जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..त्या नेत्यांवर कारवाई करण्याचे प्रांताधिकाऱ्यांना आदेश

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशात व राज्यात कोरोना विषाणूची साथ चालू असताना ती थांबविण्यासाठी प्रशासन अनेक अडचणींचा सामना करून शर्तीचे प्रयत्न करत असताना कोपरगाव शहरात माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी मात्र शासनाच्या सुरक्षित अन्तराचा फज्जा उडवत तहसील कार्यालयात आपला कार्यकर्त्यांचा मोठा मेळा नेऊन प्रशासनास पेचात टाकले होते.एरवी प्रशासन कायदा मोडणाऱ्या नागरिकांना सर्वांसमक्ष शिक्षा फर्मावत असताना तालुका प्रशासनाने या बाबत सोयीस्कर मौन पाळले होते मात्र याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी या बाबत दाद मागितली होती. त्याची दखल जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकतीच घेतली असून शिर्डी प्रांत अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा व त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्याचा आदेश काढला आहे.त्यामुळे कायदाप्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील एका माजी आ.कोल्हे यांनी टाळेबंदी व जमावबंदीच्या काळात सुरु करण्याचा अनाठायी आग्रह धरून आपल्या कार्यकर्त्यांचा भला मोठा मेळा तहसील कार्यालयात नेऊन तेथे सुरक्षित अंतराचा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या समोर फज्जा उडवला होता.त्यामुळे शहरात सामान्य नागरिकांना एक न्याय तर कायदा पालनावर भाषणे ठोकणाऱ्या पुढाऱ्यांना एक न्याय असे दुर्दैवी चित्र शहर व तालुक्यात तयार झाले होते.या कारवाईने कायदा सर्वांना सामान असल्याचे चित्र निर्माण होण्यास मदत मिळणार आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ५८५ ने वाढून ती ६३ हजार ४५० इतकी झाली असून २११० जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या २० हजार २२८ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ७७९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ५३ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव,त्या पाठोपाठ येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून १७ मे पर्यंत केली आहे.व मास्कसह सुरक्षित अंतर राखण्याचे व काही सवयी लावून घेण्याचे सक्त कायदे केले आहे.कोरोनाबाधित येवला शहर नजीक असल्याने व या शहरातून बऱ्याच नारिकांची ये-जा असल्याने प्रशासन विशेष दक्षता घेत आहे.त्यामुळे सुरक्षित अंतराचा मुद्दा अहंम बनला आहे.पोलीस हा नियम न पाळणाऱ्या साधारण नागरिकांना काठीने सोलून काढत आहे.आपल्या घरातल्या,जवळच्या आप्ताच्या अंत्यविधीलाही जेथे प्रशासन परवानगी नाकारत आहे.व नागरिकही प्रशासनाची जनतेबद्दलची काळजी गृहीत धरून तेथे मान तुकवीत असताना तालुक्यातील एका माजी आ.कोल्हे यांनी टाळेबंदी व जमावबंदीच्या काळात सुरु करण्याचा अनाठायी आग्रह धरून आपल्या कार्यकर्त्यांचा भला मोठा मेळा तहसील कार्यालयात नेऊन तेथे सुरक्षित अंतराचा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या समोर फज्जा उडवला होता.त्यामुळे शहरात सामान्य नागरिकांना एक न्याय तर कायदा पालनावर भाषणे ठोकणाऱ्या पुढाऱ्यांना एक न्याय असे दुर्दैवी चित्र शहर व तालुक्यात तयार झाले होते.याबाबत शहरातील नागरिकांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती.तर तालुका प्रशासन व पोलीस अधिकारी यांच्या आजवरच्या चांगल्या कामावर पाणी फिरले होते.पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र कारवाईची तयारी दाखवली होती.या बाबत कोपरगाव शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी मात्र वरिष्ठ पातळीवर या बाबत दाद मागितली होती.या बाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रांताधिकारी यांना जा.क्रं.११७४/२०२० ता.८ मे २०२० अन्वये कारवाईचे आदेश दिल्याने या बाबत प्रक्रिया सुरु झाल्याचे मानले जात आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close