गुन्हे विषयक
नवविवाहितेस पेटविले,कोपरगावात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या व मूळ माहेर सिन्नर तालुक्यातील लिंगटांगवाडी असलेल्या व पाच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नव विवाहितेस,”आपल्या माहेराहून नवीन घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणावे” या मागणीसाठी तिला वेळोवेळी मारहाण,शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ करून तिला पेटवून दिल्याने ती जखमी झाली त्यात उपचार करताना पूजा निखिल मेहेत्रे हिचे निधन झाल्या प्रकरणी आरोपी पती निखिल विलास मेहेत्रे व तिचा सासरा,सासू,दोन दीर,जावं असे सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना कोपरगाव शहर पोलिसानी अटक केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
राज्यात हुंडाबळीचा कायदा सण-१९६१ साली होऊनही आजही महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी दोनशेपेक्षा अधिक हुंडाबळी अधिकृतपणे नोंदवले जातात.शिक्षणाच्या प्रसारानंतरही हुंडाप्रथा कमी झालेली नाही.या संबंधी कायदा कडक असूनही हुंडाबळी वाढतच आहेत.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत दि.२६ जुलै रोजी सकाळी ०९.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.
हुंडा प्रथेसारख्या दुष्ट रुढीला आळा बसावा आणि निरपराध विवाहित स्त्रियांचा छळ व हुंडाबळी थांबावे यासाठीचा कायदा १ जुलै १९६१ रोजी लागू झाला.हे जरी वास्तव असले तरी इतिहास सांगतो की २५० वर्षांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी हुंडाबंदीचा कायदा केला होता.त्यांनी हुंडा देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला शिक्षा ठोठावल्याची नोंद आपल्या इतिहासात आहे.याचा अर्थ हुंडा ही दुष्ट रूढी अनेक शतकांची जुनी परंपरा आहे.परंतु आजही हुंड्याची अनिष्ट प्रथा बंद किंवा कमीही झाली नाही.आजही महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी दोनशेपेक्षा अधिक हुंडाबळी अधिकृतपणे नोंदवले जातात.शिक्षणाच्या प्रसारानंतरही हुंडाप्रथा कमी झालेली नाही.या संबंधी कायदा कडक असूनही हुंडाबळी वाढतच आहेत.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत दि.२६ जुलै रोजी सकाळी ०९.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. मयत विवाहित तरुणीने आपल्या माहेराहून दोन नवीन घरे बांधण्यासाठी व संसारोपयोगी चीजवस्तू आणण्यासाठी तिने दोन लाख रुपये आणावे या करिता तिला दि.सोळा फेब्रुवारी २०२१ रोजी लग्न झाले पासून तिचा शारीरिक,मानसिक,त्रास देऊन,शिवीगाळ करून तिला दि.२६ जुलै रोजी सकाळी ०९.३० वाजेच्या सुमारास मारहाण करून पेटवून दिले आहे.तिला जखमी अवस्थेत लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तिचे तिथे दि.२८ जुलै रोजी उपचार सुरु असताना निधन झाले आहे.या प्रकरणी मयत महिलेचे पिता पांडुरंग रामभाऊ लोंढे (वय-५१) रा.लिंगटांगवाडी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आरोपी नवरा निखिल मेहेत्रे,सासरा विलास निवृत्ती मेहेत्रे,सासू लता विलास मेहेत्रे,दोन दीर आशिष मेहेत्रे,स्वप्नील मेहेत्रे,जाव रेखा स्वप्नील मेहेत्रे सर्व रा.कुंभारी याचे विरुद्ध गु.र.क्रं.२३५/२०२१ भा.द.वि.कलम ३०४(ब),४९८(अ),३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भरत नागरे हे करीत आहेत.