गुन्हे विषयक
आपापसात हाणामारी,कोपरगावात चार जणांवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या काही तरुण व महिला आदींच्या टोळक्याने दुपारी ४.४० वाजेच्या सुमारास लक्ष्मीआई मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला आपआपसात शिवीगाळ करून गोंधळ घालून सामाजिक शांतता भंग केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी चार जणां विरुद्ध गुन्हा दखल केला आहे.त्यामुळे धमोरीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दि.११ सप्टेंबर रोजी दुपारी ४.४० वाजेच्या सुमारास धामोरी ग्रामपंचायत हद्दीत लक्ष्मी आई मंदिराजवळ रस्त्यावर काही तरुण व महिलांनी आपापसात शिवीगाळ व हाणामारी करून गोंधळ घातला असून सूचना देऊनही सामाजिक शांतता भंग केली आहे.यात आरोपी म्हणून सुनील अगस्ती अहिरे सुजाता सुनील अहिरेसह चोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरात गणेशोत्सव नुकताच शांततेत पार पडला आहे.त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नव्हता.मात्र गणेशोत्सव पार पडल्या नंतर तीन दिवसांनी दि.११ सप्टेंबर रोजी दुपारी ४.४० वाजेच्या सुमारास धामोरी ग्रामपंचायत हद्दीत लक्ष्मी आई मंदिराजवळ रस्त्यावर काही तरुण व महिलांनी आपापसात शिवीगाळ व हाणामारी करून गोंधळ घातला असून सूचना देऊनही सामाजिक शांतता भंग केली आहे.यात आरोपी म्हणून सुनील अगस्ती अहिरे सुजाता सुनील अहिरे दोन्ही रा.सुरेगाव,मिलिंद अगस्ती अहिरे,रेखा मिलिंद अहिरे,रा.धामोरी आदींवर गुन्हा दखल केला आहे.
दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.क्रं.३५३/२०२२ भा.द.वि.कलम १६० गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.एस.डी.बोटे हे करत आहेत.