जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव बस आगाराची हरिद्वारला वहातूक!

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय लालपरी ‘एस.टी.’ ने आता मालवाहतूकीच्या क्षेत्रातही नवी भरारी घेतली असून कोपरगाव बस वाहतूक आगाराने शिर्डी संस्थानचे तूप पोहचविण्याचा ठेका घेतला असून त्या माल वाहतुकीच्या पहिल्या खेपेला आज बस आगाराचे प्रमुख अभिजित चौधरी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे.

महामंडळाच्या ताफ्यात पूर्वीपासून ३०० मालवाहतूक बस ट्रकमध्ये रुपांतरित करून कार्यरत असून आजघडीला ३७२ बसेस मालवाहतूकीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.कोपरगाव बस आगरही त्याला अपवाद नाही त्यांनीही सिमेंट,शेतमाल वाहतूक करण्यास प्रारंभ केला असून त्याला दिवसागणिक प्रतिसाद वाढत आहे

महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय लालपरी ‘एस.टी.’ ने आता मालवाहतूकीच्या क्षेत्रातही नवी भरारी घेतली असून विश्वासार्हता आणि सुरक्षितता या द्विसूत्रीमुळे एस.टीने मालवाहतूक करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. परिणामी एस.टी महामंडळालाही वाढीव उत्पन्नाच्या रुपाने नवसंजीवनी मिळत आहे.राज्यात प्रत्येक विभागात १० प्रमाणे ३३० बसेसचे मालवाहतूक बसमध्ये रुपांतर करण्यास महामंडळाने मान्यता दिली असून आतापर्यंत ७२ बसेस मालवाहतूकीसाठी तयार झाल्या आहेत.एस.टी महामंडळाच्या ताफ्यात पूर्वीपासून ३०० मालवाहतूक बस ट्रकमध्ये रुपांतरित करून कार्यरत असून आजघडीला ३७२ बसेस मालवाहतूकीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.कोपरगाव बस आगरही त्याला अपवाद नाही त्यांनीही सिमेंट,शेतमाल वाहतूक करण्यास प्रारंभ केला असून त्याला दिवसागणिक प्रतिसाद वाढत आहे.शिर्डी येथील साई बाबा संस्थानला कोरोना साथीचा फटका बसला असून गत सात महिन्यापासून दर्शन रांग साई भक्तांसाठी बंद आहे.परिणामस्वरूप साई भक्तांसाठी सुरू असलेले भोजनालयही बंद असल्याने त्या साठीचा खरेदी केलेला कच्चा माल खराब होण्याचा धोका वाढला आहे.त्यामुळे सदरचा तुपासारखा माल पुन्हा परत करण्याचा निर्णय संस्थानच्या त्रि सदस्यीय मंडळाने घेतला आहे.व त्या जागी नवीन माल आणणार आहे.नेमकी या घटनेचे संधीत रूपांतर करण्याचा निर्णय कोपरगाव बस आगाराचे प्रमुख अभिजित चौधरी यांनी घेतला आहे.व संस्थानशी संपर्क साधून हे काम कोपरगाव आगाराच्या माल वाहतूक शाखेला मिळवले आहे.या अंतर्गत दहा टनाच्या दहा खेपा शिर्डीहून हरिद्वारला मारण्यात येणार आहे.व त्या बाजूनेही दर्जेदार तूप परत आणणार आहे.जवळपास ०१लाख ४० हजाराचे हे काम असल्याची माहिती आगरप्रमुख चौधरी यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

या पहिल्या खेपेचे विधिवत पूजन करून त्या गाडीला (क्रं. एम.एच.२० बी.एल.०१४१) त्यांनी हिरवा झेंडा दिला आहे.ही गाडी साधारण तीन दिवसात हरिद्वारला पोहचणार आहे.

सदर प्रसंगी या साहाय्यक कार्यशाळा अधिकारी अमोल बनकर,वाहतूक नियंत्रक उदय रोकडे,राज्यपरिवाहन कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष किरण बिडवे,वहान चालक ई.बी.तांबोळी,अनिल कुमावत,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Close