जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

गुजरातला जोडणाऱ्या…या रस्त्याचे काम अखेर सुरू !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी )


   कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागाच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणारा पश्चिम भागातील दक्षिण-उत्तर असलेला राज्य मार्ग ७ वरील देर्डे फाटा ते भरवस फाटा तालुका हद्द या रस्त्यासाठी २३२ कोटी निधी मंजूर असून त्यातून या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन चांडगुडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

“वर्तमानतस्थितीत देर्डे फाटा ते शहाजापूर पर्यंत रस्त्याचे काम योग्य पद्धतीने सुरु असून जून अखेर प्राथमिक स्वरूपाचे काम पूर्ण होईल व त्यानंतर सिमेंट कॉंक्रीटचे मजबूत काम होणार आहे”- सचिन चांदगुडे,संचालक,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी  साखर कारखाना,गौतमनगर.

   गुजरात राज्यातून शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांसाठी,कोपरगाव तालुक्यासह राहाता,शिर्डी,राहुरी आदी तालुक्यातून वणीच्या सप्तशृंगीगडावर जाण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आपला शेतमाल लासलगाव,बसवंत पिंपळगाव आदी कृषी उत्पन्न बाजार समितीत घेवून जाण्यासाठी महत्वाच्या असलेल्या देर्डे फाटा ते भरवस फाटा तालुका हद्द या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती.त्यामुळे या रस्त्याच्या रहदारीवर अवलंबून असणाऱ्या देर्डे चांदवड पासून ते मढी,शहाजापूर,सुरेगाव,वेळापूर,कारवाडी,मंजूर,चासनळी, मोर्वीस,धामोरी आदी गावातील रस्त्याच्या दुतर्फा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प होवून बसले होते.अनेक वेळा विनवण्या,लेखी अर्ज करूनही या रस्त्याकडे साफ दूर्लक्ष करण्यात आले होते.परंतु २०१९ ला आ.आशुतोष काळे यांनी निवडून येताच प्रतिकूल परिस्थितीत सलग पाठपुरावा करून राज्य मार्ग ७ वरील देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्यासाठी अगोदर १० कोटी व त्यानंतर या रस्त्याची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी तब्बल २३२ कोटी निधी आ.काळे यांनी आणला असून या रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.


वर्तमानातस्थितीत देर्डे फाटा ते शहाजापूर पर्यंत रस्त्याचे काम योग्य पद्धतीने सुरु असून जून अखेर प्राथमिक स्वरूपाचे काम पूर्ण होईल व त्यानंतर सिमेंट कॉंक्रीटचे मजबूत काम होणार आहे.त्यामुळे गेल्या काही दशकापासून त्रास सोसणाऱ्या देर्डे चांदवड,मढी,शहाजापूर,सुरेगाव,वेळापूर,कारवाडी,मंजूर,चासनळी,मोर्वीस,धामोरी आदी गावातील नागरिकांची कायमची अडचण दूर होवून कोपरगाव तालुक्याचा पश्चिम भाग देखील रस्त्याच्या बाबतीत लवकरच कायमस्वरूपी समृद्ध होणार असल्याचे सचिन चांदगुडे यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close