कोपरगाव तालुका
कोपरगाव नगरपरिषद उपनगराध्यक्षांचा राजीनामा !आगामी मोहरा कोण चर्चेला उधाण

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेत विद्यमान उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी काल राजीनामा दिल्याने भाजप कोल्हे गट आता सरतेशेवटी मताच्या बेरजेत कोणाला संधी देणार याकडे राजकीय निरिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.राजींनाम्याच्या वृत्तास उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दुजोरा दिला आहे.
गतवर्षी सेनेचे गटनेते योगेश बागुल यांची मुदत ३१ जुलैला संपल्यावर स्वप्नील निखाडे यांची युवराजांच्या मर्जीतील सदस्य म्हणून वर्णी लागली होती आता या पदावर बसविण्यासाठी विद्यमान भाजप नेत्यांवर अल्पसंख्याक समाजाचा दबाव वाढला असल्याचे चित्र आहे.आता अवघ्या कोरोना काळातील तीन महिन्याच्या या औट घटकेसाठी कोणाला बाशिंग बांधतात याकडे कोपरगाव शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
ऑक्टोबर २०१९ मध्ये संपन्न झालेल्या विधान सभेला कोल्हे गटास मोठा दणका बसून ८२२ मतांचा निसटता पराभव पत्करावा लागल्याने हा पराभव या नेत्यांच्या फारच जिव्हारी लागला आहे.त्यात त्यांना भाजपशी साथसंगत निळवंडे सारखी चांगलीच भोवली आहे.त्यामुळे अल्पसंख्याक समाजाची हक्काची मते शहरातून दुरावली आहे.याची चांगलीच जाणीव “दादा”,”वहिनींना” झाली आहे.त्यामुळे आता ही मते पुन्हा आपल्याकडे नव्याने वळविण्यासाठी उपनगराध्यक्षांची निवड ही त्यांची मोठी “संधी” मानली जात आहे.गत वेळी युवराजांचा शब्द अंतिम ठरल्याने निखाडे यांना अकल्पित शेमिगोंडा शिरपेचात लाभला होता.आता त्यांना अल्पसंख्याक समाजाच्या मते आपल्याकडे वळविण्याचा घोर लागला आहे.
कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक नोव्हेंबर २०१६ मध्ये झाली त्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष जनतेतून निवडण्यात आला त्यावर विजय वहाडणे यांनी मोठ्या मताधिक्याने आपली मोहर उमटवली होती.तर नगरसेवकांच्या २८ जागांपैकी कोल्हे गटास १२ जागा तर शिवसेनेस ८ जागा आशा २० जागा या युतीने पदरात पाडून घेतल्या होत्या तर राष्ट्रवादीस ७ जागा तर एक जागा अपक्षास मिळाली होती.दरम्यान शिवसेनेच्या एका गटास आपल्या सोबत घेण्यात कोल्हे गटास यश मिळाले होते.त्याच बरोबर सेनेचे दोन तुकडे पाडण्यात बऱ्याच वर्षांनी या गटास यश मिळवून कोल्हे गटाच्या नेत्यांचे मनमांडे वास्तवात आले होते.पहिल्या उपनगराध्यक्ष निवडीत वहाडणे यांना तोंड देण्यासाठी तितक्याच आक्रमक पातळीवर तोंड देण्यासाठी त्यावेळची गरज म्हणून “त्या” वेळी विजयला विजयाचा तोडा देण्यात येऊन विजय वाजे यांची वर्णी लावण्यात आली होती मात्र नंतर हे “अस्त्र”नगराध्यक्ष वहाडणे यांच्यापुढे निष्प्रभ झाल्याचे निष्पन्न झाले मात्र त्या मानाने त्यांनी बरी लढत दिल्याचे मानले जात आहे.त्यामुळे ठरल्याप्रमाणे वाजे यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळाला व त्यांनी तो यशस्वीपणे पार पाडला त्यानंतर एक वर्ष शिवसेनेसाठी देण्याचा अलिखित करार झाला होता त्या प्रमाणे सेनेचे गटनेते योगेश बागुल यांची एक वर्षासाठी १ ऑगष्ट २०१९ रोजी निवड करण्यात आली होती.व तो कालावधी गतवर्षी ३१ जुलै रोजी संपला होता.त्यामुळे त्या जागेवर स्वप्नील निखाडे यांची अकल्पित वर्णी लागली होती.त्यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना गत आठ-दहा महिन्यात बरीच कसरत करून आपले गत काळातील प्रतिमा भंजनाचे मंडन करण्याचा प्रयत्न केला असताना काल अचानक त्यांना वरिष्ठ पातळीवरून राजीनामा देण्याचा आदेश झाला.त्यामुळे त्यांनी तातडीने आपला राजीनामा नगरपरिषदेच्या प्रशासनाकडे सोपवला आहे.त्यामुळे आगामी तीन महिन्यासाठी आता कोणाची वर्णी लागणार याकडे शहरातील अनेकांचे लक्ष लागून आहे.
