अपघात
अपघातात महिला ठार,अकस्मात मृत्यू नोंद

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव औद्योगिक वसाहतीत कागदी पुठ्याचे उत्पादन करत असलेल्या रियलॅबल या कंपनीत काम करणाऱ्या गरिमानगरी येथील महिलेचा पाण्याची टाकी अंगावर पडून अपघात होऊन त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली असल्याने तिला उपचारार्थ कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले असल्याची धक्कादायक हाती आली आहे.सदर मृत महिलेचे नाव शुभांगी संजय रोकडे (वय-५५)असल्याची माहिती आहे.

दिं.१० जानेवारी रोजी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास सदर महिलेच्या अंगावर एक पाण्याची टाकी पडली आहे.त्यात ती गंभीर रित्या जखमी झाली होती.उपाचारा दरम्यान शुभांगी रोकडे हिचे निधन झाले आहे.
औद्योगिक वसाहतीत अनेक अपघात निष्काळजी पणामुळे होत असतात त्यात अनेकांचा बळी जात असतो असाच अपघात नुकताच कोपरगाव नजिक ईशान्येस तीन कि.मी.अंतरावर असलेल्या औद्योगिक वसाहतीत रियरॅबल या कागदी पुठ्ठे बनवणाऱ्या कंपनीत घडला असून तेथे काम करत असताना दिं.१० जानेवारी रोजी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास सदर महिलेच्या अंगावर एक पाण्याची टाकी पडली आहे.त्यात ती गंभीर रित्या जखमी झाली होती.तिला नजीकच्या नागरिकांनी उपचारार्थ कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते.मात्र तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले आहे.सदर कंपनी सुधाकर शेळके यांची असल्याची माहिती हाती आली आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक भूषण हांडोरे यांचेसह पोलीस हे.कॉ.जे.पी.तमनर यांनी भेट दिली आहे.
याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक ०६/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.तमनर हे करीत आहेत.