जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगाव शहराला तीन दिवसाआड पाणी द्या-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

गोदावरीत नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहुन नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे काठोकाठ भरले आहे,जलसंपदाने जून महिन्यापर्यंत चार आवर्तने देण्याचे आश्वासन दिले आहे.व रब्बीचे आवर्तन लागलीच सोडले असल्याने कोपरगाव शहरातील नागरिकांना तीन दिवसाआड पाणी द्यावे अशी मागणी येथील कार्यकर्ते व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल यांनी नुकतीच केली आहे.

चालुवर्षी कोपरगाव तालुक्यासह राज्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यमान झालें त्यामुळे अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहीले आहे.नाशिक जिल्ह्यातील कोपरगाव शहराला पाणी व शेती सिंचनाचे पाणी पुरवठा करणारे दारणा व गंगापूर आदी सर्व धरणे भरल्याने खाली जायकवाडीतून जवळपास ५० टी. एम.सी.पाणी सोडून द्यावे लागले आहे.

कोपरगाव शहराला जलसंपदा विभागाकडून यापूर्वी ५.९६ द.ल.घ.मी.पाणी मंजूर होते.मात्र राजकीय नेते आणि त्यांच्या सहकारी संस्था यांच्या कडून होणारी पाणी चोरी,साठवण क्षमतेचा अभाव,गळती,शहरातील चोवीस तास पाणी पूरवठा करणारे नळ,सदोष वितरण व्यवस्था आदी कारणामुळे शहरातील नागरिकांना कधीच पुरेसे पाणी मिळाले नाही.त्यामुळे निळवंडे धरणाचे गाजर दाखवून आपल्या निवडणुकांच्या मतांची बेगमी करण्याचा डाव तत्कालीन सत्ताधारी आमदारांनी आखला गेला होता.तो निळवंडे कालवा कृती समितीने सदर जलवाहिनी हि दुष्काळी शेतकऱ्यांवर नैसर्गिक न्यायाने अन्याय करणारी असल्याने आंदोलने व न्यायिक लढा करून हाणून पाडलाआहे.यावर उतारा म्हणून वर्तमान आ.आशुतोष काळे यांनी साठवण तलावाची निर्मितीवर भर दिला होता.व त्यासाठी १३१.२४ कोटींचा निधी मंजूर केला आहे.या शिवाय शहरासाठी पाणी कमी नसल्याचे जलसंपदा विभागाचे अहवाल असतानाही विरोधी आमदार कोल्हे आणि त्यांच्या समर्थकांनी विना कारण कावकाव केल्याने दि.२ डिसेंबर २०२१ ला ३.३२ द.ल.घ.मी.मंजुरी मिळवली होती.त्याचा कार्यारंभ आदेश दि.०५ जुलै २०२२ रोजी प्राप्त झाला असल्याने हे काम दोन वर्षात पूर्ण होणार आहे.(वर्तमानात हे काम बंद आहे)त्यामुळे हि समस्या संपुष्टात येणार आहे.
वर्तमानात नागरिकांना पिण्यासाठी सहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.कालव्यांना जलसंपदाच्या नागपूर येथील बैठकीनंतर दि.२६ डिसेंबर रोजी आवर्तन सोडण्याचे आदेश होऊन आठवडा उलटत आला आहे.तरीही पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आपल्या सहा दिवसाच्या आवर्तनात बदल केलेला नाही.हे खेदजनक आहे.

आपण या पूर्वी वर्तमान मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना पंधरा दिवसापूर्वी भेटून तशी मागणी केली होती.मात्र त्यांनी त्यावर काहीही कार्यवाही केलेली नाही असा खेद गंगवाल यांनी व्यक्त केला असून वर्तमानात किमान तीन दिवसाड पाणी मिळणे गरजेचे आहे.सरोदे मुख्याधिकारी असताना पाणी मिळत होते असा दावा हि त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केला आहे.व शहरातील नागरिकांना पूर्ववत पावसाळ्यात दिवसाड पिण्याचे पाणी मिळावे अशी मागणी शेवटी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल यांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close