भारतीय रेल्वे
शिर्डीला रेल्वेमार्गांनी जोडा-…या नेत्याची मागणी

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
शिर्डी लोकसभा मतदार संघातील तीर्थक्षेत्रातील भाविकांना अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या शिर्डीला जवळके मार्गे समृध्दी महामार्गाला समांतर जोडून नाशिक-पुणे या प्रस्तावित लोहमार्गास जोडणेसह शिर्डी-शनी शिगणापूर रेल्वेमार्ग,बेलापूर परळी रेल्वे मार्ग,पुणे-नाशिक रेल्वे मार्ग,शिर्डी-शहापूर रेल्वे मार्ग,नगरसूल-शिर्डी आदी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करावे अशा मागण्यासह विविध मार्गावर नूतन गाड्या सुरू करण्याची मागणी शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकतीच पुणे येथील बैठकीत केली आहे.

“शिर्डी मतदार संघ हा साईबाबा यांच्या समाधी स्थानामुळे जगाच्या नकाशावर आला आहे.मात्र अद्याप शिर्डी आणि काकडी विमानतळ आणि दुष्काळी गावे आदींची कनेक्टिव्हिटी पाहिजे इतकी आलेली नाही.त्यामुळे मुंबईला रेल्वेने जाण्यासाठी साईभक्तांना जाण्यास बारा तास तर पुण्यास जाण्यासाठी सात ते आठ तास लागत असून या दोन्ही महानगरांच्या जाण्यास मोठा वळसा घालून जावे लागत आहे.त्यामुळे साईभक्तांना मोठा वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे”- खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी लोकसभा मतदार संघ.
पुणे येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांच्या अध्यक्षतेखाली,प्रधान विभाग प्रमुख,पुणे आणि सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्यासोबत सोमवारी सर्व पक्षातील खासदारांची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली आहे.त्यावेळी शिर्डीचे लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,खा.सुप्रिया सुळे,श्रीरंग बारणे,ओमप्रकाश निंबाळकर,धैर्यशील मोहिते,डाॅ.अमोल कोल्हे,नीलेश लंके,विशाल पाटील,रजनी पाटील,नितीन जाधव,शिवाजी काळगे,माया नारोलिया,डाॅ.मेधा कुलकर्णी,रोहित वाकचौरे,रेल्वे विभागीय सदस्य राहुल मुथा,रणजीत श्रीगोंड,संवत्सर येथील शेतकरी आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शिर्डी मतदार संघ हा साईबाबा यांच्या समाधी स्थानामुळे जगाच्या नकाशावर आला आहे.मात्र अद्याप शिर्डी आणि काकडी विमानतळ आणि दुष्काळी गावे आदींची कनेक्टिव्हिटी पाहिजे इतकी आलेली नाही.त्यामुळे मुंबईला रेल्वेने जाण्यासाठी साईभक्तांना जाण्यास बारा तास तर पुण्यास जाण्यासाठी सात ते आठ तास लागत असून या दोन्ही महानगरांच्या जाण्यास मोठा वळसा घालून जावे लागत आहे.त्यामुळे साईभक्तांना मोठा वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे.तीच बाब शेतकरी आणि शेतमालाला मुंबई आणि आणि पुण्यास पाठविण्यास लागत असल्याने या रेल्वे मार्गाने स्वस्त असूनही कोणी शेतमाल पाठविण्यास तयार होताना दिसत नाही परिणामी यात रेल्वेचे मोठे नुकसान होत आहे.नाशिक शहरास जाण्यास मनमाड वरून मोठा पन्नास कि.मी.चा वळसा घालून जावे लागत आहे.त्यासाठी भाविकांना अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या शिर्डीला जवळके मार्गे समृध्दी महामार्गाला समांतर जोडून नाशिक-पुणे या प्रस्तावित लोहमार्गास जोडणेसह शिर्डी-शनी शिगणापूर रेल्वेमार्ग,बेलापूर परळी रेल्वे मार्ग,पुणे-नाशिक रेल्वे मार्ग,शिर्डी-शहापूर रेल्वे मार्ग,नगरसूल-शिर्डी आदी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करावे अशा मागण्यासह विविध मार्गावर नूतन गाड्या सुरू करण्याची गरज आहे.त्यामुळे हे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.

या शिवाय कोरोना साथीत बंद केलेल्या गाड्या पूर्ववत सुरू करणे गरजेचे आहे.त्याच साथीत अनेक प्रवाशी पत्रकार,ज्येष्ठ नागरिक,गंभीर आजाराचे रुग्ण आदींच्या सुविधा बंद करण्यात आलेल्या आहेत त्या पूर्ववत सुरू करणे गरजेचे आहे.याशिवाय साईनगर (शिर्डी) येथून अहील्यानगर-अमळनेर रेल्वे सेवा सुरू करणे,साईनगर शिर्डी येथून साईनगर पुणे (पनवेल) रेल्वे सुरू करणे,साईनगर-पुणे-दादर एक्सप्रेस दररोज सुरू करणे सह,साईनगर-पुणे हा मार्ग मुंबई सीएसटी पर्यंत वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी या बैठकीत म्हंटले आहे.त्याशिवाय अकोले,शिर्डी,शनीशिगणापुर,नेवासा आदी धार्मिक ठिकाणे देशभर प्रसिद्ध असून येथे येणारे भाविक,पर्यटक,यांना रेल्वेच्या सोई सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

दरम्यान श्रीरामपूर शहरातील रेल्वे विभागातील अतिक्रमणधारकांना नुकत्याच नोटीसा बजावल्या आहेत,बेलापूर (श्रीरामपूर) रेल्वे स्थानकावरील नवीन मालधक्काबाबत, लाडगाव-पढेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथे रेल्वे लाईन हद्दीत अंडरपास,रेल्वे ओव्हरब्रिजचे रुंदीकरण आणि बस स्टँडसमोरील नवीन भूमिगत रेल्वे पुल बांधणे गरजेचे आहे.मध्य रेल्वे दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील बेलापूर रेल्वे स्थानकावर गाड्या थांबवणे गरजेचे आहे.शिवाय कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव येथील पुल होणे गरजेचे आहे.रेल्वे पोल क्रमांक ४६७/२९ ते ४६८/२३ या अंतर्गत शेतकऱ्याना तसेच खिर्डीगणेश,संवत्सर येथील लक्ष्मणवाडीमधील शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे म्हंटले आहे.दरम्यान मतदार संघातील या विविध मागण्यांचे शिर्डी लोकसभा मतदार संघातील नागरिकांनी स्वागत केले आहे.