जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
ग्रामविकास

…या गावात वयोश्री योजनेचा उत्साहात शुभारंभ !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

राज्य सरकारने ”मुख्यमंत्री वयश्री योजने”ची घोषणा केली आहे.या योजनेन 65 वर्षावरील जेष्ठ नागरीकांच्या खात्यात 3 हजार रूपये जमा केले जाणार आहे.या योजनेला कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या शिबिरास ज्येष्ठ ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान या शिबिरास पहिल्याच दिवशी सुमारे १०२ ज्येष्ठ ग्रामस्थांनी आपली नावे नोंदवून अर्ज दाखल केले आहेत.आता सदर अर्ज ग्रामपंचायत ऑनलाईन नोंदणी करणार असल्याची माहिती ग्रामसेवक सतीश दिघे यांनी दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणूक पाहता राज्यसरकारने सर्वसामान्यांसाठी योजनांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे.त्यातून आता राज्य सरकारने ”मुख्यमंत्री वयोश्री योजने”ची घोषणा केली आहे.या योजनेन 65 वर्षावरील जेष्ठ नागरीकांच्या खात्यात 3 हजार रूपये जमा केले जाणार आहेत.

राज्यातील 65 वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व,अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने,उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मन: स्वास्थ केंद्र,योगोपचार केंद्र उपलब्ध करणे. मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ केंद्रे,योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन, प्रशिक्षण देण्यासाठी पात्र लाभार्थींना 3000 रूपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.या बाबत जवळकें ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने नुकतेच या योजनेचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्याचे उद्घाटन जलसंपदा विभागाचे माजी उपभियंता एस.के.थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी सरपंच सारिका विजय थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर प्रसंगी जवळके ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय थोरात,कार्यकर्ते चंद्रकांत थोरात,दत्तात्रय वाकचौरे,भिवराज थोरात,शांताराम थोरात,बाबुराव वाकचौरे,मारुती थोरात,आशा सेविका वंदना थोरात,आरोग्य केंद्राच्या सहाय्यक सोनाली पानसरे,आरोग्यसेविका सौ.अत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

   दरम्यान या शिबिरास पहिल्याच दिवशी सुमारे १०२ ज्येष्ठ ग्रामस्थांनी आपली नावे नोंदवून अर्ज दाखल केले आहेत.आता सदर अर्ज ग्रामपंचायत ऑनलाईन नोंदणी करणार असल्याची माहिती ग्रामसेवक सतीश दिघे यांनी दिली आहे.दरम्यान उर्वरित सुमारे ४०-४२ ग्रामस्थांचे अर्ज भरण्याचे काम सुरू असल्याची माहिती सरपंच सारिका थोरात यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close