जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

माहेराहून सोळा लाख आणावे यासाठी महिलेचा छळ,सात जणांविरुद्ध गुन्हा

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

फिर्यादी ही सासरी नांदत असताना कॉस्मेटिकचे नवीन दुकान टाकणे साठी सोळा लाख रुपये माहेराहुन आणावेत या करता आरोपी सुहास बाबुराव साठे (नवरा) सह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

लग्नात मानपान दिला नाही, हुंडा कमी दिला,गाडी घेण्यासाठी माहेराहून पैसे आणाले नाहीत, चारित्र्याचा संशय अशा असंख्य कारणावरून विवाहीतेंचा मानसिक आणि शा‌रीरिक छळ होण्याच्या घटना दररोज घडतात.यातील काही घटना पोलिस स्टेशनपर्यंत पोहचतात तर काही ‘सामंजस्याने’ मिटवल्या जातात.कोपरगाव तालुक्यातही या घटनांची कमी नाही.वर्तमानात त्याचे प्रत्यन्तर येत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की.फिर्यादी महिलेचे लग्न दि.३० सप्टेंबर २००९ रोजी झाल्यावर नव्या नावलाईचे नऊ दिवस संपल्यावर या महिलेवर आपल्या माहेराहून पैसे आणावे यासाठी दबाव वाढत चालला होता.त्या साठी विविध करणे पुढे केली जात होती.त्यात नवरा सुहास साठे व सासरा बाबुराव विष्णुपंत साठे,सासू शंकुतला बाबुराव साठे,दीर,विजय बाबुराव साठे,अजय बाबुराव साठे,मिनाक्षी विजय साठे,रुपाली अजय साठे सर्व रा.रामचंद्र नगर ज्योती पार्क ई धनकवाडी पुणे यांनी फिर्यादिचा मानसिक व शारीरीक छळ करुन तिला मारहाण,शिवागीळ,दमदाटी करुन तिला घराबाहेर काढुन दिले असल्याची फिर्याद मेघना सुहास साठे (वय-३५) रा.रामचंद्र नगर ज्योती पार्क ई धनकवाडी पुणे ह.रा.बडते बिल्डींग बॅंक रोड कोपरगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे कोपरगावात खळबळ उडाली आहे.

हुंड्यासाठी छळ करून विवाह‌तिेला आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा तिचा जीवच घेण्याचे प्रकार शहरी भागात वाढीस लागले आहेत.गत वर्षातच हुंड्यासाठी महिन्याकाठी अनेक विवाहितांना प्राणास मुकावे लागले आहे.लग्नात मानपान दिला नाही, हुंडा कमी दिला,गाडी घेण्यासाठी माहेराहून पैसे आणाले नाहीत, चारित्र्याचा संशय अशा असंख्य कारणावरून विवाहीतेंचा मानसिक आणि शा‌रीरिक छळ होण्याच्या घटना दररोज घडतात.यातील काही घटना पोलिस स्टेशनपर्यंत पोहचतात तर काही ‘सामंजस्याने’ मिटवल्या जातात.कोपरगाव तालुक्यातही या घटनांची कमी नाही.अशी नुकतीच एक घटना घडली असून या प्रकरणात फिर्यादी महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या घटनेप्रमाणे या महिलेला आरोपी सुहास बाबुराव साठे,बाबुराव विष्णुपंत साठे, शंकुतला बाबुराव साठे,विजय बाबुराव साठे,अजय बाबुराव साठे,मिनाक्षी विजय साठे रुपाली अजय साठे आदींनी माहेरहुन आई वडीलांकडुन कॉस्मेटिकचे नवीन दुकाण टाकणे साठी १६ लाख रुपये आणावेत याकरता दि.३० सप्टेंबर २००९ पासून ते दि.२८ ऑक्टोबर २०१९ पर्यंत विवाहितेचा सासरी नांदत असताना छळ केल्याचे म्हटले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपलय दप्तरी गु.र.क्रं.भा.द.वि.कलम-४९८ (अ)३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close