जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
संपादकीय

दलीत चळवळीत वाढली अपप्रवृत्ती !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
   
   देशभर देशाचे घटनाकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना कोपरगाव शहरात मात्र या उत्साहास गालबोट लागले असून जयंतीच्या रात्री ११.४० वाजेच्या सुमारास दोन गटात चॉपरणे एकमेकावर वार झाले असून यात शुभम साहेबराव शिंदे,(वय-२९) व योगेश संजय शिंदे दोघे रा.सुभाषनगर व विजय भास्कर पाटोळे हे तीन जण जखमी झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात १० जणांवर गुन्हा दाखल झाला असला तरी याला राजकीय कंगोरे असल्याचे बोलले जात असून शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष पदावरून हा राडा होत असल्याचे अनेकांचे  म्हणणे असले तरी याचे खंडन माजी शहराध्यक्ष जितेंद्र रणशुर यांनी केल्याने यातील गौडबंगाल आणखी वाढले आहे.त्यामुळे यातील,’दूध का दूध आणि पाणी का पाणी ‘ करण्याची जबाबदारी पोलिस अधिकाऱ्यांवर वाढली असल्याचे दिसत आहे.

  

‘दलीत समाज विविध गटाततटात विभागाला गेल्याने स्थानिक नेतृत्व याचा गैरफायदा घेताना दिसत आहे.त्याला कोपरगाव तालुका अपवाद नाही येथील दोन घराणी त्यांना खेळवत आहे.ज्या डॉ.आंबेडकरांनी त्यांना स्वाभिमान शिकवला तो तालुक्यात खुंटीला टांगून त्यांच्या जयंतीला मोठ्या देणग्या गोळा करून मोठा उत्सव साजरा केला जातो.त्यातील हिशेब फारच तुरळक किंवा अपवादात्मक स्थितीत देताना दिसत आहे.मात्र तो उत्सव छोटा का असेना पण स्वाभिमानाने स्वखर्चाने केला तर त्याला मोठी आणि वेगळी उंची लाभू शकते.

   दलित समाज हा संघटित आणि असंघटित दोन्ही स्वरूपाने अस्तित्वात आहे.दलित समाज हा ऐतिहासिकदृष्ट्या सामाजिक,आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या उपेक्षित आणि बहिष्कृत होता,त्यामुळे काही प्रमाणात असंघटित होता.मात्र,वेळोवेळी दलित समाजात जाणीव जागृत झाली आणि त्यांनी स्वतःच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा दिला, ज्यामुळे काही प्रमाणात दलित समाज संघटित झाला आहे.दलित समाजात जागृती निर्माण झाली आणि त्यांनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला.दलित चळवळीत अनेक नेते आणि विचारवंत होते,ज्यांनी दलित समाजाला एकत्र आणले आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्यास प्रेरित केले.घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला एकत्र आणून त्यांना शिक्षण,संघटन आणि संघर्ष यावर आधारित विचार दिला.त्यांच्या ‘शिक्षित करा,संघटित करा,संघर्ष करा’ या विचाराने दलित समाजाला एक नवीन दिशा दिली.दलित चळवळीमुळे दलित समाज अधिक संघटित झाला.दलित पक्षांची स्थापना झाली,दलित संघटना स्थापन झाल्या,आणि दलित साहित्य व कला यांमध्येही दलित अनुभवांना स्थान मिळाले.भारतीय संविधानाने दलित समाजाला विशेष अधिकार दिले.ज्यामुळे त्यांना सामाजिक आणि राजकीय समानता प्राप्त झाली.आजचा दलित समाज आज दलित समाज अधिक सक्षम आणि जागरूक आहे.त्यांनी शिक्षण,व्यवसाय आणि राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान मिळवले आहे.दलित समाजात अनेक संघटना आहेत,जे दलितंच्या हक्कांसाठी काम करतात.दलित साहित्य आणि कला दलित अनुभवांना व्यक्त करतात.दलित राजकारण दलित समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करते.दलित समाजातील काही सदस्य अजूनही सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत.त्यांना शिक्षणाचे आणि रोजगाराची योग्य संधी मिळत नाहीत.जातिव्यवस्था आणि सामाजिक भेदभावाला आजही सामोरे जावे लागते हे वास्तव आहे.दलित समाज हा ऐतिहासिकदृष्ट्या असंघटित होता,पण वेळोवेळी दलित चळवळीमुळे आणि सामाजिक बदलांमुळे तो अधिक संघटित झाला आहे.दलित समाजात अजूनही अनेक समस्या आहेत,पण दलित समाज आपल्या हक्कांसाठी लढत आहे आणि एक मजबूत आणि सक्षम समाज म्हणून पुढे येत आहे.त्याला कोपरगाव तालुका अपवाद नाही.येथे राज्यात आर.पी.आय.आठवले गटास मानणारा मोठा वर्ग कोपरगाव तालुक्यासह सर्वत्र दिसून येतो.डॉ.बाबासाहेबांनी त्यांना ‘शिक्षित व्हा,संघटित व्हा’ हा मंत्र दिला आहे.त्यामुळे हा वर्ग चांगल्यापैकी संघटित झाला असला तरी ज्या वर्गाने आरक्षणाचा लाभ घेतला ते वरच्या श्रेणीत गेले आहे.मात्र आजही उपेक्षित वर्ग मोठा असल्याचे दिसून येत आहे.त्यांना आपली रोजी रोटी पलीकडे दुसऱ्या घटनांशी तथा राजकीय ऊनीदूनी काढणाऱ्या घटकांशी काही देणेघेणे नाही असे दिसून येत आहे.मात्र हा समाज विविध गटाततटात विभागाला गेल्याने स्थानिक नेतृत्व याचा गैरफायदा घेताना दिसत आहे.त्याला कोपरगाव तालुका अपवाद नाही येथील दोन घराणी त्यांना खेळवत आहे.ज्या डॉ.आंबेडकरांनी त्यांना स्वाभिमान शिकवला तो तालुक्यात खुंटीला टांगून त्यांच्या जयंतीला मोठ्या देणग्या गोळा करून मोठा उत्सव साजरा केला जातो.त्यातील हिशेब फारच तुरळक किंवा अपवादात्मक स्थितीत देताना दिसत आहे.मात्र तो उत्सव छोटा का असेना पण स्वाभिमानाने स्वखर्चाने केला तर त्याला मोठी आणि वेगळी उंची लाभू शकते.आज तेवढे आर्थिक स्थैर्य त्यांना नक्कीच आले आहे.मात्र त्याबाबत कोणी त्यांना दिशा देताना दिसत नाही हे मोठे दुर्दैव दिसत आहे.ज्या लाचारीची लागण मराठा समाजाला झाली आहे.तीच लस या समाजाला लागली आहे.त्यामुळे मराठा समाजाची जी दयनीय स्थिती आहे तीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे.मात्र फरक इतका आहे की.आरक्षण आणि एट्रोसिटी हे दलीत समाजाला मोठे संरक्षण कवच त्यांना लाभले असल्याने त्याचा फायदा होताना दिसत आहे.तर अन्य समाजाला डोकेदुखी ठरताना दिसत आहे.मात्र हे कधीना कधी काढले जावू शकते त्यासाठी त्यांनी या संधीचा फायदा घेणे उचित असताना त्या समाजातील तरुण अवैध व्यवसाय,गुन्हेगारी आणि राजकीय दलदलीत फसलेले आढळून येत आहे.

