जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

..या शाळेच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्ण पदक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

वय-१४ वर्ष  वयोगटातील ६७ व्या राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धा रांची झारखंड येथे ०१ ते ०५ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न झाली असून यात स्पर्धेचा अंतिम सामना महाराष्ट्र विरुध्द उत्तरप्रदेश या संघामध्ये झाला असून या अटीतटीच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने बाजी मारत सुवर्ण पदकावर आपले नावे कोरले आहे.यामध्ये आत्मा मालिकच्या खेळाडुंनी मोलाची कामगिरी बजावली आहे.महाराष्ट्राच्या विजेत्या संघात आत्मा मालिकच्या आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुलाचे जितेंद्र वळवी व उमेष वळवी हे दोन खेळाडू असल्याची माहिती हाती आली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

“आत्मा मालिक संस्थेतील खो-खो खेळाडूंना शालेय राष्ट्रीय स्तराचे सुवर्ण पदक मिळाले हे आत्मा मालिकसाठी अत्यंत अभिमानाची बाब असून हे दोन्हीही विद्यार्थी नंदुरबार जिल्हयातील असून इयत्ता पहिलीपासून आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहे.या विद्यार्थ्याचे पालक मोलमजुरीचे काम करतात.शासनाच्या नामांकित योजनेतून हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत”-नंदकुमार सूर्यवंशी,अध्यक्ष,जंगली महाराज आश्रम ट्रस्ट,कोकमठाण.

नुकत्याच झारखंड येथे १४ वर्ष वयोगटातील ६७ व्या राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धा रांची झारखंड येथे दि.०१ ते ०५ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न झाल्या आहेत.यात स्पर्धेचा अंतिम सामना महाराष्ट्र विरुध्द उत्तरप्रदेश या संघामध्ये झाला असून या अटीतटीच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने बाजी मारत सुवर्ण पदकावर आपले नावे कोरले आहे.यात  आत्मा मलिक संघाने बाजी मारली आहे.दरम्यान यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

   यावेळी अध्यक्ष सूर्यवंशी म्हणाले की,”या खेळाडूंना शालेय राष्ट्रीय स्तराचे सुवर्ण पदक मिळाले हे आत्मा मालिकसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.हे दोन्हीही विद्यार्थी नंदुरबार जिल्हयातील असून इयत्ता पहिलीपासून आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहे.या विद्यार्थ्याचे पालक मोलमजुरीचे काम करतात.शासनाच्या नामांकित योजनेतून हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या विद्यार्थ्यामध्ये मुळातच चपळता,काटकता,ध्येयप्रती पूर्ण  निश्ठेने काम करण्याची तळमळ असतेच म्हणूनच तालुका,जिल्हा,विभाग व राज्य स्तरातील स्पर्धेकरीता या विद्याथ्र्यांनी दिपावलीची सुट्टी न घेता संकुलात राहुन सरावामध्ये सातत्य ठेवले.शैक्षणिक वर्ष-२०२२-२३ मध्ये आत्मा मालिकच्या एकूण ९४ विद्यार्थ्यानी राष्ट्रीय स्तरावरील खेळामध्ये राज्याचे प्रतिनिधीत्व केले.आत्मा मालिकमध्ये असणारे ४२ क्रीडा प्रशिक्षक ४० खेळांचे प्रषिक्षण व प्रशिक्षणाची जुन महिन्यापासूनचे केले जाणारे कालबध्द नियोजन यामुळेच हे यश प्राप्त झाले असे यावेळी त्यांनी सांगितले.

            क्रीडा व्यवस्थापक साईनाथ वर्पे म्हटले की,’जितेंद्र वळवी व उमेश वळवी हे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात इयत्ता पहिलीपासून शिक्षण घेत आहे.हे दोन्हीही विद्यार्थी आदिवासी भागातील असून अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करुन त्यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे.हे विद्यार्थी भविष्यात मोठे खेळाडू होतील याचा विश्वास असून संकुलातील विद्याथ्र्यांना या सुवर्ण पदकाच्या कमाईमुळे प्रेरणा मिळाली आहे असे यावेळी म्हटले.या दोन्ही खेळाडूंना खो-खो प्रशिक्षक रविंद्र नेंद्र,गणेश म्हस्के,आण्णासाहेब गोपाळे,अर्जून खेकडे यांचे मार्गदर्शन लाभले होते.

    या यशस्वी खेळाडूंचे प.पू.आत्मा मालिक माउली,संतगण,अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,सरचिटणीस हनुमंत भोंगळे, विश्वस्त प्रकाश भट,प्रकाश गिरमे,बाळासाहेब गोर्डे,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,प्राचार्य माणिक जाधव, निरंजन डांगे,नामदेव डांगे,संदिप गायकवाड,वसतिगृह व क्रीडा व्यवस्थापक साईनाथ वर्पे,व्यवस्थापक हिरामण कोल्हे,लेखा व्यवस्थापक गोपाल कुलकर्णी आदिंनी अभिनंदन केले आहे.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close