जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

अविवेकी नेत्याचे कार्यकर्ते तसेच-…यांची टिका

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील नावात विवेक असलेल्या नेत्यांची कृती विवेकशून्य असून त्यांच्या कार्यकर्त्यांची तीच स्थिती झाली असून ज्यांची योग्यता नाही ते तालुक्याच्या लोकप्रतिनिधींवर खालच्या पातळीची टीका करतात यावरून जसा अविवेकी नेता तसेच त्यांचे कार्यकर्ते असल्याने त्यांचे भवितव्य  काय असणार त्यांना त्यांची किंमत आगामी काळात चुकवावी लागणार असल्याचे सूतोवाच कान्हेगावचे उपसरपंच दिपक चौधरी यांनी जिल्हा बँकेचे संचालक कोल्हे यांचे नाव न घेता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.

 

“आमच्या नेत्यावर कितीही टीका करा तुमच्या टीकेने तुमची संस्कृती दिसून येईल आणि त्याच बरोबर तुम्ही आमच्या नेत्याच्या विकासाची बरोबरी कधीच करू शकत नाही हे देखील सिद्ध होईल”- दिपक चौधरी,उपसरपंच,कान्हेगाव ग्रामपंचायत.

   कोपरगाव सह राज्यात विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत चालेल्या आहेत तसे तसे वातावरण तापत चालले असून आगामी काळात आणखी त्यात भर पडणार असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे राज्यात जशी त्यात भर पडत चालली आहे.त्याला कोपरगाव विधानसभा मतदार संघ अपवाद नाही.वर्तमानात आ.आशुतोष काळे आणि त्यांचे विरोधक (?) विवेक कोल्हे यांच्यात आरोप प्रत्यारोप झडत आहेत त्यात चौधरी यांनी हा आरोप केला आहे.

    त्यानी आपल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की,”आजवरच्या कोपरगाव मतदार संघाच्या इतिहासात कोपरगाव मतदार संघाचा ‘न भूतो न भविष्यती’ असा विकास झाला असून कान्हेगावला देखील विकास कामांसाठी ३४ कोटी निधी मिळाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.आपल्या कुटुंबाकडे चाळीस वर्ष सत्ता ती देखील गल्लीपासून दिल्लीपर्यंत.त्या चाळीस वर्षात जो विकास आपले कुटुंब करू शकले नाही तो विकास आ.आशुतोष काळे यांनी या पाच वर्षात करून दाखविला आहे याची सल कुठेतरी विवेकशून्य नेत्याला बोचत आहे.त्यामुळे आम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या टीकेला मुळीच खालच्या पातळीवरची भाषा वापरणार नाही,कारण ती आमच्या नेत्याची आणि आमची देखील संस्कृती नाही मात्र त्यांना अर्धवट नेत्याचे अर्धवट कार्यकर्ते जरूर म्हणणार अशी टीका केली आहे.

   कोपरगाव मतदार संघातील जनता हुशार आहे.आमच्या नेत्याचे कर्तृत्व काय आहे हे जनतेने पाच वर्षात पाहिले आहे आणि जनताच या पाच वर्षाची आणि त्या चाळीस वर्षाची तुलना करीत आहे.त्यामुळे आपण आमच्या नेत्यावर कितीही टीका करा तुमच्या टीकेने तुमची संस्कृती दिसून येईल आणि त्याच बरोबर तुम्ही आमच्या नेत्याच्या विकासाची बरोबरी कधीच करू शकत नाही हे देखील सिद्ध होईल.ज्यांना विकासावर बोलता येत नाही त्यांच्याकडून दुसऱ्या अपेक्षा तरी काय करणार मात्र तुम्हाला विकास दिसत नसेल तर डोळ्याचा मोतीबिंदू वाढला आहे का ? याची खात्री करून घ्या असे आवाहन उपसरपंच दिपक चौधरी यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close