आपली वर्णी लावण्यासाठी आता कोल्हे गटाच्या इच्छुकांनी संजीवनीचे उंबरठे झिजवण्यास प्रारंभ केला आहे. त्यासाठी त्यांनी “डाव,””प्रतिडाव”आखण्यास प्रारंभ केला आहे.दरम्यान या राजीनाम्याची भनक अनेक नगरसेवकांना नव्हती हे विशेष!
राज्य पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.व कोपरगाव शहरात त्यांना व माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांना मानणारा व्यापारी व समर्थक वर्ग मोठा आहे.व शहरात प्रारंभीच सांगितल्या प्रमाणे पराभूत झालेल्या आमदारांना अपेक्षित मते मिळाली नाही.याला ही मंडळी जबाबदार आहे असा पराभूतांचा समज (!) आहे.त्यामुळे ते आता या बाबत बेरीज करतात की वजाबाकी हाही विषय औत्सुक्याचा ठरणार आहे.
दरम्यान पावणेदोन वर्षांपूर्वी संपन्न झालेल्या विधान सभेला कोल्हे गटास मोठा दणका बसून ८२२ मतांचा निसटता पराभव पत्करावा लागल्याने हा पराभव या नेत्यांच्या फारच जिव्हारी लागला आहे.त्यात त्यांना भाजपशी सोयरीक निळवंडे सारखी चांगलीच भोवली आहे.शिवाय अनेक वर्षे निंदा नालस्ती केलेल्या भाजपशी सख्य केल्याने अल्पसंख्याक समाजाची हक्काची मते शहरातून दुरावली आहे.व त्याचा लाभ आ.आशुतोष काळे यांना मिळाला होता.याची चांगलीच जाणीव “दादा”,” वहिनींना” झाली आहे.त्यामुळे आता ही मते पुन्हा आपल्याकडे नव्याने वळविण्यासाठी उपनगराध्यक्षांची निवड ही त्यांची मोठी “संधी” मानली जात आहे.त्यातून त्यांचे पुन्हा प्रतिमा मंडन होणार आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही की त्यासाठी कोणा ज्योतिषाची गरजही नाही.आता पुन्हा नव्याने आपले प्रतिमा मंडन करताना अल्पसंख्याक नगरसेवकाकडे त्यांचे बारीक लक्ष राहणार ही बाब ओघाने आलीच. त्यातच माजी नगरसेवक स्व.करीमभाई कुरेशी यांचे काही दीड वर्षापूर्वी निधन झाले आहे त्यातून त्या कुटुंबाप्रती स्नेह दाखविण्याची ही नामी संधी मानली जात आहे.ती अर्थातच ते दवडणार नाही हे सुर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे.त्यामुळे इच्छुकांत अग्रक्रमाने समाजाची मते वळवणे हे आव्हान असल्याचे मानून कोल्हे गट विधानसभेत दुरावलेले मते पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी अल्पसंख्याक समाजाला प्राधान्य देण्याची दाट शक्यता असल्याने या पदावर नगरसेवक अरीफ कुरेशी यांचे घोडे सर्वांत पुढे राहण्याची दाट शक्यता आहे.नाही तरी अल्पसंख्याक समाजाचे तुष्टीकरण “हा” या नेत्यांचा आपल्या जीवनातील आवडता छंद असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहेच.त्या पाठोपाठ त्यांचा हुकुमाचा एक्का म्हणून शहरातील व्यापाऱ्यांची मतपेढी असलेल्या माजी नगराध्यक्ष सुहासनी कोयटे यांचे पती व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांची विधानसभेतील नाराजी लपून राहिलेली नाही.