जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील दोन नेत्यांच्या ताब्यातील अतिक्रमण हटविण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील दोन्ही गड किल्ले धारकांनी गेली अनेक दशके अवैधरित्या आपल्या ताब्यात ठेवलेल्या कोपरगाव शहराच्या उत्तरेस असलेल्या साईबाबा चौकाच्या आजूबाजूस असलेल्या सि.स.क्रं.१९३५ मधील ५० एकर ३३ आर.हे क्षेत्र सरकारने आपल्या ताब्यात घेण्याचा आदेश नुकताच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठाने दिला होता.त्यानुसार हे संपूर्ण क्षेत्र ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु झाली असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच प्रांताधिकाऱ्यांना आदेश बजावले असून त्यांनी कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांची नेमणूक करून संबंधित संस्थांचे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्याच्या राजकीय आसमंतात खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांना दिवसा तारे चमकू लागले तर आश्चर्य वाटू नये.

कोपरगाव तालुक्यातील ईशान्यगड व पश्चिम गड या दोन्ही राजकीय गडांच्या ताब्यात असललेल्या या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.या बाबत कोपरगाव तालुक्यातील नागरिकांत हा विषय अत्यंत चवीने चौकाचौकात चघळला जात आहे.वर्तमान काळात या ठिकाणी मंगल कार्यालय,महात्मा गांधी ट्रस्टचे,साई तपोभूमी मंदिर,कार्यालय,शेकडो गाळ्यांचे शॉपिंग सेंटर,विविध संस्था,सरकारी कार्यालये,काही संस्था,महाविद्यालये विद्यमान आहेत.या बाबत प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहराच्या हद्दीत साईबाबा चौक परिसरात सिटी सर्व्हे क्रं.१९३५ हा असून हा सर्व्हे क्रं.सरकारी मालकीचा आहे.याचे एकूण क्षेत्र ५० एकर ३३ आर इतके आहे.हि कोट्यवधींची मालमत्ता दि.०१ एप्रिल १९५६ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी तथा चेअरमन जिल्हा विकास मंडळ यांनी तत्कालीन तालुका विकास मंडळ कोपरगाव यांना कृषी प्रदर्शनासाठी दरसाल ०२ हजार ६०१ रुपये इतक्या खंडाने दिली होती.त्याचा २० वर्षांचा करार होऊन तो त्याच दिवशी ताब्यात दिला होता.त्याची मुदत दि.०१ एप्रिल १९७६ रोजी संपली होती.दरम्यान ती कधीही वाढून दिलेली नाही.

सदरची मुदत संपल्यावर सदरचे क्षेत्र रीतसर जिल्हाधिकारी यांना परत करणे गरजेचे होते.मात्र महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट व साधारण १९९९ ला त्यात शेतकरी सहकारी संघ कोपरगाव यांनी त्यात हिस्सा मिळवला होता.(तो कसा मिळवला त्या बाबत स्व.नामदेवराव परजणे यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्या वेळी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती.) त्या नंतर या दोन्ही संस्थांचे कर्त्याधर्त्या राजकीय नेत्यांनी त्यात अवैध फेरफार (क्रं.२८५३,३८७४,व ५८५०) करून मालकी हक्काच्या सातबारा उताऱ्यात नाव नोंदवले असल्याचे आढळले होते.तर पीक पाहणी सदरात ईशान्य गडाच्या ताब्यात असलेल्या कोपरगाव शेतकरी सहकारी संघाचे नाव नोंदवले होते.व दोन्ही संस्थांनी हि जमीन कुळाने धारण केल्याचा दावा केला होता.व त्यासाठी नूतनींकरणाचा अधिकार हा तत्कालीन जिल्हा परिषदेला होता.स्थानिक जिल्हा विकास मंडळाला १९६० साली राहिला नव्हता.कारण सन १९६० साली जिल्हा परिषद स्थापन झाली होती.

सदरची बाब शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या प्रकरणी सन-२०१० साली अ,नगर जिल्हाधिकारी व त्या संबंधीत महसुली अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरु केला होता.मात्र त्याला तत्कालीन महसुली अधिकाऱ्यांनी राजकीय दबावातून दाद दिली नाही.
या प्रकरणी अखेर सेनेचे नेते बाळासाहेब जाधव यांनी त्याच वर्षी या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात जनहित याचिका (क्रं.६४९३/२०१०) दाखल करून न्याय मागितला होता.त्या बाबत सूनावण्या संपन्न होऊन खण्डपीठाने या बाबत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला होता.व या बाबत दि.०२ मार्च २०१५ रोजी आदेश देऊन सदरची मालमत्ता सरकारने तथा नगर जिल्हाधिकारी यांना वरील दोन संबधीत संस्थांनी सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण ठरवून ते ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते.

त्या आदेशानुसार अपर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांनी दि.२९ ऑक्टोबर २०२१ रोजी महसुलचे शिर्डी येथील प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना हा आदेश दि.२६ नोव्हेंबर २०२१ रोजी देऊन या सुमारे ५१ एकर क्षेत्रावरील अतिक्रमण निष्कसित करण्याचे आदेश पारित केले होते.त्या आदेशानुसार प्रांताधिकारीं शिंदे यांनी हे अतिक्रमण काढणेकामी नेमणूक करून कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांना जा.क्रं.कावी/जमीन-२/६८९/२०२१ अन्वये दि.२३ डिसेंबर २०२१ रोजी हे अतिक्रमण १५ दिवसांत निष्कासित करण्यासाठी आदेश देण्यात आला आहे.व या बाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास तत्काळ सादर करण्यास बजावले आहे.

त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील ईशान्यगड व पश्चिम गड या दोन्ही राजकीय गडांवर खळबळ उडाली आहे.या बाबत कोपरगाव तालुक्यातील नागरिकांत हा विषय अत्यंत चवीने चौकाचौकात चघळला जात आहे.वर्तमान काळात या ठिकाणी मंगल कार्यालय,महात्मा गांधी ट्रस्टचे साई तपोभूमी मंदिर,त्याचे कार्यालय,शेकडो गाळ्यांचे शॉपिंग सेंटर,विविध संस्था,सरकारी कार्यालये,काही संस्था,महाविद्यालये विद्यमान आहेत.या बाबत प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close