जाहिरात-9423439946
कृषी विभाग

जिल्हा बँक एक राकमी कर्जफेड योजना राबवणार-…यांची माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

अ.नगर जिल्हा सहकारी बँकेने थकीत शेती कर्जाबाबत एक रकमी कर्ज परतफेड योजनेचा एक क्रांतिकारी निर्णय काल झालेल्या बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे आभार मानले आहे.

राष्ट्रीय-कृत बँकेप्रमाणेच जिल्हा बँकेलाही भारतीय रिझर्व बँकेचे नियम,अटी,शर्ती लागू आहेत परंतु राष्ट्रीयकृत बँका थकीत कर्जाबाबत वन टाइम सेटलमेंट अर्थात एक रकमी कर्ज परतफेड योजना राबवतात त्याप्रमाणे जिल्हा बँकेंनी सदर योजना राबविण्याचे गरज होती.शेतकऱ्यांच्या हितार्थ सदर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळांनी यापूर्वीच हा निर्णय घेऊन शेतकऱ्यांची असलेल्या जिल्हा बँकेत शेतकऱ्यांसाठी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे होते मात्र त्याबाबत टाळाटाळ करण्यात येत होती त्यास उच्च न्यायालयात अड्.अजित काळे यांनी आव्हान दिले होते.त्यास यश आले आहे.

याबाबत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संभाजीनगर उच्च न्यायालयाचे विधीज्ञ अजित काळे यांनी वेळोवेळी जिल्हा बँक,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार,भारतीय रिझर्व बँक यांना प्रत्यक्ष भेटून व कायदेशीर पत्र व्यवहार करून जिल्हा बँकेने एक रकमी कर्ज परतफेड योजना राबवण्याची बाब निदर्शनास आणून दिली होती.तसेच यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती.सदर याचिकेचे सुनावणी चालू असतानाच जिल्हा बँकेने एक रकमी कर्ज परतफेड योजना राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

वास्तविक राष्ट्रीय-कृत बँकेप्रमाणेच जिल्हा बँकेलाही भारतीय रिझर्व बँकेचे नियम,अटी,शर्ती लागू आहेत परंतु राष्ट्रीयकृत बँका थकीत कर्जाबाबत वन टाइम सेटलमेंट अर्थात एक रकमी कर्ज परतफेड योजना राबवतात त्याप्रमाणे जिल्हा बँकेंनी सदर योजना राबविण्याचे गरज होती.शेतकऱ्यांच्या हितार्थ सदर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळांनी यापूर्वीच हा निर्णय घेऊन शेतकऱ्यांची असलेल्या जिल्हा बँकेत शेतकऱ्यांसाठी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे होते.आज रोजी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर सहकारी संस्था मालक सदरी नोंदी लागले असून सदर शेतकऱ्यांना पंचवीस वर्षापासून शासनाच्या कुठल्याही कर्जमाफी योजनेचा लाभ झालेला नाही हे विशेष ! त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे दुरापास्त झाले.आज घेतलेल्या अ.नगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निर्णयाचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व शेतकरी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे व निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.

नेवासा तालुक्यातील शेतकरी संघटनेचे त्रिंबक भदगले,नरेंद्र काळे व बाबासाहेब नागवडे यांनी तालुक्याची तीस ते चाळीस सहकारी सेवा सोसायटीचे जिल्हा बँकेने एक रक्कम परत कर्ज परतफेड योजना राबवल्याबाबतचे ठराव पत्र घेऊन सदर पत्राची एक प्रत जिल्हा बँक एक प्रत न्यायालयीन लढ्यासाठी ऍड.अजित काळे यांच्याकडे सुपूर्त केली होती.सदर ठराव नेवासा तालुका शेतकरी संघटनेला देण्यासाठी नेवासा तालुक्यातील वि.का.स.संस्थाच्या अध्यक्ष व सचिव यांनी राजकीय दबाव झुगारून ठराव दिले त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात येत आहे.

दरम्यान सदर ठरावाच्या आधारे वकील अजित काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती.सदर याचिकेच्या सुनावणी दरम्यान जिल्हा बँकेला व सहकार खात्याला ही नोटिसा उच्च न्यायालयाने पाठवल्या होत्या.
दरम्यान याबाबत वकील अजित काळे यांनी शेतकऱ्यांसाठी विना मोबदला न्यायालयीन लढा दिला आहे त्यांचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.जिल्हा बँकेचे संचालक मंडळ हेच राज्य शासनाचे विधिमंडळाचे सदस्य व मंत्री आहेत त्यांनी सदर निर्णय तातडीने घेऊन आठ दिवसाच्या आत अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज पुरवठा तातडीने द्यावा.तसेच ज्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला नाही.कुठल्याही वित्त पुरवठ्याच्या ७५% ‘रक्कम बँकेला केंद्र सरकार विमा कवच देते.त्यामुळे बँकेचे २५% रक्कम गुंतते त्यांच्यासाठीही रिझर्व बॅंकेच्या नियमाप्रमाणे मुद्दलाच्या २५% रक्कम भरून घेऊन एक रकमी कर्ज परतफेड योजना राबवावी.शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकेच्या न्यायालयीन प्रक्रियेपासून दिलासा द्यावा.दोन्ही कर्जमाफी योजनेत शासनाने तारखेची,रकमेची व क्षेत्राची टाकून शेतकऱ्यांना वंचित ठेवले.राज्यात किमान ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांना अटी,शर्ती मुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ झालेला नाही अशा परिस्थितीत अतिरिक्त ऊस,दुधाचे पडलेले दर,कोरोना पार्श्वभूमीमध्ये शेतमालाचे घसरलेले दर,अतिवृष्टी गारपीठ सोयाबीन-कापसाचे पडलेले दर आदि सर्व समस्यांमुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झालेली आहे.त्यामुळे शेतकरी कुठल्याही बँकेचे कर्ज भरण्यासाठी सक्षम नाही तरी त्यांनाही दिलासा मिळण्यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची गरज आहे अशी मागणी अ.नगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने अनिल औताडे,रूपेंद्र काले हरिभाऊ तुवर,शिवाजी जवरे,बच्चू मोडवे,युवराज जगताप,योगेश मोरे,संजय जगताप,नानासाहेब गाढवे,नारायण रणजित सूळ टेकाळे,अशोक टेकाळे,साहेबराव चोरमल,कडू पवार,डॉ.रोहित कुलकर्णी,गोविंद वाघ,डॉ.दादासाहेब अदिक डॉ.नवले इंद्रभान चोरमल,नारायण पवार,सुदाम औताडे प्रभाकर कांबळे,दिलीप औताडे,भरत वमने,शैलेश वमने,ऋषी मोहन,साहेबराव हळनोर,भरत जाधव आदी कार्यकर्त्यानी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close