जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

…या जिल्ह्यात संत निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे स्वागत

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आषाढी पालखी सोहळा मंगळवारी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान केले असून काल सायंकाळी सदर पालखीचे अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन झाले असून पहिला मुक्काम असलेल्या पारेगाव खुर्द या ठिकाणी या पालखीचे शिवसेना उबाठा गटाचे शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी जोरदार स्वागत केले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात संत निवृत्ती नाथ महाराज दिंडीचे आगमन झाले असल्याने सदर पालखीचे पारेगाव या ठिकाणी शिर्डीचे सेनेचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी स्वागत केले आहे.

   मुखी हरिनामाचा गजर,हाती टाळ मृदूंग घेत लाखो वारकरी आषाढी वारीला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला पायी जात असतात.वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय.वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते.आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.संत निवृत्तीनाथ,संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ,संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत.त्यांच्या नावाने राज्याच्या विविध भागातून पंढरपूर साठी दिंड्या रवाना होत असतात.संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आषाढी पालखीने नुकतेच त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलं आहे.तिचे काल अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पारेगाव येथे आगमन झाले आहे.

 

सदर प्रसंगी दिंडीतील प्रमुख मानकऱ्यांचा खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी शाल श्रीफळ देऊन गौरव केला आहे.त्यावेळी संतासह पत्रकार नानासाहेब जवरे,महेंद्र सोनवणे आदी दिसत आहे.

   सदर दिंडीत मोहन महाराज बेलापूरकर,बाळकृष्ण महाराज डावरे,जयंत महाराज गोसावी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित असून पालखी सोहळा हा अत्यंत वैभवशाली आणि परंपरेप्रमाणे होत आहे.मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पालखी सोहळ्यात काही नवीन दिंड्या सहभागी होत आहेत.वारकऱ्यांसाठी लागणाऱ्या पाणी,पालखी तळांवरील निवासाची व्यवस्था,शौचालय,इत्यादी मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.या दिंडीत असलेल्या वारकऱ्यांची  मोठी संख्या असून त्यांचे नियोजन ही मोठ्या कौतुकाची बाब ठरत आहे.

  सदर दिंडीत मोहन महाराज बेलापूरकर,बाळकृष्ण महाराज डावरे,जयंत महाराज गोसावी आदीसह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.सदर पालखीचे पारेगाव या ठिकाणी शिर्डीचे  सेनेचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी स्वागत केले आहे.त्यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे,महेंद्र सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी दिंडीतील प्रमुख मानकऱ्यांचा खा.वाकचौरे यांनी शाल श्रीफळ देऊन गौरव केला आहे.

  या पालखीत वारकऱ्यांसाठी लागणाऱ्या पाणी,पालखी तळांवरील निवासाची व्यवस्था,शौचालय,इत्यादी मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.पालखी सोहळ्याचा नगर जिल्ह्यातील दुसरा मुक्काम गोगलगाव येथे होत आहे.मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतींना राज्य सरकारने अनुदान प्रदान केले असल्याची माहिती आहे.तयचे वारकऱ्यांनी स्वागत केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close