त्यामुळे त्यांचे खंदे समर्थक जनार्दन कदम यांचे नाव येऊ शकते.शहरात कमी पडलेली मते ही कोल्हे गटाची दुखरी नस असल्याने ती सावरण्याचे मोठे आव्हान आहे.बऱ्या म्हटल्या जाणाऱ्या पदासाठी बहुसंख्याक समाज या नेत्यांची बऱ्याच वेळा नापसंती असतो असा इतिहास आहे.व त्यांचा त्यावर विश्वास नसतो मात्र “तो” दाखविण्याचा “नाटकीपणा” ते वरवर दाखवत असतात.त्याला कोपरगाव शहराचे राजकारण अपवाद नाही.त्यामुळे या समाजातील इच्छुकांनी या पदासाठी फार “टाचा” वर करू नये हे उत्तम.त्यामुळे नगरसेवक जनार्दन कदम,मंगल आढाव,यांचा या पदासाठी नंबर लागेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल.एखाद्या पदासाठी इच्छुक असणे व पदासाठी महत्वाकांक्षी असणे वाईट नाही मात्र त्यासाठी वेळ येणे ही बाब बऱ्याच वेळेस त्या-त्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असते.वर्तमानातील विरोधक निष्प्रभ करण्यासाठी कोणता पत्ता कामी येतो हा डाव बऱ्याच वेळा आखला जातो.त्यात बऱ्याच वेळा निष्ठावानांची माती होताना दिसते.अशावेळी निष्ठावानांची प्रतीक्षा,निष्ठा व संयम ही अस्त्रशस्र कुचकामी ठरत असतात.व वर्तमानातील तात्कालिक उपयोगिता वरचढ ठरत असते.जो यात पास होतो तो यशस्वी ठरतो.आता या पातळीवर नगरसेवक जनार्दन कदम किती खरे उतरतात हे महत्वाचे ठरणार आहे.कारण ते राज्य पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.व शहरात कमी मते मिळाली यासाठी त्यांनी सत्येन मुंदडा यांना स्वीकृत नगरसेवक बनवून आमच्या अंदाजाला दुजोरा यापूर्वी दिलेला आहेच.व त्यामुळे शहरात कमी मते मिळाली याला ही मंडळी जबाबदार आहे असा पराभूतांचा समज (!)आहे.त्यामुळे ते आता या बाबत बेरीज करतात की वजाबाकी हाही विषय औत्सुक्याचा ठरणार आहे.कारण आगामी काळात अल्पसंख्यांक समाज व कोयटे-कुदळे समीकरण निर्णायक ठरणार आहे हे न समजण्या इतकी ही राजकीय मंडळी दुधखुळी नाही.त्यामुळे आगामी उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक “अरीफ कुरेशी” व “जनार्दन कदम” ही समीकरणे आगामी राजकीय व्यासपीठावर जवळची ठरतात.त्यामुळे त्यांना आळीपाळीने ही संधी मिळू शकते ही शक्यता जवळची ठरते.
वर्तमानात शहरातील बंद करण्यात २८ विकास कामे ही कोल्हे गटाची छि-थु करण्यास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे.मात्र त्यांना त्याचे काही देणेघेणे नाही माणसे ही अर्थकारणावर गुलाम बनवता येतात यावर या मंडळींचा मोठा विश्वास आहे.आणि तो बऱ्याच वेळा खराही ठरलेला आहे.मात्र प्रत्येक वेळी तेच अस्त्र विजयाचा तारू ठरेल असे राजकारणात बहुतेक वेळा होत नाही.याची वर्तमानातील अल्पमती राजकीय धुरीणांना जाणीव नाही हे वर्तमानातले कोल्हे गटाचे सांप्रत वास्तव आहे.त्याला ही मंडळी कसे हाताळते हे लवकरच समजणार आहे.