आरोग्य
कोपरगावात तालुक्यात अद्यापही कोरोना उपचार संचासाठी भिकेचे डोहाळे !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यात कोरोना रुग्णाच्या तपासणीसाठी आवश्यक असलेल्या व चाचपडत असलेल्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला पुन्हा एकदा दिलासा मिळाला असून आ.आशुतोष काळे यांनी सुमारे एक हजार संच प्रदान केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे आरोग्य विभागाला काही काळ दिलासा मिळणार असला तरी मूळ दुखणे या पुढेही कायम असणार आहे.सरकारी पातळीवर कोरोना तपासणी संच मिळवणे अद्याप शक्य झालेले नाही.त्यामुळे आगामी काळातही कोपरगाव तालुक्यातील जनतेला उपचाराच्या साहित्यासाठी ‘भिकेचे डोहाळे’ लावावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोपरगाव नगरपरिषद तिचे पदाधिकारी अद्याप केवळ आवाहन करण्यावर समाधान मानत आहे.त्यांना आपली तिजोरी नागरिकांच्या उपचार साहित्यासाठी व अमूल्य जीवित वाचविण्यासाठी खुले करण्याची सदबुद्धी झालेली नाही.त्या पातळीवर केवळ बातमीला प्रसिद्ध करण्यात त्यांना समाधान मिळत आहे.उक्तीला कृतीची जोड देण्यात व तिजोरीला हात घालण्यात त्यांना काय अडचण आहे हे समजणे अवघड आहे.तर नगरसेवक वर्गणी करून आभाळाला ठिगळ लावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.शहरातील उद्योजक धनिक,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करून यासाठी पुढे येण्यासाठी आवाहन करावे लागले आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढताना दिसत असून ग्रामीण भागात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत.शनिवारी राज्यात तब्बल ६३ हजार २८२ नवीन रुग्णांचे निदान झाले.दिलासादायक म्हणजे शनिवारी ६१ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.राज्यात आजपर्यंत एकूण ३९ लाख ३० हजार ३०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.तर नगर जिल्ह्यात अद्याप पर्यंत कोरोनाची लाट ओसरण्याचे नाव घेत नाही.नगर जिल्ह्यात कालअखेर बाधित रुग्ण संख्या ०१ लाख ७५ हजार ०९४ असून त्यातील ०२ हजार ०१३ जणांचे निधन झाले आहे.अनेक रुग्णालयातील भरती रुग्णांना प्राणवायूची उपलब्धता होत नसून कोरोना लसही मिळत नसल्याने त्यांना टाचा घासून मरण्याचा भयावह व अनास्था प्रसंग गुदरत आहे.अलीकडील काळात तर कोपरगावातील अधिकृत आकडा प्रशासन लपवत आहे.या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नागरिक हादरले आहे.वैद्यकीय साधने अपूर्ण पडत आहे.आगामी काळात तिसरी व चौथी कोरोनाची लाट येण्याची शक्यता गृहीत धरून राज्य शासनाने नियोजन सुरु केले आहे.सरकारला जवळपास सव्वा वर्षाचा कालखण्ड मिळूनही या साथीला तोंड देण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात सपशेल अपयश आले आहे.केंद्र व राज्य सरकारची जगात मोठी नाचक्की झाल्यावर आता कुठे त्यांनी हातपाय खोडायला सुवरुवात केली आहे.तरीही कोरोना तपासणीसाठी प्राथमिक पातळीवर आवश्यक असलेले कोरोना संच मिळत नसल्याने मोठी यातायात कारावी लागत आहे.तालुक्यात मोठे सम्राट असूनही ते भिकेसारके थोडे-थोडे करून जनतेला बनवायला प्रचारकी (प्रसिद्धीचे स्तोम जास्त) वाटप करताना दुर्दैवाने दिसत आहेत.अशीच घटना सध्या घडली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री यांचेकडे मागणी करूनही वैद्यकीय साहित्य आणण्यात आ.काळे यांना अपयश आले आहे.त्यामुळे हि कोरोना साथ वाढण्यास मोठी मदत मिळत आहे.ज्या रुग्णांना तपासणी संचच मिळत नाही ते बिनबोभाट कोरोनाचा प्रसार करत आहे.त्यामुळे दुसऱ्या लाटेत अनेक नागरिक,तरुण हकनाक बळी जात आहे.त्यामुळे या विभागाला तोंड दाखवायला जागा राहिली नाही.नगरपरिषद तिचे पदाधिकारी अद्याप केवळ आवाहन करण्यावर समाधान मानत आहे.त्यांना आपल्या तिजोरी नागरिकांच्या उपचार साहित्यासाठी व अमूल्य जीवित वाचविण्यासाठी खुले करण्याची सदबुद्धी झालेली नाही.त्या पातळीवर केवळ बातमीला प्रसिद्ध करण्यात त्यांना समाधान मिळत आहे.उक्तीला कृतीची जोड देण्यात त्यांना काय अडचण आहे हे समजणे अवघड आहे.तर नगरसेवक वर्गणी करून आभाळाला ठिगळ लावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.शहरातील उद्योजक धनिक,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करून यासाठी पुढे येण्यासाठी आवाहन करावे लागले आहे.सरकारने अद्याप आपले अपयश कबुल केले नाही हे विशेष !सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयांत सुरु केलेले कोविड सेंटर प्राणवायूअभावी अद्याप पंधरा दिवसातून अधिक काळ उलटूनही सुरु केलेले नाही.प्राणवायूची रुग्णवाहिका आणून तिच्या उदघाटनांची केवळ घाई करून प्रसिद्धी व श्रेय घेऊन हि मंडळी मोकळी झाली आहे.मात्र अद्याप त्या रुग्णवाहिकेची पासिंग व त्यातील सुविधांचा अपूर्ण असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.