कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव शहराचे अंदाजपत्रक काळजीपूर्वक सादर करा-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आगामी वर्षाचे नगरपालिकेचे अंदाजपत्रक हे प्रशासक असलेल्या मुख्याधिकारी यांनी वाढत्या हद्द वाढीचा व शहराचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेऊन काळजीपूर्वक सादर करावे अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी नुकतीच केली आहे.
“कोपरगाव शहरात ठिकठिकाणी महिला व पुरुष आदिसांठी स्वच्छ अद्यावत सुलभ शौचालय व त्याची देखभाल दुरुस्ती,मुलांना खेळण्यासाठी मैदान,ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला जनतेला त्रास होणार नाही असे मोजके आरोग्यासाठी उपकरणे,छोटी जिमचे साहित्यासाठी,टपरीधारक यांचे साठी शॉपिंग सेंटर,छोटे खोका शॉप,ठिकठिकाणी हॉकर्स झोन करण्यासाठी जागा,झाडे जगवणे,हरित गाव करणे,अद्यावत कचरा कुंड्या,वाचनालय आदी ठिकाणी असलेल्या अपूर्ण सुविधांसाठी आर्थिक तरतूद करावी”-मंगेश पाटील,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगर परिषद.
कोपरगांव नगरपरिषदेचे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे व त्यांच्या काळातील शेवटचे अंदाजपत्रक तत्कालीन नगरराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सादर केले होते.त्यानंतर नगराध्यक्ष पदाचा कालावधी गत नोव्हेंबर २०२१ मध्ये संपला आहे.व त्यानंतर प्रशासन म्हणून शांताराम गोसावी यांची नेमणूक झाली आहे.त्यानंतर कोरोना विषाणूची साथ आणि मराठा आरक्षण कोर्ट-कचेऱ्यामध्ये अडकल्याने नगरपरिषद निवडणूक कधी होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.अशातच वित्तीय वर्ष संपत आले आहे.त्यामुळे अंदाज अपत्रक सादर करण्याची वेळ मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांचेवर येणार आहे या पार्श्वभूमीवर मंगेश पाटील यांनी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात त्यानी पुढे म्हटले आहे की,”नगरपालिका ही शासनाची सेवा व विकास करणारी,देणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे.गेल्या सव्वा वर्षापासून निवडणुका लांबल्या असल्यामुळे कोपरगाव नगरपालिकेत नगरसेवक व नगराध्यक्ष हे स्थानिक शहरातील प्रतिनिधी म्हणून नाही आहेत.त्यामुळें प्रशासक व मुख्याधिकारी या दोन्ही पदाचे अधिभार ज्यांच्याकडे ते मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी आगामी वर्षाचे कोपरगाव नगरपालिकेचे अंदाजपत्रक सादर करताना विचारपूर्वक,जनहिताचा विचार करून व शहराचा विकासाच्या दृष्टीने विचारपूर्वक ते सादर करणे गरजेचे आहे.
फेब्रुवारी,मार्च महिना जवळ आला की पुढील वर्षाचे बजेट तरतूद हे सादर करावे लागते.नुकतेच केंद्र सरकारने आपले अंदाजपत्रक जाहीर केले.त्यानंतर आता महाराष्ट्र शासन लवकरच आपली अंदाजपत्रक जाहीर करेल.आत्ता सर्वे स्थानिक स्वराज्य संस्था हे ही अंदाज पत्रक सादर करतात.मग ते जिल्हाधिकारी व नंतर महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी जाते.या वर्षी कोपरगाव शहराची हद्दवाढ झाली आहे.शहरालगत चे सर्वे छोटी छोटी उपनगरे,भाग शहराला जोडल्या गेल्यामुळे शहर मोठे झाले आहे.पाणी,आरोग्य,वीज,रस्ते,गटारी इत्यादी सुविधा आवश्यकच असल्याचे म्हटले आहे.
जनतेला स्वच्छ रोज पाणी,आरोग्याची चांगली सुविधा-स्वच्छ्ता,दर मिहिण्याला डासासाठी औषध फवारणी,काही ठिकाणी पाण्याच्या जलवाहिन्या,पाणी शुद्धीकरण करणे,रस्त्यावरील खड्डे डांबराने बुजवण्याठीचे कामे,दुरुस्तीची तरतूद,धूळ रहित गाव करण्यासाठी,लहान मुलांना खेळायला गावातील सर्व भागात खेळणी सह बागा,ज्या त्या भागातील खुल्या व मोकळ्या जागा विकसित झाल्या पाहिजे,ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित फिरण्यासाठी व विविध खेळ,योगासनासाठी जागा,हास्य क्लब आदींसाठी सोय होणे गरजेचे आहे.
दरम्यान अमरधाम मधील काही काम अजुन करावयाचे असल्याने त्या कामासाठी निधी,कब्रस्थानसाठी,खुले नाट्यगृह,शहरात पार्किंगची सोय,ठिकठिकाणी महिला व पुरुष आदिसांठी स्वच्छ अद्यावत सुलभ शौचालय व त्याची देखभाल दुरुस्ती,मुलांना खेळण्यासाठी मैदान,ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला जनतेला त्रास होणार नाही असे मोजके आरोग्यासाठी उपकरणे,छोटी जिमचे साहित्यासाठी,टपरीधारक यांचे साठी शॉपिंग सेंटर,छोटे खोका शॉप,ठिकठिकाणी हॉकर्स झोन करण्यासाठी जागा,झाडे जगवणे,हरित गाव करणे,अद्यावत कचरा कुंड्या,वाचनालयातील कमी असलेल्या सुविधांसाठी नगरपालिका शाळा सुधारण्यासाठी,भाजी मार्केट,मच्छी मार्केट,मटण मार्केट सुविधा देऊन अद्यावत करण्यासाठी,कर्मचारी हित आदींची देयके आदी विविध बाबींचा विचार करून या अंदाजपत्रकात गाव व गावाची बाजारपेठ कशी वाढेल या साठी तरतूद करावी व निवडणुकीनंतर पुढील काळात नगराध्यक्ष व नगरसेवक यांना काम करणे सोपे होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.त्यामुळे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांची आगामी निवडणुकीची तयारी अंतिम टप्यात आली की काय अशी चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात व नागरिकांत सुरु झाली आहे.