जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

“कोपरगाव शहराला प्रथम पायाभूत सुविधा द्या”..या नेत्यांची आग्रही मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

विद्यमान लोकप्रतिनिधींनी कोपरगाव तालुक्याचा विकास करताना कोपरगावची बाजारपेठ ओस पडू नये यासाठी शहरातील व्यापाऱ्यांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष देऊन त्या सोडवाव्या व शहरातील रस्ते,स्वच्छ पाणी यांसह भाजी मार्केट प्रमाणे फळांचे मार्केट,ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या ग्राहकांसाठी पार्किंग व्यवस्था अग्रक्रमाने करून द्यावी अशी आग्रही मागणी राज्य आप्तसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी नुकतीच कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केली आहे.

“कोरोना महामारीमुळे कोपरगाव शहरातील व्यापारी वर्ग अडचणीत आला असून ग्राहक संरक्षण कायद्याच्या अनुषंगाने व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे व समृद्धी महामार्गाचे काम राज्य सरकार कडून लवकरात लवकर करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे”-आ.काळे,कोपरगाव.

शिर्डी येथील साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या अध्यक्षपदी निवड आणि कोपरगाव शहरातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना राज्य सरकारच्यावतीने सरकारी मदत मिळवून दिल्याबद्दल कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे वतीने नुकताच समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.वंसतराव चव्हाण समता सहकार सभागृहात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे व किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला आहे त्यावेळी ते अध्यक्षस्थानवरून बोलत होते.सदर प्रसंगी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे जेष्ठ पदाधिकारी अजित लोहाडे,तुलसीदास खुबानी,बाळासाहेब कुर्लेकर,केशव भवर,गुलशन होडे,दीपक अग्रवाल,किरण शिरोडे,व्यापारी महासंघ महिला आघाडीच्या अध्यक्षा किरण दगडे,महिला आघाडीच्या इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.सदर प्रसंगी कोयटे पुढे बोलताना म्हणाले की,”कोपरगाव तालुक्याचे आ.काळे हे महाराष्ट्रातील आमदारांमध्ये विकासाच्या बाबतीत पहिल्या १० मध्ये असून त्याचे कार्य कर्तृत्वामुळे शिर्डी विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्षपद मिळाल्यामुळे त्यांना चांगली संधी मिळाली असून नवीन ओळख निर्माण करण्याची संधी प्राप्त झाली आहे.मुंबई-नागपूर समृध्दी महामार्ग कोपरगाव जवळून जात असल्याने मुंबई कोपरगावच्या जवळ येत आहे.कोपरगावचा व्यापारी मुंबईला अडीच-तीन तासात पोहचून त्याचा फायदा शहरातील व्यापाऱ्यांना करून द्यावा असे आवाहन शेवटी केले आहे.सदर प्रसंगी किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांनी कार्यक्रमाचे केले आहे.तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि उपस्थितांचे आभार व्यापारी महासंघाचे सचिव प्रदीप साखरे यांनी मानले आहे.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा,सचिव प्रदीप साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी,सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close