जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण ९४ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ०९ रुग्ण बाधित तर नगर येथे तपासणीसाठी ४९ स्राव पाठवले आहे तर येथुन आलेल्या अहवालात ०० स्राव बाधित आले आहे.तर बाधित संख्येत खाजगी प्रयोग शाळेतील ०५ असे एकूण १४ जण बाधित आले असून उपचारा नंतर १३जणांस सोडून दिले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ६१ हजार ०९६ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ९२१ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत काही दिवसातील रुग्ण धरून ३८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काळात ग्रामीण भागात अधिक प्रमाणावर रुग्ण वाढ होत आहे.त्यामुळे आ.काळे यांनी उपाय योजनांसाठी तातडीची बैठक बोलावली होती.
दरम्यान कोपरगाव शहरात आज ०१ पुरुष रुग्ण वय-६८ आढाव वस्तीबयेथें आढळला आहे. .
तर ग्रामीण भागात १३ रुग्ण बाधित आढळले आहे त्यात कोळपेवाडी येथील डॉन पुरुष रुग्ण वय-६६,२६,तर चांदेकासारे येथे तीन रुग्ण त्यात दोन पुरुष वय-२९,५५ तर एक महिला वय-२७ आदी बाधित आहे. शहा येथील एक पुरुष रुग्ण वय-४३,सुरेगाव येथील महिला वय-३०, कान्हेगाव येथील एक पुरुष रुग्ण वय-५७,जेऊर पाटोदा एक महिला वय-९०,दोन पुरुष रुग्ण वय-२५,४८,तर भोजडे एक पुरुष रुग्ण वय-४८,कोकमठाण महिला वय-७७ आदीं रुग्ण बाधित आढळले आहे.त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार ३२६ इतकी झाली आहे.त्यात ७१ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३८ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.६३ टक्के आहे.आतापर्यंत १५ हजार ४११ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ६१ हजार ६४४ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १५.०९ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ०२ हजार २१७ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९५.३१ टक्के झाला आहे.दरम्यान आज शहरी भागात रुग्ण कमी होण्याबरोबरच ग्रामीण भागात मात्र आज रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्याचे दिसत आहे.तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास पूर्ण रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.