जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

इंधन दर वाढीचा फटका,कोपरगावात राष्ट्रवादीचा निषेध

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून त्यामुळे वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला.पेट्रोल,डिझेल बरोबरच घरगुती गॅस इंधनाच्या दरवाढीचा देखील उच्चांक झालेला आहे. शा परिस्थितीत केंद्र सरकारने पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटून सर्वसामान्य माणसाच्या घरातला स्वयंपाक होतो तो एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा दर अचानक २५ रुपयांनी वाढवला आहे. केंद्र सरकार एकामागे एक महागाईचे धक्के जनतेला देत असल्याच्या त्या निषेधार्थ आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येवून करण्यात आलेली इंधनाची दरवाढ मागे घ्यावी अशा आशयाचे निवेदन कोपरगाव तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

“कोणत्याही राज्यात निवडणुका लागल्या की इंधन दरवाढ नियंत्रित ठेवली जाते आणि निवडणुका संपल्या की दिलेली आश्वासन विसरून जायची असा केंद्र सरकारचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे.विरोधी पक्षात असतांना भाजपाने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केले त्यावेळच्या दुप्पट तिप्पट इंधनाचे दर झाले तरी केंद्र सरकार मुग गिळून गप्प आहे त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे”-संदीप वर्पे,जिल्हा कार्याध्यक्ष नगर जिल्हा.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवढीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसतो आहे. आज पुन्हा एकदा तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये ३५ पैसे प्रति लिटरनं वाढ केली आहे. देशाच्या राजधानीत पेट्रोलची किंमत ३५ पैसे प्रति लिटरनं वाढून ९९.८६ वर पोहोचली आहे.तर आज डिझेल किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळ राजधानी दिल्लीत डिझेलची किंमत ८९.३६ रुपये एवढी आहे. तर महाराष्ट्रात तर पेट्रोलने केंव्हाच शंभरी ओलांडली आहे.डिझलही शंभरीच्या जवळपास आहे.त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे.स्वयंपाकाचा गॅस हि पंचवीस रुपयांनी वाढवला आहे.या मुळे जनतेत इच्छिखांशी नाराजी आहे.त्याचा उद्रेक आता उमटू लागला आहे.अशीच घटना कोपरगाव शहरात घडली असून शहर व तालुका राष्ट्रवादीने आज कोपरगाव तहसीलदार यांना निवेदन देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.

त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,”कोणत्याही राज्यात निवडणुका लागल्या की इंधन दरवाढ नियंत्रित ठेवली जाते आणि निवडणुका संपल्या की दिलेली आश्वासन विसरून जायची असा केंद्र सरकारचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे.विरोधी पक्षात असतांना भाजपाने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केले त्यावेळच्या दुप्पट तिप्पट इंधनाचे दर झाले तरी केंद्र सरकार मुग गिळून गप्प आहे.इंधन दरवाढीचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य माणसाला बसतो.गेल्या दिड वर्षातल्या कोविड प्रादुर्भावाच्या कालखंडामध्ये अनेकांचे रोजगार गेले आहेत व ज्यांचे रोजगार आहेत त्यांच्या मिळकतीमध्ये कपात झाली आहे.त्यामुळे आपला घरखर्च कसा चालवायचा असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असतांना इंधनामुळे वाढत असलेली सर्वसामान्यांच्या मुळावर उठली असून आम्ही या इंधन दरवाढीचा निषेध करीत असून करण्यात आलेली दरवाढ मागे घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,शहराध्यक्ष सुनील गंगूले,युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,संकेत कडवे,रमेश गवळी,वाल्मीक लहिरे,अशोक आव्हाटे,दिनेश पवार,राजेंद्र जोशी,नारायण लांडगे,मुकुंद इंगळे,संदीप कपिले,राजेंद्र आभाळे,सागर लकारे, महेश उदावंत,विकास बेंद्रे,एकनाथ गंगूले,आकाश डागा,निखील डांगे,संदीप देवळालीकर,दिपक तिरमखे,संतोष दळवी,प्रकाश दुशिंग,विजय नागरे,बाळासाहेब रुईकर,हृषीकेश खैरनार,अमनभाई मणियार,संतोष बारसे,तालिफ सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close