जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

विहिरीत पडून शेतकरी ठार,अकस्मात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेलेले आपले बंधू दिलीप बळवंत घेगडमल (वय-५५) हे सकाळी पाणी भरण्याची वेळ संपूनही परत का आले नाही हे पाहण्यासाठी गेले असता ते विहिरीत मृत अवस्थेत आढळून आल्याची माहिती मयत शेतकरी यांचे बंधू संदीप बळवंत घेगडमल (वय-४५) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिल्याने खळबळ उडाली आहे.

धारणगाव येथील शेतकरी दिलीप घेगडमल हे मंगळवार दि.१७ मार्च रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता हि दुर्घटना घडली आहे.सकाळी त्यांचे बंधू संदीप घेगडमल हे गेले असता त्यांना विहिरीच्या काठावर चप्पल व त्यांची दुचाकी आढळून आल्याने त्यांना संशय आला व ते विहिरीत डोकावले असता हि दुर्घटना उघड झाली आहे.

वर्तमानात महावितरण कंपनी शेतकऱ्यांना रात्रीच वीज देत असल्याने अनेकांना आपला जीव धोक्यात घालून आपली शेती करावी लागत आहे.त्यातच जंगली श्वापदांचा उपद्रव वाढला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड अन तिकडे विहीर अशी झाली आहे.अनेक वर्षात पहिल्यांदा पाऊस झाल्याने शेती करणे क्रमप्राप्त आहे.मात्र त्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो.अशीच घटना नुकतीच धारणगाव येथे नुकतीच घडली आहे.धारणगाव येथील शेतकरी दिलीप घेगडमल हे मंगळवार दि.१७ मार्च रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता हि दुर्घटना घडली आहे.सकाळी त्यांचे बंधू संदीप घेगडमल हे गेले असता त्यांना विहिरीच्या काठावर चप्पल व त्यांची दुचाकी आढळून आल्याने त्यांना संशय आला व ते विहिरीत डोकावले असता हि दुर्घटना उघड झाली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.अशोक आंधळे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close