  

पूर्वी वेस येथील स्व.वल्लभराव खंडीझोड,पोहेगाव येथील स्व.नाना भालेराव आदी स्थानिक नेते मंडळी नेतृत्व दिशा देणारे होते.शिवाय फर्डे वक्ते होते ती उणीव वर्तमानात नक्कीच दिसत आहे.वर्तमान दलीत नेते दिपक गायकवाड हे संयमी नेतृत्व म्हणून जिल्हा आणि राज्याला परिचित आहे.मात्र त्यानी आवाहन करूनही त्यांच्या डोक्यावरून पाणी जाताना दिसत आहे.त्यामुळे ही चळवळ भरकटणार का ?असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.

  दरम्यान कोपरगाव शहरातील अनेक तरुण वाळू आणि रेशन घोटाळ्यात आढळून येत आहे.वर्तमानात दोन गटात झालेली हाणामारीला हा मोठा कंगोरा असल्याचे दिसून येत आहे.त्यात ले त्यात अडीच वर्षापूर्वी शहर आणि तालुक्यात नवीन पदाधिकारी नेमणूक हा कळीचा मुद्दा ठरल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे,’ तू बडा की, मै बडा’ असा खेळ शहरात सुरू झाला असल्याचे भांडणे वरचेवर होऊ लागले आहे.वर्तमानात कालखंडात जे भांडणे झाले आहे.त्यात बरीच नावे घटनास्थळी नसताना त्यांची नावे गोवली गेली असल्याचा दोन्ही गटाकडून दावा आहे.याबाबत गेली दोन दिवस दोन्ही विरोधी गटाकडून शिष्ट मंडळे पोलिस प्रशासनास निवेदने देत आहे व निर्दोष कार्यकर्त्यांची नावे वगळा अशी विनंती करताना दिसत आहे.त्यावर पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे,”मग मारामाऱ्या कोणी केल्या ? त्यावर ही मंडळी चूप होत आहे.पूर्वी वेस येथील स्व.वल्लभराव खंडीझोड,पोहेगाव येथील स्व.नाना भालेराव आदी स्थानिक नेते मंडळी नेतृत्व दिशा देणारे होते.शिवाय फर्डे वक्ते होते ती उणीव वर्तमानात नक्कीच दिसत आहे.वर्तमान दलीत नेते दिपक गायकवाड हे संयमी नेतृत्व म्हणून जिल्हा आणि राज्याला परिचित आहे.मात्र त्यानी आवाहन करूनही त्यांच्या डोक्यावरून पाणी जाताना दिसत आहे.त्यामुळे ही चळवळ भरकटणार का ?असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.

  माजी शहराध्यक्ष जितेंद्र रणशुर यांनी आर.पी.आय.ला सोडचिठ्ठी दिली आहे.त्यानंतर त्यांनी आपला पक्ष जाहीर केलेला नाही.पण त्यांनी माजी आ.कोल्हे म्हणजेच ईशान्य गडास सोडलेले नाही म्हणजे ते भाजप बरोबर आहे हे उघड आहे.त्यात त्यांचे नाव गोवले गेले असा त्यांचा दावा आहे.त्यांनी याचे खंडन केले आहे.आपले नातेवाईक असलेले शिंदे यांना सोडण्याचा प्रयत्न केला हा आपला गुन्हा आहे का ? असा त्यांचा सवाल आहे.त्यामुळे आता कोपरगाव शहर पोलिस अधिकाऱ्यांना हा तिढा सोडवावा लागणार आहे हे उघड आहे.याचे ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ करावे लागणार आहे.ते त्याबाबत लवकरच आपले कर्तव्य निभावतील असा आशावाद करायला काय हरकत आहे ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close