निधन वार्ता
‘लोकगायीका’ मंदाबाई सोनवणे यांचे निधन!

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
महाराष्ट्राच्या मातीतील पारंपरिक लोककला आणि संस्कृतीचा सुगंध घराघरांत पोहोचवणाऱ्या प्रसिद्ध लोककलावंत मंदाबाई सोनवणे यांचे निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने लोककला विश्वावर तथा जागरण-गोंधळ परंपरेवर शोककळा पसरली आहे.आपल्या खणखणीत,पहाडी आणि तितक्याच गोड आवाजाने लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या ‘कोकिळे’चा आवाज आता अनंतात विलीन झाला आहे.

“ग्रामीण भागातून पुढे येत,पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे सोपे नव्हते.मात्र,मंदाबाईंनी आपल्या कलेच्या आणि जिद्दीच्या जोरावर हा प्रवास यशस्वी केला.खंडोबाची गाणी, देवीची पदे, वाघ्या-मुरळीची कला आणि पारंपरिक गोंधळ सादर करताना त्यांचा आवाज थेट ऐकणाऱ्याच्या काळजाला भिडायचा.त्यांच्या सादरीकरणात एक वेगळीच ऊर्जा असायची,ज्यामुळे श्रोते मंत्रमुग्ध होऊन जात.बदलत्या काळासोबत त्यांनी आपल्या कलेला नव्या पिढीपर्यंत पोहोचवले.त्यांच्या स्मृती बराच काळ जनतेच्या मनात गुंजी घालतील यात शंका नाही.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव (खडकी) येथील रहिवासी असलेल्या मंदाबाई सोनवणे यांनी आपली संपूर्ण हयात लोककलेच्या सेवेसाठी अर्पण केली.महाराष्ट्रात कुलदैवत खंडोबाच्या आणि आई भवानीच्या दरबारात सादर केल्या जाणाऱ्या ‘जागरण-गोंधळ’ या कलेला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांची ‘मंदाबाई सोनवणे जागरण गोंधळ पार्टी’ प्रचंड लोकप्रिय झाली होती.ग्रामीण भागातून पुढे येत,पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे सोपे नव्हते.मात्र,मंदाबाईंनी आपल्या कलेच्या आणि जिद्दीच्या जोरावर हा प्रवास यशस्वी केला.खंडोबाची गाणी, देवीची पदे, वाघ्या-मुरळीची कला आणि पारंपरिक गोंधळ सादर करताना त्यांचा आवाज थेट ऐकणाऱ्याच्या काळजाला भिडायचा.त्यांच्या सादरीकरणात एक वेगळीच ऊर्जा असायची,ज्यामुळे श्रोते मंत्रमुग्ध होऊन जात.बदलत्या काळासोबत त्यांनी आपल्या कलेला नव्या पिढीपर्यंत पोहोचवले.सोशल मीडिया आणि यूट्यूबच्या माध्यमातून त्यांची गाणी आणि गोंधळाचे व्हिडिओ देश-विदेशातील मराठी रसिकांपर्यंत पोहोचले.त्यांच्या अनेक व्हिडिओंना लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.”फेमस कोकिळा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदाबाईंचा आवाज ऐकण्यासाठी लोक तासनतास जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमांना गर्दी करायचे.त्यांच्या पश्चात त्यांची ही कला आणि वारसा त्यांची पुढची पिढी पुनमताई सोनवणे व सहकारी पुढे चालवतील अशी माहिती हाती आली आहे.
मंदाबाई सोनवणे यांच्या जाण्याने कोपरगाव परिसरासह संपूर्ण महाराष्ट्राने एक सच्चा,मातीशी जोडलेला आणि कलेप्रती प्रामाणिक असलेला लोककलावंत गमावला आहे.महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा जिवंत ठेवणाऱ्या अशा महान कलाकाराचे जाणे ही लोककलेची कधीही न भरून निघणारी हानी असल्याचे प्रतिपादन अरुण खरात यांनी केले आहे.


