जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

विकास पाहण्यासाठी आधी  डोळे तपासण्याची गरज-टीका

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावच्या नागरिकांना भविष्यात पिण्याचे पाणी मिळण्यात महत्वपूर्ण ठरणाऱ्या साठवण तलाव क्रं ५ तलावाचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी मार्गी लावला असून १३१.२४ कोटी निधीतून या तलावाचे काम सुरु झाले आहे.मात्र ज्यांच्याकडे विकास पहायची दृष्टी नाही ते बेताल आरोप करून जनतेची दिशाभूल करुन स्वतःची व जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी नुकताच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे.

“कोपरगावच्या नागरिकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला ५ नं. साठवण तलावाचा देखील समावेश असून १३१.२४ कोटी निधीतून या तलावाचे काम सुरु झाले आहे.मात्र ज्यांच्याकडे विकास पहायची दृष्टी नाही ते बेताल आरोप करून जनतेची दिशाभूल करीत आहेत.ज्यांनी न्यायालयात उलतसुलात याचिका दाखल करून जनतेची दिशाभूल केली त्यांना विकास पाहण्याची दृष्टी नाही त्यांनी डोळ्याच्या शिबिरात स्वत:चे डोळे तपासून घ्यावेत”-सुनील गंगूले,अध्यक्ष,कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस.

कोपरगाव शहरासाठी यापूर्वी चार साठवण तलाव असताना व जलसंपदा विभागाकडून पुरेसे पाणी मंजूर असतानाही शहराला पाणी कमी आहे असा जावई शोध लावून त्यावर आपल्या राजकीय फायद्यासाठी बनाव उभा करणाऱ्या व ४२ कोटींच्या केंद्रीय पाणी योजनेची वासलात लावणाऱ्या व कारण नसताना निळवंडे धरणाच्या जलवाहिणीचे गाजर दाखविणाऱ्या नेत्यांना चाप लावण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी शहरासाठी नवीन पाणी मंजुर केले होते.या शिवाय साठवण तलावाची उणीव दूर करण्यासाठी कोपरगाव शहरासाठी नूतन साठवण तलावासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत १३१.२४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.त्याची निविदा नुकतीच जाहीर झाली असून सदरचे काम गुजरात मधील सुरत येथील ‘लक्ष्मी कन्ट्रक्शन’ या कंपनीस दिले आहे सदर काम चाचणी कालावधीसह दोन वर्षात दि.३० जून २०२४ पूर्वी पूर्ण करावयाचे आहे.आता सदर कंपनीने पाच क्रमांकाच्या तलावातील पाणी उपसा करण्यास प्रारंभ केला आहे.त्यावरून शहरात आरोप प्रत्यारोपाचे रणकंदन सुरु झाले आहे.त्यात कोपरगाव शहरातील सत्त्ताधारी गटाच्या एका शहराध्यक्षांने आपले प्रसिद्धी पातर्क प्रसिद्धीस देऊन नुकतेच आपले हसे करुन घेतले आहे.त्यावरून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी त्यास उत्तर दिले आहे.

त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,”२०१४ ते २०१९ या पाच वर्षात केंद्रात व राज्यात त्यांच्या पक्षाचे सरकार असतांना देखील जिरवा जिरवीचे राजकारण करण्यात धन्यता मानणारे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते देखील आभासी जगात वावरत होते.मात्र त्यांना या आभासी जगातून बाहेर काढण्याचे काम कोपरगाव मतदार संघातील जनतेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत करून आ.आशुतोष काळे यांच्या हातात मोठ्या विश्वासाने विकासाची सूत्र सोपविली.त्या विश्वासाला कुठेही तडा जावू न देता अडीच वर्षातच त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या बहुतांश आश्वासनांची पूर्तता केली असून अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लावले आहेत.

कोपरगावच्या नागरिकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला ५ नं. साठवण तलावाचा देखील समावेश असून १३१.२४ कोटी निधीतून या तलावाचे काम सुरु झाले आहे.मात्र ज्यांच्याकडे विकास पहायची दृष्टी नाही ते बेताल आरोप करून जनतेची दिशाभूल करीत आहेत.ज्यांनी न्यायालयात उलतसुलात याचिका दाखल करून जनतेची दिशाभूल केली त्यांना विकास पाहण्याची दृष्टी नाही त्यांनी डोळ्याच्या शिबिरात स्वत:चे डोळे तपासून घ्यावेत असा टीकात्मक सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी सत्ताधारी गटाचे शहराध्यक्ष काले यांना शेवटी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close