जाहिरात-9423439946
सण-उत्सव

कोपरगावातील ‘तिरंगा फेरी’ हा लक्षवेधी उपक्रम-तहसिलदार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाची घोषणा केली त्याला समता पतसंस्थेने १ हजार १११ फूट राष्ट्रध्वज निर्माण करून त्याची फेरी करून लक्षवेधी उपक्रम राबविला असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

समता तिरंगा फेरीचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुतर्फा मोठी गर्दी झाली होती.कोपरगाव शहरातील व्यापारी,व्यावसायिक,उद्योजक,राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी तिरंगा ध्वजामध्ये झेंडू,गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत केले.व्यापारी महासंघाचे नारायण अग्रवाल यांनी कोपरगाव शहरातील अहिंसा स्तंभाजवळ फटाक्यांची आतिशबाजी करत फेरीचे स्वागत केले आहे.

भारतात यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मुक्तचस संपन्न झाला आहे.आज पंधरा ऑगस्ट यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत.देशभरात स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.कोपरगाव शहरासह तालुक्यात देशभरात विविध देशभक्तिपर उपक्रम आणि अभियान राबवण्यात येत आहेत.कोपरगाव येथील समता पतसंस्थेने स्व.खंडाप्पा कोयटे विद्यालयात ७५ फूट धजारोहन केले असून १ हजार १११ फूट राष्ट्रध्वजाची फेरी आयोजित केली होती.त्या नंतर ते एका कार्यक्रमात बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,संजीवनी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ,लायन्स क्लबचे अध्यक्ष परेश उदावंत,लिओ क्लबचे अध्यक्ष सुमित सिनगर,सुधीर डागा,प्रदीप साखरे,राजकुमार बंब श्वेता अजमरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे यांनी केले ते म्हणाले की,”कोपरगाव शहरात तिरंगा रॅलीचे नियोजन समताने स्वीकारले आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्ट रोजी गांधी चौक ते निवाऱ्या पर्यंत तिरंगा ध्वज घेऊन जाण्याचे ठरविले त्यासाठी समता इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक,विद्यार्थी,कर्मचारी यांनी गांधी पुतळ्यापासून ते निवाऱ्यातील स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयापर्यंत स्वतःच्या खांद्यावर तिरंगा ध्वज घेऊन आले.या तिरंगा रॅलीतील समताच्या विद्यार्थ्यांचा सहभाग हा विशेष लक्षवेधी ठरला आहे.

सर्वप्रथम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त समता पतसंस्था,समता इंटरनॅशनल स्कूल,कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने कोपरगाव शहरातील गांधी चौक ते निवाऱ्यापर्यंत काढण्यात आलेल्या १ हजार १११ फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाची भव्य दिव्य अशा समता तिरंगा रॅलीचा शुभारंभ कोपरगाव तालुक्याचे माजी सैनिक व कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमेन असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष युवराज गांगवे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात करण्यात आला.

फेरीचा शुभारंभ करण्यापूर्वी गांधी चौक येथील गांधी पुतळ्याला समता परिवाराचे संस्थापक कोयटे,कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.समता तिरंगा फेरीचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुतर्फा मोठी गर्दी झाली होती.कोपरगाव शहरातील व्यापारी,व्यावसायिक,उद्योजक,राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी तिरंगा ध्वजामध्ये झेंडू,गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत केले.व्यापारी महासंघाचे नारायण अग्रवाल यांनी कोपरगाव शहरातील अहिंसा स्तंभाजवळ फटाक्यांची आतिशबाजी करत फेरीचे स्वागत केले आहे.समता इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक,विद्यार्थी,समता नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी,कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ कोपरगाव,तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे सदस्य,कोपरगाव शहरातील तमाम नागरिक या भव्य दिव्य रॅलीत सहभागी होत स्वतःच्या खांद्यावर १ हजार १११ फूट लांबीचा तिरंगा ध्वज घेत निवाऱ्यातील स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयापर्यंत घेऊन जात फेरीचा समारोप केला आहे.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समता इंटरनॅशनल स्कूलचे उपप्राचार्य समीर आत्तार यांनी केले तर उपस्थितांचे आभार समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close