गुन्हे विषयक
…या शहरात चादर गँगची दहशत,५० लाखांची चोरी !

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळाला लागून दक्षिण बाजूस असलेल्या भोसले वस्तीवर ५ एप्रिल रोजी पहाटे झालेल्या हल्ल्यातील आरोपीनी चोरी करताना तीन जणांची निर्घृण हत्या करून अवघे पंधरा दिवस उलटत नाही तोच चोरट्यांनी आपली आगळी-वेगळी चौर्यकला कोपरगाव शहराला दाखवली असून पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अहिंसा स्तंभाजवळ पश्चिमेस असलेल्या,’सचिन वॉच कंपनी’ला हा दणका दिला आहे.यात रोकड ०३ लाख ४७ हजार रुपये तर २९ लाख २२ हजार रुपयांची किंमती टायटन व टाइमेक्स घड्याळे आदीसंह जवळपास ३२ लाख ६९ हजार (पन्नास लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे) रुपयांचा लंपास माल करून पोलिसांना थेट आव्हान दिले असल्याचे मानले जात आहे.हा प्रकार आज पहाटे ३.३५ वाजेच्या सुमारास घडला असून या गुन्ह्यात जवळपास ७-८ चोरटे सामील असल्याचे चलचीत्रणात उघड झाले आहे.दरम्यान छ्त्रपती संभाजीनगर मध्ये आठ दिवसापूर्वी असाच गुन्हा घडला घडला असल्याने त्यात हीच ‘चादर गँग’ यात सामील असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान या गुन्ह्यात पोलिस ठाण्यात २९ लाख २२ हजार रुपये किमतीचे टायटन कंपनीचे १५५ घड्याळे तर टायमेक्स कंपनीचे १२० घड्याळे व ०३ लाख ४७ हजार रुपये रोख असा सुमारे ३२ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज चोरी गेल्याचे गुरुद्वारा रोड कोपरगाव येथील फिर्यादी संजय लालचंद जैन (वय-६१)नोंदवले असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिसांनी दिली आहे.
पुण्यात काेयते उगारून दहशत माजविणे,तसेच गाड्यांची मोडतोड अशा प्रकारच्या गुन्ह्यांत वाढ झाली होती.या प्रकारच्या गुन्ह्यात सराइतांसह अल्पवयीन सामील असल्याचे वेळोवेळी उघडकीस आले होते.प्रसारमाध्यमांनी या दहशत माजविणाऱ्या टोळ्यांना ‘कोयता गँग’ असे नाव दिले आाणि या नावाची दहशत राज्यभरात पसरली.वडगाव शेरीचे आ.बापू पठारे यांनी ‘कोयता गँग’च्या दहशतीकडे अधिवेशनात लक्ष वेधले होते.त्यावर मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ‘कोयता गँग’ अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले होते त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील बेगमपुरा परिसरात काही दिवसापूर्वी एक मोबाईलचे दुकान फोडून आठ लाखाचे मोबाईल या चादर गँगने लुटले होते.याप्रकरणी बेगमपुरा चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आता त्याच पद्धतीने कोपरगाव शहरात आता ‘चादर गॅंग’ सक्रिय झाल्यानं कोपरगाव शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आदल्या दिवशी दोन साधारण वय वर्षे २५-३० असलेल्या दोन चोरट्यांनी सदर दुकानात जावून महागडी घड्याळे नेमकी कोठे आहे याची दुकानदार यांना विचारणा करून रेकी केली होती.त्यात त्यांनी दुकानदार यांना किमती घड्याळे दाखवा अशी विनंती करून त्यांनी हजारात दाखवली असताना त्यांनी किमान २०-२५ हजरांची घड्याळे दाखवा अशी विनंती करून किमती घड्याळे नेमकी कोठे ठेवली आहे याचा तपास करून ठेवला होता आज पहाटे त्यावरच नेमका डल्ला मारला आहे.
