कोपरगाव तालुका
कोपरगावचा पाणी प्रश्न निकाली निघण्याची भीती कोल्हे कुटुंबाला वाटल्याने..या नेत्यावर टीका

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
चाळीस वर्ष सत्ता भोगूनही ज्यांना कोपरगावचा पाणी प्रश्न समजला नाही त्यांना ५ नंबर साठवण तलावाचे महत्व समजणार नाही तेंव्हा ५ नं.साठवण तलाव हि दूरची गोष्ट आहे.आ.आशुतोष काळे यांनी साठवण तलावाबरोबरच वितरण व्यवस्थेसाठी १२० कोटीची तांत्रिक मंजुरी मिळविल्यामुळे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न निकाली निघण्याची भीती कोल्हे कुटुंबाला वाटल्याने आपले राजकीय अस्तित्व संपते की काय? अशी भीती वाटू लागल्याने त्यांनी दिशाभूल करण्याचे काम सुरु केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्यावर केली आहे.
“५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १२० कोटीची तांत्रिक मंजुरी आ. काळे यांनी मिळविली आहे पुढे प्रशासकीय मान्यता देखील लवकरच मिळवणार आहे.बेलगाम असणाऱ्यांना लगाम घालून बाळराजांचा हट्ट पूर्ण करून शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविणार आहे.कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न निकाली निघून आजवर पाणी प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या कोल्हे कुटुंबाला आपले राजकीय अस्तित्व संपते की काय? अशी साधार भीती वाटू लागली आहे त्यातून हि टीका होत आहे”-सुनील गंगूले,अध्यक्ष,शहर राष्ट्रवादी काँग्रेस.
कोपरगाव नगरपरिषद निवडणूक जवळ आल्याने आता नवनवीन पिपाण्या वाजण्यास प्रारंभ झाला आहे.याबाबत नुकतीच कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन आ.आशुतोष काळे यांच्यावर,”तांत्रिक मान्यता घेणारे तांत्रिक” अशी खोचक टीका केली होती.त्यावर आज राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी एका प्रसिद्धी पत्रकांनव्ये उत्तर दिले आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”मागील पाच वर्षात राज्यात आणि केंद्रात एकहाती सत्ता असतांना देखील कोल्हेंना शहराचा पाणीप्रश्न सोडविता आला नाही.ते काम आ.काळे यांनी दोनच वर्षात करून दाखविल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १२० कोटीची तांत्रिक मंजुरी हि त्यांची खरी पोटदुखी आहे.पाच नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे. हे शहरातील प्रत्येक नागरिक जाणून आहेत.मात्र आजवर ज्या कोल्हे कुटुंबानी या पाणीप्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजली त्यांना आता आपली पाण्याची दुकानदारी बंद करावी लागणार असल्याचे दु:ख आहे.त्यामुळे त्यांची होणारी आदळआपट त्यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली आहे.पत्रकार परिषदा घेऊन व विकासकामे करणाऱ्या आ.काळे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करून आपल्याच कार्यकर्त्यांच्या टाळ्या मिळविण्यात बाळराजांना आनंद वाटत आहे.
मात्र त्यांनी खालच्या भाषेत केलेली टीका हा त्याच्यावर झालेल्या संस्काराचा भाग आहे.परंतु ४० वर्ष सत्ता भोगूनही पाणी प्रश्न सोडवू न शकलेल्या व ४२ कोटीच्या पाणी योजनेची कोणी वाट लावली ? या बाबत आपल्या परिवारासोबत चर्चा करून ४० वर्ष अक्कल कुठे गहाण ठेवली होती ? हे प्रसिद्धी माध्यमांपुढे खालच्या भाषेत बोलणाऱ्या बाळराजांनी विचारले पाहिजे असा सल्ला विवेक कोल्हे यांना गंगुले यांनी दिला आहे.राजकीय द्वेषापोटी पत्रकार परिषदा घेऊन प्रश्न सुटत नसतात त्यासाठी आत्मीयता असावी लागते.हि आत्मीयता आ.काळे यांच्याकडे आहे. दोन ट्रक तांत्रिक मंजुऱ्या कोपरगाव नगरपालिकेत पडून असल्याचे सांगणाऱ्यांनी ज्याप्रमाणे २८ विकासकामांच्या मंजुऱ्या अडकवल्या त्याप्रमाणे या मंजुऱ्या अडवल्यामुळेच आजपर्यंत कोपरगाव शहराचा विकास होवू शकला नाही असा टोला लगावला आहे.
५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १२० कोटीची तांत्रिक मंजुरी आ. काळे यांनी मिळविली आहे पुढे प्रशासकीय मान्यता देखील लवकरच मिळवणार आहे.बेलगाम असणाऱ्यांना लगाम घालून बाळराजांचा हट्ट पूर्ण करून शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविणार आहे.कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न निकाली निघून आजवर पाणी प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या कोल्हे कुटुंबाला आपले राजकीय अस्तित्व संपते की काय? अशी साधार भीती वाटू लागली आहे.मात्र ज्या कोल्हे कुटुंबांनी २८ विकासकामांना न्यायालयात नेवून शहराच्या विकासाचा खेळखंडोबा केला त्यांची तळी येत्या निवडणुकीत कोपरगाव शहरातील सुज्ञ मतदार भरणार असल्याचे सुनील गंगुले यांनी शेवटी म्हटले आहे.