जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

सृष्टीनियंता परमेश्वर कोणाच्याही संपत्तीला भुलत नाही-…या महाराजांचे प्रतिपादन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   सुष्टीचा चालक आणि परमेश्वर हा कोणत्याही संपत्तीला भुलत नाही तो अनेक आकाश गंगेचा मालक आहे तो केवळ प्रेमाला व भक्तांच्या भक्तीला भुलत असल्याचे प्रतिपादन आनंदी येथील ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम यांनी कोपरगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र शहापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

श्री क्षेत्र शहापूर येथे किर्तन करताना ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम दिसत आहे.

 

सदर प्रसंगी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम यांनी आपल्या किर्तन सेवेशी श्री क्षेत्र पैठण येथील शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा
  “जो परिपुर्ण परब्रम्ह व्यापक गे माये,
गोकुळीं गाई चारिताहे,
  “पहा जो भुलला भक्ती प्रेमासी”
“शिदऱ्या चोरून खाय वेगेसी”
हा अभंग घेतला होता.त्यावर विवेचन केले आहे.

 

सदर किर्तन सेवेत तल्लीन झालेला भाविक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

 

  कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र शहापूर येथे संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा व श्री क्षेत्र ताहाराबाद पायी दिंडी सोहळा तपपुर्ती सोहळा व हनुमान मंदिर वर्धापन दिनानिमित्त आळंदी येथील ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे मर्गदर्शनाखाली व शहापुर ग्रामस्थ व भाविक भक्तांच्या मदतीने अखंड हरींनाम सप्ताहाचा सांगता ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने आज सकाळी झाली त्यावेळी ते बोलत होते.त्यावेळी त्यांनी आपल्या किर्तन सेवेशी श्री क्षेत्र पैठण येथील शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा
  “जो परिपुर्ण परब्रम्ह व्यापक गे माये,
गोकुळीं गाई चारिताहे,
  “पहा जो भुलला भक्ती प्रेमासी”
“शिदऱ्या चोरून खाय वेगेसी”
हा अभंग घेतला होता त्यावेळी ते बोलत होते.

श्री क्षेत्र शहापूर येथे किर्तन सेवेस उपस्थित असलेला श्रोतुवर्ग.

सदर प्रसंगी संत तुकाराम महाराज त्रिशतकीय अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दारू,गांजा,अन्य एखादा दुर्गुण तरी सोडा,किमान पाचशे वृक्ष लावा असे आवाहन उपस्थितांना केले आहे.

   सदर प्रसंगी ह.भ.प.शिवचैतन्य महाराज देहूकर,ह.भ.प.ज्ञानेश्वरदास महाराज,बबन महाराज गव्हाणे,जनार्दन महाराज जगताप भरवस,गजानन महाराज,बबन महाराज गाडेकर महाराज,भास्कर महाराज,संत महिपती महाराज तहाराबाद येथून संजय महाराज शेटे,मनोहर महाराज ढमाले,कोपरगावचे आ.आशुतोष काळे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे सुपुत्र रोहित वाकचौरे,भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात,युवकचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे,भरवसचे सरपंच यादव गीते पाटील,राहुल रोहमारे,प्रवीण शिंदे आदींसह मोठ्या संख्येने शहापूर आणि परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते.

सदर प्रसंगी संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.शिवचैतन्य महाराज देहूकर यांचा सत्कार करताना आ.आशुतोष काळे,व माजी आ.स्नेहलता कोल्हे दिसत आहे.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”परमेश्वरास शरण जाणारा भक्त आवडत असतो तो त्याला आपला मानतो.चांगल्या भक्ताची तो चोरी करून खातो पण संपत्तीचे अभद्र प्रदर्शन करणाऱ्याकडे तो ढुंकुनही पहात नाही.शबरीचे बोरे आनंदाने खातो.पांडवांची सेवा करतो,संत एकनाथांच्या घरि पाणी भरतो;पण जेथे भक्ती नाही त्याकडे दुर्लक्ष करतो.सज्जनांच्या घरी मागून खातो पण दुर्जनाच्या घरी मात्र चुकूनही जात नाही.त्यावेळी त्यांनी तानसेन आणि महाराज अकबर यांचे उदाहरण देऊन त्यांच्या गुरूच्या गायनाने वसंतात पालवी फुटत होती मात्र ताणसेनाच्या गायनाने कान तृप्त होत होते.मात्र बिरबलास अकबराने विचारले ती गेल्यावर असे का होत नाही त्यावेळी त्यांनी,” माझे गुरू परमेश्वरासाठी गातात तर मी पैशासाठी गातो” असे विश्लेषण करून देव भावाच्या भुकेला असल्याचे सांगितले असता भक्तांनी टाळ्यांचा गडगडाट केला असल्याचे दिसून आले आहे.
   त्यावेळी त्यांनी भगवंताच्या वेणू नादाला कशा गोपिका भूलल्या याचे साग्रसंगीत वर्णन केले आहे.त्यासाठी त्यांनी विविध उदाहरणे भाविकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यावेळी त्यांनी तुकाराम महाराज त्रिशतकीय अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दारू,गांजा,अन्य एखादा दुर्गुण तरी सोडा,किमान पाचशे वृक्ष लावा असे आवाहन उपस्थितांना केले आहे.या कार्यक्रमाची आठवण तरी राहील असे आवाहन केले आहे.

   दरम्यान हिंदू धर्मातील गायीचे महत्व त्यांनी विषद करताना त्यांनी,”माणसाने दारात तुळस असावी,व गाय हा प्राणी चोवीस तास ऑक्सिजन सोडतो.गाय आणि तुळस हे आरोग्याचे लक्षण मानले जाते.गाय मूत्राचे महत्व समजावून सांगितले त्यांनी त्यातून कॅन्सर बरा होतो असे आपल्या वाणीतून सांगितले आहे.गायीच्या दर्शनाने ३३ कोटी देवांचे दर्शन होते.त्यावेळी त्यांनी मथुरेतील कृष्ण लीला आपल्या रसाळ वाणीतून वर्णन केल्या आहे.
  दरम्यान सकाळी १०.२० वाजता किर्तनास सुरुवात झाली होती तर दुपारी एकच्या सुमारास ते वाजता संपुष्टात आले आहे.त्यावेळी त्यांनी संत महिपती महाराज यांच्या पादुका श्री क्षेत्र तहाराबाद येथून पंढरपूर नंतर पहिल्यांदा शहापूर येथे आणण्याचे भाग्य लाभले असल्याचे सांगून त्याचे श्रेय भागीकांना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

   सदर प्रसंगी सात दिवस सेवा केल्या प्रकरणी शहापूर सप्ताह मंडळाचे,तरुण मंडळी,महिला,संयोजक आदींचे ज्ञानेश्वर महाराज यांनी तोंडभरून कौतुक केले आहे.व त्यांनी विकृती ऐवजी संस्कृती पोहचवली असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.सदर प्रसंगी सदर सप्ताहासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आहे.

   सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.तर माजी.आ.स्नेहलता कोल्हे यांनी उपस्थित संत सज्जन आणि उपस्थित भाविकांचे व आयोजकांचे आभार मानले आहे.त्यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले होते त्याचा अनेकांनी लाभ घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close