जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

सुनेला घराबाहेर काढण्यासाठी मारहाण,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मायगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या फिर्यादिस त्याच घरातील नणंद,दीर,सासू,पती,जाऊ,मामे सासरा,मामे सासू,आदींसह अकरा जणांनी गैर कायद्याची मंडळी जमवून मारहाण केली शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध रेखा मिलिंद अहिरे (वय-३८) हिने गुन्हा दाखल केला आहे.

दि.११ सप्टेंबर २०११ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या राहते घरी त्यांच्यात काही कारणावरून वाद निर्माण झाला होता.त्या वादावरून आरोपी नणंद पुष्पा राजू पगारे,दिर सुनील अगस्ती अहिरे,सासू भागूबाई अगस्ती अहिरे,पती मिलिंद अगस्ती आदीं अकरा जणांनी गैर कायद्याची मंडळी जमवून आपल्याला राहते घरी मायगाव चौफुली धामोरी या ठिकाणी आपल्याला मारहाण करुन घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,वर्तमानात पाऊस पाणी भरपूर असल्याने व शेतात कामे नसल्याने ग्रामस्थ रिकामटेकडे असल्याने तालुक्यात विविध भांडण तंटे यांना ऊत आला आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी चौफुली परिसरात घडली आहे.फिर्यादी महिला रेखा अहिरे हिने तिच्या सासरी राहू नये व आपल्या मुलास घेऊन निघून जावे या साठी आरोपी हे एकाच घरातील असून आपआपसातील नातेवाईक आहेत.त्यांच्यात काही किरकोळ कारणावरून वाद आहेत.

दि.११ सप्टेंबर २०११ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या राहते घरी त्यांच्यात काही कारणावरून वाद निर्माण झाला होता.त्या वादावरून आरोपी नणंद पुष्पा राजू पगारे,दिर सुनील अगस्ती अहिरे,सासू भागूबाई अगस्ती अहिरे,पती मिलिंद अगस्ती अहिरे,जाऊ
सुजाता सुनील अहिरे,पतीचे मामा उत्तम बाळा मेहरखांब,पतीची मामी सुषमा उत्तम मेहेरखांब,पतीची दुसरी मामी उषा गौतम मेहेरखांब,या शिवाय रवी गौतम मेहेरखांब,फिर्यादी महिलेची जाऊ सुजाता हिचे दोन्ही भाऊ आदींनी गैर कायद्याची मंडळी जमवून आपल्याला राहते घरी मायगाव चौफुली धामोरी या ठिकाणी आपल्याला मारहाण केली आहे व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.अशा आशयाची फिर्याद रेखा अहिरे हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.घटनास्थळी सहाय्यक फौजदार ए.व्ही.गवसने यांनी भेट दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही गटावर धामोरी येथील लक्ष्मी आई मंदिराजवळ सामाजिक शांतता भंग केल्या प्रकरणी सुनील अहिरे,सुजाता अहिरे,मिलिंद अहीरे,रेखा अहिरे आदिविरुद्ध पो.कॉ.जयदीप गवारे यांनी गुन्हा दाखल केला आहे.व प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी नोंदणी पुस्तिका क्रं.३५४/२०२२ भा.द.वि.कलम ३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.डी.बोटे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close