जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

निधी संपला निळवंडे कालव्यांचे काम बंद होण्याच्या मार्गावर !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्ततर नगर जिल्यातील अवर्षणग्रस्त १९० गावांना वरदान ठरणाऱ्या व वर्तमानात मोठ्या गतीने सुरु असलेल्या ऊर्ध्व प्रवरा प्रकल्प-२ निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांचे काम आता निधी संपत आल्याने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती हाती आली असून या प्रकल्पाला आता तरी राज्य शासनाने तातडीने ११०० कोटी रुपयांची तरतूद करून या पन्नास वर्षांपासून प्रलंबित कालव्यांच्या कामास गती द्यावी अशी महत्वपूर्ण मागणी निळवंडे कालवा कृती समितीने एका निवेदनाद्वारे नुकतीच राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

महाआघाडीच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्री पदी आरूढ झाल्यावर नाशिक येथे मंत्रिमंडळाच्या अर्थसंकल्पीय पूर्व बैठकीत या प्रकल्पाचे कालवे करण्यासाठी ११०० कोटी रुपये तरतूद करणार असल्याची घोषणा केली होती.मात्र अर्थसंकल्पात केवळ १०५ कोटी रुपये अल्पस्वल्प तरतूद केल्याचे केवळ ऐकीवात आहेे.प्रत्यक्षात कागदावर अद्याप तरतुद दिसत नाही त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांत मोठी नाराजी पसरली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,अहमदनगर जिल्ह्यातील अप्पर प्रवरा-२(निळवंडे प्रकल्प) या प्रकल्पाला प्रथम मंजुरी दि.१४ जुलै १९७० रोजी मिळाली.आजता गायत या प्रकल्पाला पन्नास वर्ष उलटत आली आहे.मात्र तरीही हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही.कालव्यांची कामे आधी होणे अभीप्रेत असताना येथे धरणाची भिंत आधी व कालवे पन्नास वर्षातही होऊ शकले नाही.त्यामुळे या प्रस्तावित लाभक्षेत्राखालील १९० (अकोलेतील ८ गावांची वाढ धरून) दुष्काळी गावातील जवळपास ६८ हजार ८०० हेक्टर क्षेत्र शेती सिंचना पासून वंचित राहिले आहे.त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करीत आहे.शिवाय या भागात शेतकर्‍यांच्या मुलांना कोणी विवाहासाठी मुली देत नसल्याने मोठा गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे.या गावातील शेतकर्‍यांना शेती असूनही त्यांना खडी फोडण्यासाठी दुर्दैवाने जावे लागत आहे.या प्रकल्पाच्या कालव्यांचे काम जवळपास पन्नास टक्के बाकी आहे.त्यासाठी ११०० कोटी रुपयांच्या निधीची तातडीची आवश्यकता आहे.आपण या प्रश्नी ऑगष्ट २०१४ साली विद्यमान मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी या भागात अस्तगाव माथ्यावर जाहीर सभा घेऊन या प्रकल्पाला आपण निधी देऊ असे जाहीर आश्वासन दिले होते.याशिवाय आपण याच काळात शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत या भागातील शेतकर्‍यांवर पोलिसानी दि.१० ऑगष्ट २०१४ रोजी केलेल्या लाठी हल्ल्याचा निषेध केला होता.व शेतकर्‍यांच्या अन्यायाला वाचा फोडली होती.संगमनेर येथील जाहिर सभेत आपण या प्रकल्पाला निधी देण्याची घोषणा केलेली आहे.या खेरीज आपण महाआघाडीच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्री पदी आरूढ झाल्यावर नाशिक येथे मंत्रिमंडळाच्या अर्थसंकल्पीय पूर्व बैठकीत या प्रकल्पाचे कालवे करण्यासाठी ११०० कोटी रुपये तरतूद करणार असल्याची घोषणा केली होती.मात्र अर्थसंकल्पात केवळ १०५ कोटी रुपये अल्पस्वल्प तरतूद केल्याचे केवळ ऐकीवात आहेे.प्रत्यक्षात कागदावर अद्याप तरतुद दिसत नाही त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांत मोठी नाराजी पसरली आहे.व या प्रश्नी मुख्यमंत्री,काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या महोदयांना आपल्या घोषणेचा विसर पडला नसेल असा विश्वास वाटत असल्याचेही कालवा कृती समितीने म्हटले असून या कामी आज सरकारमध्ये असलेले राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या प्रकल्पाचे काम पुर्ण व्हावे यासाठी राहुरी तालुक्यात वेळोवेळी आंदोलने केली आहेत.त्यामुळे त्यांनाही या प्रश्नांची जाण असल्याची आठवण करून देऊन ते या प्रश्नाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास वाटत असल्याचे सांगून वर्तमान स्थितीत कालव्यांची कामे वेगाने सुरु असताना आता निधी संपुष्टात आला आहे.कामे अल्पावधीत बंद पडणार आहे.या बाबत निळवंडे कालवा कृती समितीने अड्.अजित काळे यांच्या मार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेत (१३३/२०१६) उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सरकारने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद करण्याचे लेखी हमी दिलेली आहे.त्यामुळे आपण जाहिर केल्या प्रमाणे या प्रकल्पाला तातडीने ११०० कोटी रुपयांची तरतुद करावी.अशी मागणी समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे यांनी शेवटी केली आहे.निवेदनावर कालवा कृती समितीहच अध्यक्ष रुपेंद्र काले, कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,उपाध्यक्ष सोन्याबापू उऱ्हे,संजय गुंजाळ,संघटक नानासाहेब गाढवे,सचिव कैलास गव्हाणे,वाल्मिक नेहे,माजी उपाध्यक्ष रमेश दिघे,गंगाधर रहाणे,दत्तात्रय शिंदे गुरुजी,तानाजी शिंदे,अशोक गांडूळे,अड्.योगेश खालकर,गोरख शिंदे,आदींच्या सह्या आहेत.निवेदनाच्या प्रति राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार,जलसंपदा मंत्री जयंत पाटील,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ,ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,कोपरगावचे आ.आशुतोष काळे आदींना पाठवल्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close