जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

…या ठिकाणी अखंड हरींनाम सप्ताह मोठ्या उत्साहात सुरु !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

  कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र शहापूर येथे संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा व श्री क्षेत्र ताहाराबाद पायी दिंडी सोहळा तपपुर्ती सोहळ्यानिमित्त आळंदी येथील ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे मर्गदर्शनाखाली व शहापुर ग्रामस्थ व भाविक भक्तांच्या मदतीने अखंड हरींनाम सप्ताह मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे.त्याचा शहापूर आणि परिसरातील भाविकभक्त मोठ्या प्रमाणावर लाभ घेत असल्याची माहिती आयोजकांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

  

फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले असे मानले जाते.म्हणजेच संत तुकाराम यांना देव सदेह वैकुंठी घेऊन गेल्याची मान्यता आहे.त्यास आता ३७५ वर्षे उलटत आली असून त्या निमित्त व शहापूर श्री क्षेत्र तहाराबाद येथील दिंडीच्या तपपुर्ती निमित्त कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र शहापूर येथील भाविकांनी आळंदी येथील ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे मार्गदर्शनाखाली अखंड हरींनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.त्यास मोठा प्रतिसाद लाभत आहे.

  संत तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते.वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच’ एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली.संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग,हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत.वारकरी,ईश्र्वरभक्त,साहित्यिक,अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात.त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत.त्यांची हि कीर्ती आजही दिगंत आहे.फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले असे मानले जाते.म्हणजेच संत तुकाराम यांना देव सदेह वैकुंठी घेऊन गेल्याची मान्यता आहे.या दिवसालाच ‘तुकाराम बीज’ म्हणून संबोधले जाते.फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी संत तुकाराम महाराज यांनी सदेह वैकुंठ गमन केले.त्यास यावर्षी त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षे आहे.त्या निमित्ताने व संत कवी महिपती महाराज समाधीस्थळी श्री क्षेत्र शहापूर येथून दिंडी सुरु होऊन यावर्षी एक तप होत असल्याने हा दुग्धशर्करा योग जुळवून आल्याने श्री क्षेत्र शहापूर येथे अखंड हरींनाम सप्ताहाचे आयोजन ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे मार्गदर्शनाखाली दि.०४ मे पासून करण्यात आले आहे.

   दरम्यान त्या निमित्ताने प्रातःकाळी ०४ वाजता काकडा भजन,सकाळी ०६ वाजता तुकाराम महाराज स्तुती,सकाळी ०७ वाजता संगीत गाथा पारायण,दुपारी ०३ वाजता श्री तुकाराम महाराज जीवनचरित्र,सायंकाळी ०७ वाजता हरी कीर्तन,रात्री ०९ वाजता उपस्थित भाविकांना महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.

   दरम्यान रोज सायंकाळी ०७ ते ०९ वाजता हरी कीर्तन आयोजित केले असून गत दोन दिवसात आळंदी येथील ह.भ.प.भावार्थ महाराज देखणे,पंढरपूर येथील चैतन्य महाराज देहूकर,पंढरपूर येथील जयवंत महाराज बोधले आदींचे कीर्तन संपन्न झाले आहे.तर आज सायंकाळी ०७ वाजता आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त केशव महाराज उखळीकार यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.तर दि.०८ मे रोजी सायंकाळी आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे,तर दि.०९ मे रोजी जळगाव येथील पोपट महाराज पाटील,दि.१० मे रोजी सायंकाळी ०७ वाजता पैठण येथील संत एकनाथ महाराज यांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.तर काल्याचे कीर्तन दि.११ मे रोजी सकाळी ०९ वाजता आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे संपन्न होणार आहे.
   तरी या हरींनाम सप्ताहाचा शहापूर,बहादराबाद,जवळके,धोंडेवाडी,वेस-सोयगाव,बहादरपूर,रांजणगाव देशमुख,मनेगाव,काकडी,मल्हारवाडी,अंजनापूर आदिसंह कोपरगाव,सिन्नर तालुक्यातील भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांचे वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close