गुन्हे विषयक
…”त्या”गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट,मोठा कट उघड होण्याची भीती !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरानजीक असलेल्या खडकी परिसरातून नऊ तलवारी शहर पोलिसांनी जप्त केल्या असून या ठिकाणी शस्त्र तयार करण्याचा कारखाना असल्याचा संशय पोलिसांना आहे.याप्रकरणी दोन जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला तरी अद्याप यातील आरोपी मोकाट असून या गुन्ह्यात नेमके किती आरोपी आहेत याचा तपास लागलेला नाही; यात एखादा मोठा कट असु शकतो असा संशय असून त्यामुळे शहरातील नागरिकांत या प्रकरणी भीतीचे वातावरण पसरले आहे.

या पूर्वीही कोपरगाव शहरात पोलीस निरीक्षक पदी मधुकर औटे असताना कोपरगाव बस स्थानकात दोनदा गावठी कट्टे असलेल्या दोन बॅगा वेगवेगळ्या वेळी बेवारस स्थितीत सापडल्या होत्या.कोपरगाव शहर आणि तालुक्यात वाळू चोरांकडे मोठ्या प्रमाणावर हे कट्टे असल्याचे वारंवार सिद्ध होतं असून पोलिसांना याचा शोध घेणे गरजेचे बनले आहे.त्यातून मोठा कट उघड होऊ शकतो.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”रविवारी २८ जूलै रोजी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की,”कोपरगाव शहरातील खडकी भागात राणी ज्ञानेश्वर पवार यांच्या घराच्या पाठीमागे त्यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये धारधार शस्त्र,तलवारी बनवणारा कारखाना सुरु आहे.त्यावरून पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मधुकर भांगरे व किशोर कुळधर हे पाहाणी करण्यासाठी गेले तेव्हा पोलीस आल्याची चाहुल लागतात तलवारी तयार करणारे किरण सोळसे,बक्या ऊर्फ महेश म्हस्के हे दोघे तेथून आपल्या हातील मोबाईल व बनवलेल्या ९ तलवारीसह इतर साहीत्य तिथेच टाकुन पळवून गेले आहे.
दरम्यान पोलिसांना हत्यार बनवणारा कारखाना असल्याची खात्री पटताच त्यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना घटनेची माहीत दिली होती.पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा,सहायक पोलीस निरीक्षक मयुर भामरे,पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून दोन पंचासमक्ष पंचनामा केला असता तिथे ९ तलवारी,हत्याराला धार देण्यासाठी लागणाऱ्या ७ चकत्या,लोखंडी ऐरण,हातोडा,दोन मोबाईल असा एकूण १८ हजार ९०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान हे पत्र्याचे शेड हे राणी ज्ञानेश्वर पवार यांच्या मालकीचे असून तिथे तात्पुरत्या स्वरुपात किरण सोळसे व महेश म्हस्के दोघे (रा.खडकी) यांना भाड्याने दिल्याचे समजले. पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मधुकर भांगरे यांच्या फिर्यादीवरून किरण सोळसे व महेश म्हस्के यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान कोपरगाव शहरातील वातावरण संवेदनशील निर्माण झाले असून अनेक घटक त्याला कारणीभूत असून त्यातून गंभीर गुन्हा घडून येऊ शकत असल्याने यातील गुन्हेगार पकडणे गरजेचे आहे.मात्र पोलिसांना अद्याप हाती लागले नाही ते फरार झाले असून त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी कोणाच्या आदेशाने हे उद्योग केले आहे.त्यातून ते काय साध्य करून इच्छित होते.त्यातून शहरात काही विघातक घटना घडणार होती का असे अनेक सवाल निर्माण होत आहे.त्यांची उत्तरे शहर पोलिसांना शोधावी लागणार असून त्यातून एखादा कट उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या पूर्वीही कोपरगाव शहरात पोलीस निरीक्षक पदी मधुकर औटे असताना कोपरगाव बस स्थानकात दोनदा गावठी कट्टे असलेल्या दोन बॅगा वेगवेगळ्या वेळी बेवारस स्थितीत सापडल्या होत्या.कोपरगाव शहर आणि तालुक्यात वाळू चोरांकडे मोठ्या प्रमाणावर हे कट्टे असल्याचे वारंवार सिद्ध होतं असून पोलिसांना याचा शोध घेणे गरजेचे बनले आहे.त्यातून मोठा कट उघड होऊ शकतो असे बोलले जात आहे.