विशेष दिन
…या ग्रामपंचायतीत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
इतिहासाच्या पानांवर छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी शूर छत्रपती महाराजांचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहेआजही ते १३० कोटी देशवासीयांसाठी प्रेरणेचे स्रोत आहेत.शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवा आणि हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी समर्पित केले असून त्यांच्या राज्याभिषेक दिन एक महत्वाची घटना असून तो दिन कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

यावेळी संगमनेर तालुक्यातून नव्याने दाखल झालेले ग्रामपंचायत अधिकारी पी.एन.हासे यांचा सरपंच सारिका थोरात यांचे प्रमुख उपस्थितीत वाल्मीक बाबुराव यांनी शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील महान राजांपैकी एक होते.म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात त्यांच्या राज्याभिषेक दिनाचे विशेष महत्त्व आहे.रायगडावर दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी,इ.स.१६७४ रोजी रायगड किल्ल्यावर एक ऐतिहासिक सोहळा पार पडला होता.’शिवराज्याभिषेक’. हा सोहळा महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे आज ३५० वर्षानंतरही तो तितक्याच उत्साहात राज्यात संपन्न होत असतो.त्याला कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत अपवाद नाही या ठिकाणी तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून सरपंच सारिका विजय थोरात यांचे हस्ते शिव प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले आहे.

सदर प्रसंगी माजी सरपंच वसंत थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात, उपसरपंच सुनील थोरात,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,माजी सदस्य प्रकाश थोरात,विजय शिंदे,बाळासाहेब थोरात,शांताराम गंगाधर थोरात,नव्याने दाखल झालेले ग्रामपंचायत अधिकारी हासे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी नव्याने दाखल झालेले ग्रामपंचायत अधिकारी पी.एन.हासे यांचा सरपंच सारिका थोरात यांचे प्रमुख उपस्थितीत वाल्मीक बाबुराव यांनी शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला आहे.