जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

भावजयीचा नांदायला नकार,दिराचा आत्महत्येचा प्रयत्न !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
 
  आपली भावजय नांदायला येत नाही म्हणून आपल्या भावाबरोबर आलेला तरुण व अर्जदार महिलेचा दिर सचिन बळीराम पगारे (वय-33 वर्षे) रा.निळखेडे तालुका येवला याने उंदराच्या गोळ्या खावून आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना कोपरगाव पंचायत समितीच्या आवारात आज दुपारी 3.30 वाजता उघडकीस आली आहे.त्यामुळे कोपरगाव आणि येवला तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

येवला तालुक्यातील नवरा आणि कोपरगाव येथील बायकोत किरकोळ कारणावरून वाद सुरू झाले होते.ते अलीकडील काळात इतके विकोपाला गेले आहे की तो वाद थेट कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गेला होता.मात्र पोलिसांनी याबाबत भरोसा सेलची मदत घेण्याचा त्यांना सल्ला दिला होता.ते ठिकाणी असताना भावजाईने नांदण्यास नकार दिल्याने दिर सचिन पगारे याने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र पोलिसानी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

    भरोसा सेल हा महाराष्ट्र शासनाचा आणि पोलिस विभागाचा एक विशेष उपक्रम आहे,जो महिला,बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या कौटुंबिक समस्यांचे निवारण करण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे.या अंतर्गत सर्व प्रकारची मदत एकाच छताखाली मिळते.भरोसा सेलची प्रमुख उद्दिष्टे ही कौटुंबिक वाद सोडवणे असून त्यात पती-पत्नींमधील मतभेद,घरगुती हिंसाचार किंवा सासरच्या त्रासाबद्दल आलेल्या तक्रारींवर कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी समुपदेशन करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो.त्यात पीडित व्यक्तींना पोलीस मदत,समुपदेशन,कायदेशीर सल्ला,वैद्यकीय मदत आणि मानसोपचार तज्ज्ञांची मदत एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येते.कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात आधी हा सेल कार्यरत होता.मात्र त्या ठिकाणाहून आता हा सेल कोपरगाव पंचायत समितीच्या आवारात असल्या एका खोलीत सुरू असून त्याचे काम समुपदेशक वैशाली झाल्टे या त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून काम पाहत आहेत.मात्र त्यांना आज एका नव्याच संकटाचा सामना करावा लागला असल्याचे उघड झाले आहे.

   त्याचे असे झाले की,येवला तालुक्यातील निळखेडे येथील तरुण साईनाथ पगारे याचे लग्न काही वर्षापूर्वी कोपरगाव येथील तरुणी प्रज्ञा हिच्याशी झाले होते.मात्र नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर नवरा आणि बायकोत किरकोळ कारणावरून वाद सुरू झाले होते.ते अलीकडील काळात इतके विकोपाला गेले आहे की तो वाद थेट कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गेला होता.मात्र पोलिसांनी याबाबत भरोसा सेलची मदत घेण्याचा त्यांना सल्ला दिला होता.त्या प्रमाणे हे जोडपे कोपरगाव येथील भरोसा सेलच्या कोपरगाव येथील संचालिका वैशाली झाल्टे यांचेकडे समुपदेशन घेण्यासाठी आले होते.त्यानंतरही हा वाद काही मिळण्याचे नाव घेत नव्हता.काही तारखा झाल्या होत्या.आज त्याबाबत झाल्टे यांनी आज दोन्ही पक्षकारांना सुनावणीसाठी पाचारण केले होते.त्यावेळी दोघांना एकत्र बसवून त्यांना एकत्र कुटुंब पद्धती आणि त्याचे फायदे शिवाय वादाने काही साध्य होणार नाही तुम्हाला एकत्र नांदावे लागणार असल्याचे सांगण्यात आले असल्याची माहिती हाती आली आहे.यावेळी नवरा मुलाचा धाकटा भाऊ सचिन पगारे हा यावेळी उपस्थित होता.त्यावेळी अर्जदार महिलेला विचारले गेले की,”तू,नांदायला येणार आहे का ? त्यावेळी तिने नकार दिला व म्हणाली की,” काही झाले तरी मी एकत्र नांदायला येणार नाही.त्यावेळी संतापलेल्या दीर आणि अर्जदार महिलेचा नवरा हे दोघे रागारागाने सदर ऑफिस मधून बाहेर गेले होते.जाताना महिलेचा दीर म्हणाला की,तू मी मेल्यावरच नांदायला ये” असे म्हणून हे दोघे भाऊ बाहेर गेले होते.

दरम्यान त्या दोघा भावांनी जवळच्या मेडिकल मधून उंदीर मारण्याचे औषध व काही विषारी गोळ्या आणल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.त्यातील फिर्यादी महिलेच्या दीर सचिन पगारे याने रागाने ते औषध पिऊन घेतले असून गोळ्या घेण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती हाती आली आहे.प्रसंगाचे गांभीर्य ओळखून येथील भरोसा सेलचे संचालिका वैशाली झाल्टे यांनी तातडीने कोपरगाव शहर पोलिसांना पाचारण केले होते.त्यांनी तातडीने धाव घेतल्याने व वेळीच पोहचल्याने त्या दोघा भावांना सदर विषारीऔषध घेण्यास रोखल्याने पुढील अनर्थ टाळला असल्याचे बोलले जात आहे.मात्र सचिन पगारे याने या झटापटीत खाली पडलेल्या उंदीर मारण्याच्या गोळ्या व औषध प्राशन केल्याने त्यांना काही अंशी विषबाधा झाली असल्याचे वैद्यकीय उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.त्यांना पुढील उपचारार्थ दुसरीकडे रवाना केले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश बुट्टे यांनी दिली आहे.त्यांची प्रकृती धोकादायक पातळीच्या बाहेर असल्याचे समजले आहे.

   दरम्यान या घटनेने कोपरगाव तहसील कार्यालय आणि पंचायत समिती आवारात कोपरगाव तालुक्यातील आपल्या प्रशासकीय कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी एकच गर्दी केली होती.त्याबाबत कोपरगाव आणि येवला तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close