आरोग्य
कोपरगावात रुग्ण वाढ सुरूच,चिंता वाढली

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात काल ५९ रुग्ण वाढीचा उच्चान्क वाढला असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण ५२ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात १० रुग्ण बाधित निघाले असून १२ संशयित रुग्णांना घरी सोडून दिले आहे.नगर येथे तपासणीसाठी ५७ संशयितांचे अहवाल पाठवलें आहे.पैकी १३ बाधित तर खाजगी प्रयोग शाळेतील अहवालात ०२ बाधित असे एकूण बाधितांची संख्या २५ निष्पन्न झाली आहे तर उपचारानंतर १२ जणांना घरी जाण्यास सोडून देण्यात आले आहे.तपासणीत तर ४२ जण निरंक निघाल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा २१ हजार ६७७ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ३०३ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काही दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे.त्यामुळे नागरिकांची चिंता वाढत चालली आहे.
आज आलेल्या यादीत शहरात बाधित रुग्णांची संख्या १५ तर ग्रामीण भागात ०८ असे तेवीस रुग्ण बाधित निघाले असून दोन खाजगी प्रयोग शाळेतील असे २५ बाधित रुग्ण असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज आढळलेल्या बाधित रुग्णांची यादीत बालाजीअंगण येथील महिला-(वय-२०),लक्ष्मीनगर येथील दोन पुरुष वय-४५,१८,गांधीनगर येथील पुरुष वय-४५, महिला-७१,निवारा पुरुष वय-३६,कापड बाजार पुरुष वय-४९,महिला वय-२०,इंदिरापथ तीन पुरुष वय-६५,३८,१९,महिला वय-५०,सराफ बाजार दोन पुरुष वय-४०,६४,इंगळें नगर महिला वय-४५, असे ऐकून १५ रुग्ण आढळले आहे तर ग्रामीण भागात मुर्शतपुर पुरुष वय-२८,महिला वय-३२,६०,बोलकी पुरुष वय-४९,लौकी पुरुष वय-६६,सुरेगाव महिला वय-७०,४३,वारी पुरुष वय-५० आदींचा समावेश असून खाजगी प्रयोग शाळेतील उशिराने आलेल्या अहवालात कापड बाजारातील एक पुरुष वय-५४ तर एक महिला वय-४६ आदींचा समावेश आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ९५० इतकी झाली आहे.त्यात १५९ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत १८ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.८९ टक्के आहे.आतापर्यंत ०४ हजार ३३९ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १७ हजार ३५६ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २१.८९ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ७७३ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८१.३६ टक्के झाला आहे.दरम्यान या आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे.