न्यायिक वृत्त
…’त्या’ आरोपींना घेतले संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या सचिन वॉच कंपनीत दि.१९ एप्रिलच्या पहाटेच्या सुमारास सुमारे विविध किंमती घड्याळासह ३० लाख रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीतील १० आरोपींपैकी ०८ आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपली असताना त्यांना शहर पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायिक कोठीडत रवानगी केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान त्यांना लगोलग छ.संभाजीनगर येथील पोलिसांनी ताब्यात घेऊन तेथील गुन्ह्याच्या तपासात कामी घेवून रवानगी केली असून तेथील गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान या गुन्ह्यातील ०८आरोपींना छ्त्रपती संभाजीनगर येथील पोलिसांनी लागलीच ताबा घेऊन तेथील अशाच प्रकारच्या गुन्ह्याच्या तपासासाठी रवागणी केली आहे.त्या ठिकाणी अशाच प्रकारचा गुन्हा तीन दिवस आधी घडला होता.त्यानंतर त्यानी कोपरगावकडे आपली वक्रदृष्टी वळवली होती.त्यातून हा गुन्हा घडला असल्याचे उघड झाले होते.
दरम्यान सदरचे सविस्तर वृत्त असे की,”आदल्या दिवशी साधारण वय वर्षे २५-३० असलेल्या काही चोरट्यांनी कोपरगाव येथील,’सचिन वॉच कंपनी’च्या दुकानात जावून महागडी घड्याळाची दुकानदार यांना विचारणा रेकी केली होती.दिनाक १९ एप्रिल २०२५ रोजी पहाटे नेमके सदर दुकानाजवळ कोणी नाही पोलिसांची गस्त नाही याची वेळ निवडून सदर दुकानावर हल्लाबोल केला होता.त्यात त्यांनी दुकानाचे शटर खोलण्यासाठी आधी रस्त्याच्या बाजूने दोन चादरी धरून आडोसा तयार केला असल्याचे दिसून येत असून सदर आडोशाला जावून ७-८ चोरट्यांनी शटरला पूर्ण ताकद लावून ते वर केले व दोन चोरट्यांनी बिनबोभाट दुकानात प्रवेश केला असल्याचे दिसून आले होते.दरम्यान आदल्या दिवशी केलेल्या टेहळणी नुसार नेमका टायटन सारख्या किमती कंपनीचा जवळपास ३२ लाख ६९ हजारांचा माल आतील काऊंटर मधून लंपास केला होता.त्यात ०३ लाख ४७ हजार रुपयांची रोकड तर २९ लाख २२ हजारांची २७५ घड्याळे असा एकूण ३२ लाख ६९ हजारांचा माल चोरी करून धूम ठोकली होती.

दरम्यान या आरोपींपैकी दोन जण मोबीन देवान व मुकेश शहा हे नुद्देमाल घेऊन नेपाळ मध्ये फरार झाले आहे.त्यांचा गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश अहिरे व त्यांचे सहकारी पोलिस शोध घेत आहेत.नगर येथील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग थेट बिहारपर्यंत केला होता.मात्र ही चादर गँग महाराष्ट्रात चोऱ्या करून बिहारला पळून जात असून त्या ठिकाणी कमी किमतीत हा माल विकत असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी दुकानदार संजय लालचंद लोहाडे (जैन)(वय-३२) कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक-१८९/२०२४ भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ३३१(४),३०५(अ) प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता.त्यांनी आपल्या तपासाची चक्रे जोराने फिरवून यातील दोन आरोपींचे लोकेशन तपासून त्यांना जेरबंद केले होते तर उर्वरित आरोपींना पुणे शिऊर या ठिकाणी बेड्या ठोकल्या होत्या.त्यांच्या साहाय्याने दिल्लीकडे कूच केलेल्या आरोपींना जेरबंद केले होते.त्यात हे चोरटे पोलिसांना बिहार मधील घोडासहन,तालुक-घोडासहन,जिल्हा मोतीहारी येथील आढळून आले होते.त्यांचा माग काढून पोलिसांनी त्या १० चोरट्या पैकी ०८ चोरट्यांना जेरबंद केले होते.त्यात सुरेंदर जयमंगल दास (वय-४०),रियाज नईम अन्सारी वय-४०),पप्पू बिंदा गोस्वामी (वय-४४),राजकुमार चंदन साह (वय-४४)राजकुमार विरा प्रसाद (वय-४५),नईम मुन्ना देवान (वय-३०),राहुल कुमार किशोरी प्रसाद (वय-२६),गुलशन कुमार ब्रम्हानंद प्रसाद (वय-२५).आदींच्या मुसक्या आवळल्या होत्या.त्यांना कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांचे समोर हजर केले असता त्यांनी त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.त्याची मुदत नुकतीच संपली होती.त्यांना पुन्हा शहर पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता सरकारी अभियोक्ता प्रदीप रणधीर यांनी जोरदार युक्तिवाद केला होता तर आरोपींच्या वतीनं ऍड.मोकळ या वकिलांनी युक्तिवाद केला होता.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्यांची न्या.भगवान पंडित यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
दरम्यान या गुन्ह्यातील ०८आरोपींना छ्त्रपती संभाजीनगर येथील पोलिसांनी लागलीच ताबा घेऊन तेथील अशाच प्रकारच्या गुन्ह्याच्या तपासासाठी रवागणी केली आहे.त्या ठिकाणी अशाच प्रकारचा गुन्हा तीन दिवस आधी घडला होता.त्यानंतर त्यानी कोपरगावकडे आपली वक्रदृष्टी वळवली होती.त्यात सचिन वॉच हे दुकान सापडले होते.
मात्र या आरोपींपैकी दोन जण मोबीन देवान व मुकेश शहा हे नुद्देमाल घेऊन नेपाळ मध्ये फरार झाले आहे.त्यांचा गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश अहिरे व त्यांचे सहकारी पोलिस शोध घेत आहेत.नगर येथील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग थेट बिहारपर्यंत केला होता.मात्र ही चादर गँग महाराष्ट्रात चोऱ्या करून बिहारला पळून जात असून त्या ठिकाणी कमी किमतीत हा माल विकत असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांना फरार दोन आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.