तालुका प्रशासनने व आरोग्य विभागाने कोरोना नियंत्रणात आणलेला असतां बेशिस्त नागरिकांमुळे पुन्हा एकदा कोरोना साथ डोके वर काढू पाहत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस सक्रिय झाले असून त्यांनी बेशिस्त नागरिकांवर डोळे वटारले आहे.दुकानाची वेळ संपुनही आपले दुकान सुरू ठेवल्या प्रकरणी एक व्यापारी तर सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणे व सुरक्षित अंतर न ठेवण्याच्या गैरवर्तनाबद्दल तीस इसमांना ०६ हजारांचा दंड ठोठावला असून एकूण ०७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे बेशिस्त नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोरोनाचा वर्तमानात डेल्टा प्लस हा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत असून त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला असून पुन्हा एकदा निर्बंध व शनिवार रविवार बंद ठेवला आहे.व अत्यावश्यक सेवा वगळता सकाळी सात ते दुपारी चार पर्यंतच आपली दुकाने सुरु ठेवता येणार आहे.डेल्टा प्लसने उचल खाल्ली असून राज्य शासन हादरले आहे.कोरोना रुग्ण काही अंशी पुन्हा वाढु लागले आहे.त्यामुळे काळजी घेणे गरजेचे बनले आहे.त्यातून हि कारवाई पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केली आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ७० हजार ३२३ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०३ हजार २६५ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ६१ हजार ९७० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०५ हजार ४९९ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.कोरोनाचा वर्तमानात डेल्टा प्लस हा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत असून त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला असून पुन्हा एकदा निर्बंध व शनिवार रविवार बंद ठेवला आहे.व अत्यावश्यक सेवा वगळता सकाळी सात ते दुपारी चार पर्यंतच आपली दुकाने सुरु ठेवता येणार आहे.डेल्टा प्लसने उचल खाल्ली असून राज्य शासन हादरले आहे.कोरोना रुग्ण काही अंशी पुन्हा वाढु लागले आहे.त्यामुळे काळजी घेणे गरजेचे बनले आहे असे असताना काही भागात तरुण आपले वाढदिवस भर रस्त्यात करून कोरोना साथीला निमंत्रण देताना दिसत आहे.राजकीय पक्ष जबाबदारीने वागताना दिसत नाही त्यावर उच्च न्यायालयाने सरकारच्या या कारभारावर ताशेरे ओढले आहे.हि चिंताजनक बाब आहे.
कोपरगाव तालुका त्याला अपवाद नाही,आज एक अखेर १२ हजार ५६८ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ११७ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २०६ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६४ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख ०२ हजार ०९१ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०४ लाख ०८ हजार ३६४ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १२.३१ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १२ हजार २४५ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.४३ टक्के आहे.त्यातून आजही रुग्ण नागरिक दखल घेत नसल्याचे दिसत आहे.त्यातून पोलिसांना आता सक्रिय होण्याचा अनास्था प्रसंग ओढवला आहे.त्यातून पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कडक पावले उचलली आहे.त्यातून हि दंडात्मक कारवाई झाली आहे.त्यामुळे बेशिस्त नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तर सूज्ञ नागरिकांनी स्वागत केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close