जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

‘वन नेशन,वन वेट,वन रेट’ मागणी सभागृहात मांडा-…या संघटनेची मागणी

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   भारतीय अर्थव्यवस्था सक्षम व सुदृढ होत असताना त्यात काही विरोधाभास समोर येत आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी व्यापारी महासंघाची प्रमुख मागणी असलेली ‘वन नेशन,वन वेट,वन रेट’ ही मागणी विधानसभेत मांडावी असे प्रतिपादन कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केली आहे.

    

कोपरगाव तालुक्याची ओळख निर्माण करण्यात ज्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले अशा १९ ज्येष्ठ व्यापाऱ्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर कोपरगाव तालुक्याची बाजारपेठ हलविण्यात जे महत्त्वपूर्ण योगदान देत आहे अशा ०९ नवउद्योजकांना कर्तृत्व गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.

  राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली २५ मे जागतिक व्यापारी दिना नुकताच कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने मोठ्या उत्साहात आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.

    सदर प्रसंगी कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे,सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,नामदेवराव परजणे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,व्यापारी महासंघ कोषाध्यक्ष तुलसीदास खुबानी,कार्याध्यक्ष अजित लोहाडे,ज्येष्ठ संचालक आशुतोष पटवर्धन,नारायणशेठ अग्रवाल,केशवराव भवर,रमेश शिरोडे, विजय नानकर आदींसह तालुक्यातील व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रारंभी शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती.त्यावेळी ओमप्रकाश कोयटेसह आ.आशुतोष काळे दिसत आहेत.

सदर प्रसंगी ऑनलाइन ऑफलाइन यातील फरक कमी करण्यासाठी तालुक्यातील व्यापाऱ्यांसाठी समता नागरी सहकारी पतसंस्थे द्वारा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनकडून ‘सहकार बास्केट’ या ऑनलाइन ॲपचे उद्घाटन करण्यात आले आहे.


  
    त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”ग्राहकाने खरेदी केलेल्या मालाचे वजन तंतोतंत असावे यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटे लावण्यात आले.परंतु संबंधित विभागाच्या दुर्लक्षपणामुळे त्यातही ग्राहकांची सर्रासपणे लूट केली जात आहे. ‘जसा दाम तसा माल’ अशी अपेक्षा ग्राहकांची असते.पण बाजार पेठेतील दुकानदार वापरत असलेल्या वजन काट्यांनी ग्राहकांची ही अपेक्षा निराश करणारी ठरत आहे. मालाची योग्य किंमत देवूनही कमी वजनाचे माल दुकानदाराकडून विकत घ्यावे लागते.अशात तक्रार करावी तर कुठे, असा प्रश्न ग्राहकांसमोर उपस्थित झाला आहे.त्यामुळे कोयाटे यांनी नेमक्या प्रश्नाला हात घातला असल्याचे बोलले जात आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी विधानसभेत मांडून ग्राहकांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारला ‘वन नेशन, वन वेट वन रेट’ कायदा करण्यास भाग पाडावे.तसेच कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी भागात होणाऱ्या एम.आय.डी.सी.त स्थानिक व्यापाऱ्यांना प्राधान्य द्यावे.त्या जागांमध्ये उद्योग उभारण्यासाठी व्यापारी महासंघ व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका निभावणार असल्याचे जाहीर केले आहे.समृद्धी महामार्गामुळे कोपरगाव ते मुंबई च्या प्रवास ३ तासावर येणार आहे.याचे सादरीकरण विधानसभेत लोकप्रतिनिधींनी करावे.त्याचा फायदा कोपरगावकरांना कसा करून देता येईल ? विशेषतः मुंबईचे व्यापारी व व्यापाऱ्यांकडील मुनिम कोपरगाव शहरात वास्तव्यास येण्यासाठी कोपरगाव कसे समृद्ध आहे ? कोपरगाव मध्ये त्यांची राहण्याची सोय चांगल्या पद्धतीने होऊ शकते ? या बाबींचा उल्लेख लोकप्रतिनिधींनी विधानसभेत मांडण्यात येणाऱ्या सादरीकरणांमध्ये प्रामुख्याने करावा अशी मागणी केली आहे.तालुक्यातील जेऊर कुंभारी,कोकमठाण या सारख्या ग्रामीण भागात कोपरगावातील बिल्डरांनी मोठ्या प्रमाणात वसाहती उभारल्या तर मुंबईचे व्यापारी देखील कोपरगावला राहण्यासाठी येण्यास उत्सुक होतील असा आशावाद व्यक्त करून त्या बाबत आ.काळे यांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे.

आ.आशुतोष काळे मनोगत व्यक्त करताना दिसत आहे.

  यावेळी आ.आशुतोष काळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,”कोपरगाव शहर व तालुका विकासात व्यापारी महासंघ नेहमीच अग्रभागी आहे.त्यांचे उपक्रम हे नेहमीच व्यापारी व ग्राहकांच्या हिताचे असतात.व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यामध्ये आपण देखील प्रामाणिकपणे प्रयत्न करून होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात व्यापारी महासंघाच्या मागण्या संदर्भात आवाज उठवेल.विशेषतः ‘वन नेशन,वन रेट,वन वेट’ या संकल्पने चे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करेल.

   यावेळी कोपरगाव तालुका व्यापारी महिला आघाडी च्या अध्यक्षपदी राजश्री ताई गुजराथी यांची निवड करण्यात आली असून प्रसंगी माजी अध्यक्षा किरण दगडे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.प्रारंभी शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती.

   यावेळी यावेळी विवेक कोल्हे यासह ज्येष्ठ व्यापारी टेकचंद खुबानी यांनी मनोगत व्यक्त केले आहे.तर प्रास्तविक सुधीर दागा यांनी केले आहे तर किराणा मर्चंट असोसिएशनचे  अध्यक्ष राजकुमार बंब यांनी मनोगत व्यक्त केले तर सूत्र संचालन महासंघाचे सचिव प्रदीप साखरे यांनी केले तर आभार धीरज कराचीवाला यांनी मानले आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संचालक महावीर सोनी,नारायण लांडगे,मानव शुक्ला,प्रीतम बंब,संदीप काबरा,किरण शिरोडे,उल्हास गवारे,संतोष गंगवाल,अतिश शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close