शैक्षणिक
आता पालकांचे स्वप्न अधुरे राहणार नाही -…यांची अपेक्षा

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
सुशीलामाई काळे महाविद्यालयात ग्रामीण विद्यार्थ्यांची पदव्युत्तर शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध करून दिली असल्याने कोणाही पालकांचे स्वप्न अधुरे राहणार नाही असे प्रतिपादन चैताली काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“आ.आशुतोष काळेंच्या पुढाकारातून पूर्ण झाली असून पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे विशेषतः विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी महाविद्यालय प्रशासन कुठेही कमी पडणार नाही”-चैताली काळे,माजी संचालक,जिल्हा सहकारी बँक.
सुरेगाव येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे महाविद्यालयात २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेने एम.ए. (इतिहास),एम.कॉम.व एम.एस.सी.(केमिस्ट्री व बॉटनी) हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे.या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच प्रथम वर्षातील कला,वाणिज्य व विज्ञान या शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्वागत समारंभ नुकताच संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.

सदर प्रसंगी संस्थेचे इन्स्पेक्टर प्रा.नारायण बारे
,प्राचार्या डॉ.विजया गुरसळ,प्राध्यापक,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,” कोपरगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी शहरांकडे जावे लागायचे.अनेक वर्षांपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांची मागणी होती.ही मागणी आ. आशुतोष काळेंच्या पुढाकारातून पूर्ण झाली असून पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे विशेषतः विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी महाविद्यालय प्रशासन कुठेही कमी पडणार नाही तुमचे भविष्य घडवायचे हा एकच उदेश डोळ्यासमोर ठेवून संस्था काम करीत आहे. शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून,स्वतःचा सर्वांगीण विकास करण्याचे माध्यम आहे. त्यामुळे पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधेचा लाभ घेवून पुढील जीवनाच्या वाटचालीसाठी स्वतःला सक्षम करा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.
. यावेळी पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी केले तर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.साक्षी सैंदर व कु.पल्लवी कडलग यांनी केले तर उलस्थितांचे आभार प्रा.पांडुरंग मोरे यांनी मानले.पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.