महावितरण विभाग
…या शहरात महावितरणचा वर्धापन दिन संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
महावितरणचा २० वा वर्धापन दि.०६ जून २०२५ रोजी साजरा संपन्न होत असून या वर्धापन दिनानिमित्त,’शून्य अपघात महावितरण,शून्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन ०२ ते ०६ जून दरम्यान संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे.त्या निमित्त आज कोपरगावात एका फेरीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता डी.पी.धांडे यांचेसह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.

महावितरण कंपनीत अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी जनजागृती करण्यास सुरुवात केली असून या निमित्ताने गेल्या काही वर्षात नागरिक आणि लहान मुलांचे विद्युत अपघात वाढताना दिसत आहेत.याच पार्श्वभूमीवर,समाजात विद्युत सुरक्षेविषयी जनजागृती करून अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन महावितरणच्या स्थापनेला येत्या ०६ जून रोजी २० वर्षे पूर्ण होत आहेत.या महत्त्वपूर्ण वर्धापन दिनाचे औचित्य साधून,०१ ते ०६ जून २०२५ हा आठवडा ‘शून्य अपघात महावितरण… शून्य अपघात महाराष्ट्र…’ या संकल्पनेवर आधारित “वर्धापन दिन व विद्युत सुरक्षा सप्ताह” म्हणून राज्यभर साजरा करण्यात येत आहे.त्याला कोपरगाव उपविभाग अपवाद नाही त्यांनीही हा सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न केला आहे.
सदर प्रसंगी त्यांनी अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी जनजागृती करण्यास सुरुवात केली असून या निमित्ताने गेल्या काही वर्षांत महावितरणने कर्मचाऱ्यांच्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यात यश मिळवले असले तरी,नागरिक आणि लहान मुलांचे विद्युत अपघात वाढताना दिसत आहेत.याच पार्श्वभूमीवर,समाजात विद्युत सुरक्षेविषयी जनजागृती करून अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.त्या निमित्ताने आज सकाळी मुख्य रस्त्यावर वीज सुरक्षेचे फलक हाती घेऊन प्रभात फेरीचे आयोजन केले होते.त्याला महावितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला आला असल्याचे दिसून आले आहे.