दरम्यान त्यातच आधी कोपरगाव शहर आणि तालुक्यात गंभीर गुन्ह्याचा आलेख सारखा वाढत असताना दिसत असून यात राजकीय नेत्यांचा पोलिसांवर आणि पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला असल्याचे दिसत नाही.गळूचोरी त्यानंतर अवैध व्यवसाय आणि आता मोठ्या रकमेसाठी चोऱ्या होऊन नागरिकांचे जीव घेण्यापर्यंत चोरट्यांनी मजल गेली आहे.पोलिसांचा धाक नसल्याने चोरटे खूपच मस्तावले असल्याचं दिसत आहे.कोपरगाव तालुक्यात पाच वर्षापूर्वी आपेगाव येथील उन्हाळ्यात घरावर झोपलेल्या वृध्द माता पित्यांचा खून विहीर काम करणाऱ्या मजुरांनी केला होता.त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता.त्यानंतर त्याची पुनरावृत्ती पुन्हा काकडी विमानतळ येथे दि.०५ एप्रिल २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास घडला असून यात पालघर जिल्ह्यातून मोखाडा येथून ‘मका कुट्टी’ करण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी पाळत ठेवून जवळपास ३० तोळे सोन्याचे दागिन्यांच्या मोहाने पती साहेबराव भोसले व त्यांची पत्नी साखरबाई भोसले आणि तरुण मुलगा कृष्णा भोसले आदीं तीन जणांना यमसदनी धाडले असल्याने यात अद्याप शिर्डीचे एक माजी खा.लोखंडे सोडले तर अद्याप वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी या ठिकाणी आपली पायधूळ झाडलेली नसताना आज पहाटे ०५ वाजता चलचीत्रण कॅमेरे सुरू असताना मोठी चोरी करण्याचे धाडस दाखवले आहे.यात दुकानात कोणी नाही याची त्यांनी आदल्या दिवशी रेकी करून हा डाव साधला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यातील दुकानदार संजय लालचंद लोहाडे (जैन)(वय-३२) यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान आदल्या दिवशी केलेल्या टेहळणी नुसार नेमका टायटन सारख्या किमती कंपनीचा जवळपास पन्नास लाखांचा शेलका माल आतील काऊंटर मधून लंपास केला आहे.किरकोळ हजार पाणी पाचशेच्या मालाला (घड्याळांना) हातही लावला नसल्याचे चलचित्रनात उघड दिसत आहे.
दरम्यान आमच्या प्रतिनिधीस मिळालेल्या माहितीनुसार आदल्या दिवशी दोन साधारण वय वर्षे २५-३० असलेल्या दोन चोरट्यांनी सदर दुकानात जावून महागडी घड्याळे नेमकी कोठे आहे याची दुकानदार यांना विचारणा करून रेकी केली होती.त्यात त्यांनी दुकानदार यांना किमती घड्याळे दाखवा अशी विनंती करून त्यांनी हजारात दाखवली असताना त्यांनी किमान २०-२५ हजरांची घड्याळे दाखवा अशी विनंती करून किमती घड्याळे नेमकी कोठे ठेवली आहे याचा तपास करून ठेवला होता व आज पहाटे नेमके सदर दुकानाजवळ कोणी नाही पोलिसांची गस्त नाही याची वेळ निवडून सदर दुकानावर हल्लाबोल केला आहे.त्यात त्यांनी दुकानाचे शटर खोलण्यासाठी आधी रस्त्याच्या बाजूने दोन चादरी धरून आडोसा तयार केला असल्याचे दिसून येत असून सदर आडोशाला जावून ७-८ चोरट्यांनी शटरला पूर्ण ताकद लावून ते वर केले व दोन चोरट्यांनी बिनबोभाट दुकानात प्रवेश केला असल्याचे दिसून येत आहे.त्यांच्या पाठीवर निळ्या व काळ्या रंगाच्या पिशव्या असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान आदल्या दिवशी केलेल्या टेहळणी नुसार नेमका टायटन सारख्या किमती कंपनीचा जवळपास पन्नास लाखांचा शेलका माल आतील काऊंटर मधून लंपास केला आहे.किरकोळ हजार पाणी पाचशेच्या मालाला (घड्याळांना) हातही लावला नसल्याचे चलचित्रनात उघड दिसत आहे.
दरम्यान या प्रकरणी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास दुकान मालक सनी लोहाडे हे आपले दुकान नेहमी प्रमाणे उघडण्यास आले असताना त्यांना आपल्या दुकानाचे शटर उचकटलेले आढळून आले आहे.त्यावेळी त्यांनी खातरजमा करून पोलिस ठाण्यात धाव घेतली होती व पोलिसांना ही बाब लक्षात आणून दिली होती.त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक बलमुर्गे व शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांना याची खबर दिली होती.त्यांनी घटनास्थळी १०.४५ वाजता धाव घेऊन पाहणी केली होती.दरम्यान त्यांनी पोलिसांनी नगर येथील श्वान पथकास पाचारण केले आहे.आरोपींचा तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-१८९/२०२४ भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ३३१(४),३०५(अ) प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान पुढील तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भगवान मथुरे हे करीत आहेत.दरम्यान घटनास्थळी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे यांनी भेट दिली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे.