जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण ३२ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ०३ रुग्ण बाधित तर नगर येथुन आलेल्या अहवालात एकही स्राव बाधित आला नाही.तर खाजगी प्रयोग शाळेतील अहवालात ०५ रुग्ण असे एकूण ०८ रुग्ण बाधित आले असून उपचारा नंतर ०५ जणांना सोडून दिले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ५९ हजार १८४ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ९१९ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत काही दिवसातील रुग्ण धरून ३७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काळात ग्रामीण भागात अधिक प्रमाणावर रुग्ण होते आता मात्र ते कमी झाले आहे.हि समाधानाची बाब आहे.
दरम्यान कोपरगाव शहरात आज ०४ रुग्ण आढळले असून त्यात टाकळी फाटा येथे एक पुरुष बाधित वय-४१ तर कोपरगाव बेट येथे तीन बाधित असून त्यात एक पुरुष रुग्ण वय-२९,तर ०२ महिला वय-२४,५२ असे तीन बाधित आढळले आहे.तर ग्रामीण भागात ०४ रुग्ण बाधित आढळले असून त्यात सुरेगाव येथे दोन महिला वय-४२,५४ तर एक पुरुष रुग्ण वय-६२ असे तीन रुग्ण तर चासनळी येथे एक मुलगी वय-१३ असे एकूण ०८ बाधित आढळले आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार २३८ इतकी झाली आहे.त्यात २४ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३७ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.६५ टक्के आहे.आतापर्यंत १२ हजार ९२३ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ५१ हजार ६९२ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १७.३१ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ०२ हजार १७७ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९७.२७ टक्के झाला आहे.दरम्यान आज शहरी भागात रुग्ण कमी होण्याबरोबरच ग्रामीण भागात रुग्ण कमी झाले आहे.तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात दीपावलीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास पूर्ण रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.