जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

मृत्यूमुखी जनावरांच्या मालकांना भरपाईचे धनादेश प्रदान

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव ( प्रतिनिधी)

मागील वर्षी विषबाधेने मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकसान भरपाईचे धनादेश नुकतेच कोपरगाव पंचायत समितीमध्ये पार पडलेल्या एक कार्यक्रमात प्रदान करण्यात आले आहे.२०१९ पासून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जनावरांना विषबाधा होवून किंवा अकस्मात जर त्या जनावराचा मृत्यू झाल्यास त्या जनावरांच्या मालकांना प्रती जनावर रुपये पाच हजार नुकसान भरपाई देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी पाठपुरावा केल्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ह्या धनादेशाचे वाटप आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते या शेतकऱ्यांना करण्यात आले.


यावेळी आ.काळे म्हणाले की, पशुधनाचा शेतकऱ्यांना मोठा आधार असतो. शेतकरी पोटाच्या मुलाप्रमाणे आपल्या जनावराची दुकाळजी घेत असतो. अशावेळी अचानक जर या शेतकऱ्यांचे जनावर दगावले तर त्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. अशा वेळी या शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागाने सुरु केलेली योजना अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा असा उपक्रम राबविणारी अहमदनगर जिल्हा परिषद राज्यात एकमेव आहे. या योजने अंतर्गत एकाच वेळी चार जनावरांचा मृत्यू झाला तरी चार जनावरांपर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते. ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांचा अशा प्रकारे अकस्मात मृत्यू होईल त्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आ.काळे यांनी शेवटी केले आहे.सदर प्रसंगी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे, कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कारभारी आगवण, मधुकर टेके, श्रावण आसने, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप दहे, देर्डेचे सरपंच योगीराज देशमुख, प्रसाद साबळे, राहुल जगधने सांडूभाई सय्यद आदी मान्यवरांसह लाभार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले की, पशुधनाचा शेतकऱ्यांना मोठा आधार असतो. शेतकरी पोटाच्या मुलाप्रमाणे आपल्या जनावराची दुकाळजी घेत असतो. अशावेळी अचानक जर या शेतकऱ्यांचे जनावर दगावले तर त्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. अशा वेळी या शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागाने सुरु केलेली योजना स्तुत्य उपक्रम आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा असा उपक्रम राबविणारी अहमदनगर जिल्हा परिषद राज्यात एकमेव आहे. या योजने अंतर्गत एकाच वेळी चार जनावरांचा मृत्यू झाला तरी चार जनावरांपर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते. ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांचा अशा प्रकारे अकस्मात मृत्यू होईल त्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आ.आशुतोष काळे यांनी केले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close