जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या शहरात गुन्हेगारी वाढली,आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार-माहिती

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहर आणि तालुक्यात अवैध व्यवसाय व गंभीर गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढल्याप्रकरणी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लक्ष वेधणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे माजी प्रखंड मंत्री रविकिरण ढोबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

“आगामी काळात नाशिक येथे महाकुंभ येत असून या पार्श्वभूमीवर या घटनांवर नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे.शिर्डी सारखे देश विदेशात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून त्या पार्श्वभूमीवर या घटनाकडे डोळेझाक करून चालणार नाही.म्हणून आपण याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे”-रविकिरण ढोबळे,माजी
प्रखंड मंत्री,पश्चिम महाराष्ट्र प्रमुख.

   कोपरगाव शहर आणि तालुक्यात विविध गुन्हे वाढत असल्याचे वारंवार उघड होत आहे.घरातील लूट करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी काकडीतील आई,बाप,आणि अविवाहित मुलाचा असे एकूण तीन बळी घेतले असताना शहरातील मध्यवस्तीत असलेल्या सचिन वॉच या कंपनीतील घड्याळाची भल्या पहाटे ३० लाख रुपयांची लूट केली होती.त्यातील काही आरोपी पकडले आहे तर अद्याप काही आरोपी नेपाळमध्ये फरार झाले आहेत.शहरात आकडे,मटका आदी अवैध व्यवसायाचा महापूर,अवैध वाळूचोरी,गावठी कट्टे,बंद पडलेले रेशन किंवा बंद करण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांच्या नावावर मोठा रेशन घोटाळा,लाच लुचपत विभागाच्या दर दोन महिन्याला पडणाऱ्या धाडी त्यात अडकवणारे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.अशातच समोरासमोर गोळीबाराच्या घटना घडून शहरातील शांतता भंग होण्याच्या घटना वाढल्या असताना आता पुन्हा चोरट्यांनी उचल खाल्ली असून काल रात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी रेव्ह्यून्यू कॉलनी नजीक खडकीरोडला लागून रहिवासी असलेल्या डॉ.विवेकानंद सूर्यवंशी यांच्या घरात कोणी नाही यावर पाळत ठेवून त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील कपाटाची उचकपाचक करून त्यातील ०३ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम व दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने त्यात रींगा आणि सोन्याची चेन,कानातील टॉप्स असा अवैज चोरट्यांनी लंपास केला आहे.शिवाय कोकमठाण या ठिकाणी राहाता तालुक्यातील डोऱ्हाळे येथील उच्च शिक्षित तरुणाचा पुणे येथून आणून त्याचा खून केला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.गोवंश हत्या अद्याप बंद झालेली नाही गोदावरी नदी रक्ताने दूषित होत आहे.लोकप्रतिनिधींचे निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळाल्याने लक्ष राहिले नाही ते आपल्या धुंदीत मग्न असल्याचे दिसत आहेत.

   दरम्यान आगामी काळात नाशिक येथे महाकुंभ येत असून या पार्श्वभूमीवर या घटनांवर नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे.शिर्डी सारखे देश विदेशात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून त्या पार्श्वभूमीवर या घटनाकडे डोळेझाक करून चालणार नाही.म्हणून आपण याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती रविकिरण ढोबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्यामुळे आगामी काळात यावर काही प्रमाणावर नियंत्रण येणार का ? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close