गुन्हे विषयक
…या शहरात पुन्हा गोवंश जप्त,पोलिसांची बैठक ठरली निष्फळ !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात आगामी बकरी ईद आणि एकादशीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि शहरातील खाटीक समाजातील नागरिक यांची संयुक्त बैठक काल सकाळी संपन्न झाली असून यात गोवंश वगळता अधिकारिक प्राण्यांची कुर्बानी द्यावी असे आवाहन पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी करून पंधरा तास उलटत नाही तोच संबंधितांनी फोल ठरवले असल्याचे निष्पन्न झाले आहे.यातील संजयनगर येथील आरोपी शाहरुख लतिफ कुरेशी (वय-३५) याचे विरुध्द गुन्हा दाखल झाल्याने त्यामुळे शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान या पोलिस बैठकीत सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मोठ्या तावातावाने गोवंश हत्या होणार नाही याची हमी देत पोलिस आणि इतर समाज बांधवांनी खाटीक समाजाचा गुन्हा नसताना उगीच बोल लावू नये ;लावल्यास आपण…येव करू…तेव करू…! असा इशारा दिला होता.मात्र त्यांनाच या आरोपींनी तोंडघशी पाडले असल्याचे दिसून आले आहे.
कोपरगाव शहरात हिंदू संघटनांसह विविध संघटनांचा गोवंश हत्येला मोठा विरोध होऊनही अद्यापही बैल बाजार रोड लगत असलेल्या आयेशा कॉलनी येथे गोवंश हत्या सुरूच असल्याची बाब नुकतीच पुन्हा एकदा कासली फाटा या ठिकाणी उघड झाली आहे.त्यामुळे कोपरगाव शहर आणि तालुक्यात गोवंश हत्या ही चिंतेची बाब ठरत आली आहे.सन २०१७ साली ऐन शिवरात्रीच्या दिवशी मोठे गोवंश आणि त्यांची कत्तल केलेले गोवंश आढळून आले होते.त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती.वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे सार्वत्रिक समाजमन कलूषित होत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.त्यामुळे आगामी शनिवारी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,यासाठी कोपरगाव शहर पोलिसांनी दक्षता मोहीम सुरू केली आहे.बकरी ईद सणादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी पोलिसांकडून काही सूचना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान याच बैठकीत सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मोठ्या तावातावाने गोवंश हत्या होणार नाही याची हमी देत पोलिस आणि इतर समाज बांधवांना गुन्हा नसताना उगीच बोल लावू नये ;लावल्यास आपण ‘येव करू…!तेव करू…! असा इशारा दिला होता.मात्र त्यांनाच या आरोपींनी तोंडघशी पाडले असल्याचे दिसून आले आहे.
राज्यात गाय,वळू आणि बैलांची कत्तल करण्यास मनाई आहे.जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून उपाय केले जात आहेत.त्या अंतर्गत काल सकाळी ११ वाजता पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली असून त्यांनी कायदा सर्व नगिरकानी पाळावा कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये असे आवाहन केले होते.त्याच बरोबर दिल्ली येथील जामा मशिदीचे मुख्यइमाम यांनीही देशातील अन्य धर्मीय नागरिकांच्या धार्मिक भावना दुखवू नये,आगामी काही तासात संपन्न होणाऱ्या बकरी ईद निमित्त अवैध आणि निषिद्ध प्राण्यांची कुर्बानी देऊ नये असे सार्वत्रिक आवाहन केले असताना त्यास हरताळ फासण्याचे काम रात्री १.३० च्या सुमारास कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या संजयनगर येथे घडले आहे.
यातील आरोपी शाहरुख कुरेशी याने दिनांक ०६ जूनच्या रात्री १.३० वाजता आपल्या ताब्यातील एक २० हजार रुपये किंमतीची एक पांढऱ्या रंगाची काळे ठिपके असलेली वय वर्षे चार असलेली एक गाय,आणखी एक १५ हजार रुपये किमतीची एक पांढरी काळपट रंगाची उभे शिंगे असलेली वय वर्षे दोन असलेली आणखी एक गाय आदींना आपल्या ताब्यात बेकायदा वीणा चाऱ्या पाण्यापासून वंचित ठेवून तिच्या आरोग्याची काळजी न घेता डांबून ठेवले असल्याचे दिसून आले आहे.याबाबत शहर पोलिसांना गुप्त खबर मिळाल्यावरच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या दोन्ही गायी जप्त केल्या आहेत.
दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचेसह पोलिस उपनिरीक्षक भूषण हांडोरे आदींनी भेट दिली आहे.याबाबत फिर्यादी पोलिस कॉन्स्टेबल गणेश वशिष्ठ काकडे यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.२८१/२०२५ प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ब व ९ आणि प्राण्यास निर्दयपणे वागविणे कलम ११(१)(ड),महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल बबन तमनर हे करीत आहेत.