जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आपले अपयश झाकण्यासाठी माजी आ.कोल्हेंची निळवंडे पिपाणी-उपाध्यक्ष

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आ.आशुतोष काळे यांनी दाखवून देतांना शहरातील पाच नंबर साठवण तलाव,गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न,उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न दीडच वर्षात मार्गी लावून दाखविला आहे मात्र याउलट मागील पाच वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकहाती सत्ता असतांना पाच वर्षात फक्त मंत्र्यासमवेत फोटो काढून तुम्ही जनतेची दिशाभूल केल्यामुळे आज कोपरगाव शहरातील नागरिकांवर हि वेळ आली आहे.राज्यात व केंद्रात तुमचीच सत्ता असतांना तुम्ही सपशेल अपयशी ठरल्या आहेत.हे तुमचे अपयश खोटे आरोप करून कदापि झाकले जाणार नाही असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्यावर दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.

कोपरगाव शहराला कुठूनही पाणी आले तरी ते पाणी साठविण्यासाठी साठवण तलावांची क्षमता वाढविणे गरजेचे आहे.हे सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे.त्यासाठी पाच नंबर साठवण तलावाची क्षमता वाढविणे गरजेचे असताना माजी आ.आपले अपयश झाकण्यासाठी शेंडीला मलम लावण्याचे पातक करत आहेत.त्यातून हा प्रश्न सुटणार नाही हे उघड आहे.त्यातून कोपरगाव शहरातील नागरिकांची करमणूक करून स्वतःचे हसे करून घेऊ नका” सुधाकर रोहोम उपाध्यक्ष कर्मवीर शंकरराव काळे कारखाना.

आ.स्नेहलता कोल्हे यांनी नुकतीच आ.काळे यांच्यावर टीका केली होती.त्यावर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहिम यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

त्यात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की,”मागील पाच वर्षात मतदार संघाचे मुलभूत प्रश्न काय आहेत याची जाण नसल्यामुळे माजी आ.कोल्हे यांना एकहाती सत्ता असतांना देखील मतदार संघाचे प्रश्न सोडविता आले नाही.२०१६ च्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाने दिलेली हुलकावणी व त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत झालेला पराभव याने मतदार संघाच्या विकासाचा विचारच डोक्यातून काढला होता.त्यामुळे मतदार संघातील शेतकऱ्यांना.बोंड अळीच्या नुकसान भरपाई पासून तसेच २०१५/१६ च्या रब्बी अनुदानापासून वंचित राहावे लागले होते. शिवाय २०१८ साली दुष्काळी परिस्थिती असतांना कोपरगाव तालुक्याच्या शेजारील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असतांना कोपरगाव तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळला होता. त्यावेळी राज्यात व केंद्रात सत्ता असून देखील विद्यमान आ.कोल्हे मुग गिळून गप्प बसल्यामुळे आ. काळेंना आमरण उपोषणाला बसावे लागले होते. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न पाच नंबर साठवण तलावाच्याच माध्यमातून सुटू शकतो याची जाणीव असणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी सात दिवस धरणे आंदोलन केले होते.त्यावेळी पाच नंबर साठवण तलावाचे काम झाल्यास श्रेय आ. काळे यांना मिळेल त्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे होवू नये यासाठी कोण आडवे आले हे आपल्या मनाला विचारावे असा सल्ला देखील रोहोम यांनी मा.आ.कोल्हे यांना दिला आहे.

मा.आ. कोल्हे यांना कोपरगाव शहराच्या विकासाशी देणं-घेणं नाही. कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाला कोल्हेच जबाबदार आहे त्याबाबत वास्तव परिस्थिती शहरवासीयांच्या समोर आली आहे. त्यांच्याच आदेशाने २८ विकासकामांना उच्च न्यायालयातून स्थगिती आणल्यामुळे कोपरगावच्या नागरिकांनी त्यावर शिक्कामोर्तब केले असून या पापाचे धनी कोल्हेच आहेत. त्यामुळे कोल्हे यांचा जळफळाट होत असल्यामुळे त्या बेछुट आरोप करीत आहेत. निळवंडेचे पाणी कोपरगावला येणे शक्यच नसतांना देखील शहरवासियांना खोटे स्वप्न दाखविले आणि आता पुन्हा निळवंडेची पिपाणी वाजवून पुन्हा एकदा जनतेची दिशाभूल करीत आहे. मतदार संघाची विकास कामे मार्गी लावली असती तर त्यावेळी आ.आशुतोष काळे यांना आमरण उपोषण, धरणे आंदोलन करायची वेळ का आली याचे आत्मपरीक्षण करा.मागील पाच वर्षात सत्ता नसतांना देखील विकासाचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी ते लढाई लढत होते. मात्र आता आ.काळे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यामुळे विकास कसा करायचा याची चुणूक त्यांनी दीडच वर्षात मतदार संघातील जनतेला दाखवून दिले आहे. त्यामुळे तुम्ही आडवे पडा,नाही तर पडू नका मतदार संघाचा विकास थांबणार नाही.तुमच्या प्रत्येक प्रश्नाला तुमच्याच भाषेत योग्य उत्तर दिले जाईल असा ईशारा देखील रोहोम यांनी शेवटी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close