जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पूर्व भागातील दुष्काळी गावांची ओळख पुसणार-आश्वासन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी मागील अनेक वर्षापासून सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसत असल्यामुळे पूर्व भागाच्या अनेक गावांची दुष्काळी गावे म्हणून अशी ओळख तयार झाली असून पूर्व भागातील शेतीसाठी शाश्वत पाणी उपलब्ध करून देवून दुष्काळी पूर्व भागाची ओळख पुसणार असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कंर्यक्रमात बोलताना केले आहे.

पूर्व भागातील”रस्ते, वीज, पाणी या त्रिसूत्रीवर भर देणार आहे. नियोजनबध्द विकासकामे करुन मतदार संघाच्या दुष्काळी भाग म्हणून असलेल्या गावांची दुष्काळी ओळख पुसण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत.त्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत असून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोपरगाव विधानसभा मतदार संघाला गतवैभव प्राप्त करून देणार आहे-आ.काळे

कोपरगाव तालुक्यातील भोजडे, गोधेगाव,लौकी,घोयेगाव,धोत्रे,वारी व परिसरातील शेतीला लाभदायक ठरणाऱ्या भोजडे येथील कोळ नदीवरील साखळी बंधाऱ्याचे जलपूजन व वृक्षारोपण आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी भाऊसाहेब सिनगर, कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, कोपरगाव राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, बाळासाहेब सिनगर,सरपंच दत्तात्रय सिनगर,शरद जोशी, फारुख पटेल, गणेश घाटे, माधव खटकाळे, ज्ञानेश्वर सिनगर,आप्पासाहेब धट, बाळासाहेब मंचरे, सुधाकर वादे, धोंडीराम धट, आनंदराव सिनगर,दिगंबर बोर्डे, दौलत गलांडे, भाऊराव सांगळे, शिवाजी नाईकवाडे, दिलीप सिनगर, राजू घनघाव, किरण आहेर, ग्रामसेवक संग्राम बोर्डे आदी उपस्थित होते.


पुढे बोलतांना ते म्हणाले की,”रस्ते, वीज, पाणी या त्रिसूत्रीवर भर देणार आहे. नियोजनबध्द विकासकामे करुन मतदार संघाच्या दुष्काळी भाग म्हणून असलेल्या गावांची दुष्काळी ओळख पुसण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत.त्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत असून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोपरगाव विधानसभा मतदार संघाला गतवैभव प्राप्त करून देणार आहे.घोयेगाव लौकी हद्दीपासून ते वारी भोजडे हद्दीपर्यंत बंधारे बांधुन परिसराच्या शेती सिंचनाचा प्रश्न सुटावा यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी दिले. कोळ नदीवर या बंधाऱ्यामध्ये गेल्या काही वर्षात पाणी सोडण्यात आले नव्हते त्यामुळे परिसरातील शेतीचे भवितव्य धोक्यात आले होते. समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीला कोळ नदीवरील या बंधाऱ्याचे खोलीकरण करण्याचे आदेश देवून व पाटबंधारे विभागाकडून सुरु असलेल्या आवर्तनातून हा बंधारा भरण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील जवळपास चारशे ते पाचशे हेक्टर क्षेत्राला या बंधाऱ्याचा लाभ होणार असून परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close