जाहिरात-9423439946
शैक्षणिक

संघर्षातून माणसाचे आयुष्य आकार घेते -राजू चौरे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात संघर्ष अटळ आहे,त्यातही दिव्यांग व्यक्तींच्या वाट्याला अधिक संघर्ष येतो.समाजाची अवहेलना सहन करीत त्यांना जगावे लागते.अशा परिस्थितीत न डगमगता जिद्दीने केलेले प्रयत्न व संघर्षातून कोणत्याही माणसाचे आयुष्य घडते असे प्रतिपादन कोपरगाव तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून राजू फुलसिंग चौरे यांनी कोपरगाव येथे बोलताना केले आहे.

कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकरराव थोपटे हे होते.

सदर प्रसंगी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.विजय निकम यांच्यासह शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर थोपटे म्हणाले की,”समाजामध्ये सर्व पातळीवर समानतेची भावना प्रस्थापित झाल्याशिवाय विकास साधला जाणार नाही.विशेषतः दिव्यांग जनांप्रती असलेली आदराची भावना त्यांचे आयुष्य अधिक आनंदी बनवू शकते. म्हणून प्रत्येकाने समाजातील दिव्यांगाप्रती आत्मीयताभाव जोपासणे गरजेचे आहे.

सदर प्रसंगी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ.सुभाष रणधीर,हिंदी विभाग प्रमुख डॉ.ओमप्रकाश मौर्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील दिव्यांग कर्मचारी व विद्यार्थी यांचा यावेळी गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.माधव यशवंत यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.कैलास महाले यांनी केले आहे.अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सुनील सालके यांनी आभार मानले

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close